शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

पाणीपुरवठ्याची स्थिती स्फोटक; शहराची तहान भागविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 15:43 IST

मोमबत्ता, हर्सूल सावंगी तलावाच्या पाण्याचा वापरच नाही

औरंगाबाद : दरवर्षी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याची स्थिती स्फोटक बनते. यंदाही तशीच स्थिती असून, महापालिका प्रशासनाने मागील काही वर्षांमध्ये शहराची तहान भागविण्यासाठी कोणत्याही दीर्घकालीन उपाययोजनाच केलेल्या नाहीत. तहान लागली तर तात्पुरत्या उपाययोजनांवर दरवर्षी भर देण्यात येतो. शहरालगत असलेल्या दौलताबाद येथील मोमबत्ता तलाव, हर्सूल सावंगी येथील पाझर तलावाच्या पाण्याचा पिण्यासाठी अजिबात वापर होत नाही. तलावातील पाण्याचे निव्वळ बाष्पीभवन होते, हे विशेष.

वाढत्या लोकसंख्येला समाधानकारक पाणी देणे, हे महापालिकेचे दायित्व आहे. १०२ टीएमसीचे धरण उशाला असल्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या पर्यायी स्रोतांचा कधीच विचार केला नाही. जायकवाडीहून शहरात पाणी आणण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. सध्या मनपा सद्य:स्थितीत असलेल्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी तब्बल १४० कोटी रु. खर्च करीत आहे. तरीही ओरड कायम आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा खर्च मनपाला परवडणारा नाही. त्यामुळे आतापासूनच पर्यायी जलस्रोतांचा वापर करणे गरजेचे आहे.

हर्सूल तलावाची स्थितीहर्सूल तलावाच्या पाण्यावर १९७० पर्यंत संपूर्ण शहराची तहान भागवली जात होती. या तलावाचे लाभक्षेत्र परिसरात मागील ७ दशकांमध्ये वाढच केली नाही. उलट तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे दरवर्षी तलाव ओसंडून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात खाम नदीपात्रातून वाहून जाते. गाळ काढणे, लाभक्षेत्र वाढविले तर भविष्यात मोठ्या प्रमाणात शहराला फायदा होऊ शकतो.

मोमबत्ता तलावाचे पाणीदौलताबाद घाटात जि.प.च्या अखत्यारीत असलेल्या मोमबत्ता तलावातील गाळ, लाभक्षेत्र वाढवून त्यातील पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरता येऊ शकते. दौलताबाद समुद्रसपाटीपासून बरेच उंचीवर आहे. पडेगाव, भावसिंगपुरा, छावणी, रेल्वे स्टेशनपर्यंत या तलावाचे पाणी कोणत्याही पाण्याच्या मोटारी न लावता गुरुत्वाकर्षणाने देता येऊ शकते. याकडे शासन, प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी कधीच लक्ष दिले नाही.

हर्सूल सावंगी पाझर तलावहर्सूल गावापासून हाकेच्या अंतरावर हर्सूल-सावंगी पाझर तलाव आहे. या तलावाच्या पाण्याचा अजिबात वापर होत नाही. या तलावातही अनेक दशकांपासून गाळच गाठलेला नाही. ३० फूट पाणीक्षमता असलेल्या या तलावातील पाण्यावर प्रक्रिया करून नारेगाव, चिकलठाणापर्यंत देता येऊ शकते.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई