शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 10:23 PM

सध्या आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकारी व एमआयडीसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाळूज महानगर : एमआयडीसी प्रशासनाकडून अघोषित पाणी कपात करण्यात आल्यामुळे वाळूज गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. सध्या आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकारी व एमआयडीसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगामी दोन महिने भीषण टंचाईचे राहणार असल्याने प्रशासनाची परीक्षा ठरणार आहे.

वाळूज ग्रामपंचायतीला सहा महिन्यांपासून एमआयडीसीकडून पाणी पुरवठा सुरु केलेला आहेत. गावात एमआयडीसी प्रशासनाने पाणी पुरवठा सुरु केल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला होता. ग्रामपंचायतीला दररोज एमआयडीसीकडून जवळपास १४ लाख लिटर पाणी मिळत असल्यामुळे गावात नळयोजनेद्वारे ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा सुरु केला होता. मात्र, २७ मार्चपासून एमआयडीसी प्रशासनाने अचानक पाणी कपात केल्याने गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. आजघडीला गावात केवळ ६ लाख लिटरच्या आसपास पाणी मिळत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या तीन सार्वजनिक विहिरी व बोअरच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी नागरिकाकडून ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला जात असून पाणी प्रश्नाकडे पदाधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.

वाढीव पाणी पुरवठ्यासाठी पत्रव्यवहारगावातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन ग्रामपंचायती प्रशासनाने जिल्हाधिकारी व एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करुन पाणीकपात मागे घेण्याची मागणी केल्याचे सरपंच पपीन माने, उपसरपंच मनोज जैस्वाल, ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे यांनी सांगितले.

जारची मागणी वाढलीगावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्यामुळे नागरिकांना जारचे विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. पाणीटंचाईमुळे जारच्या शुद्ध पाण्याला मागणी वाढली आहे. नियोजनाअभावी गावातील नागरिकांना कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा आरोप नागरिकातून होत आहे.

टॅग्स :WaterपाणीWalujवाळूजwater scarcityपाणी टंचाई