शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणीपुरवठ्याची स्थिती स्फोटक; शहराची तहान भागविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 15:43 IST

मोमबत्ता, हर्सूल सावंगी तलावाच्या पाण्याचा वापरच नाही

औरंगाबाद : दरवर्षी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याची स्थिती स्फोटक बनते. यंदाही तशीच स्थिती असून, महापालिका प्रशासनाने मागील काही वर्षांमध्ये शहराची तहान भागविण्यासाठी कोणत्याही दीर्घकालीन उपाययोजनाच केलेल्या नाहीत. तहान लागली तर तात्पुरत्या उपाययोजनांवर दरवर्षी भर देण्यात येतो. शहरालगत असलेल्या दौलताबाद येथील मोमबत्ता तलाव, हर्सूल सावंगी येथील पाझर तलावाच्या पाण्याचा पिण्यासाठी अजिबात वापर होत नाही. तलावातील पाण्याचे निव्वळ बाष्पीभवन होते, हे विशेष.

वाढत्या लोकसंख्येला समाधानकारक पाणी देणे, हे महापालिकेचे दायित्व आहे. १०२ टीएमसीचे धरण उशाला असल्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या पर्यायी स्रोतांचा कधीच विचार केला नाही. जायकवाडीहून शहरात पाणी आणण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. सध्या मनपा सद्य:स्थितीत असलेल्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी तब्बल १४० कोटी रु. खर्च करीत आहे. तरीही ओरड कायम आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा खर्च मनपाला परवडणारा नाही. त्यामुळे आतापासूनच पर्यायी जलस्रोतांचा वापर करणे गरजेचे आहे.

हर्सूल तलावाची स्थितीहर्सूल तलावाच्या पाण्यावर १९७० पर्यंत संपूर्ण शहराची तहान भागवली जात होती. या तलावाचे लाभक्षेत्र परिसरात मागील ७ दशकांमध्ये वाढच केली नाही. उलट तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे दरवर्षी तलाव ओसंडून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात खाम नदीपात्रातून वाहून जाते. गाळ काढणे, लाभक्षेत्र वाढविले तर भविष्यात मोठ्या प्रमाणात शहराला फायदा होऊ शकतो.

मोमबत्ता तलावाचे पाणीदौलताबाद घाटात जि.प.च्या अखत्यारीत असलेल्या मोमबत्ता तलावातील गाळ, लाभक्षेत्र वाढवून त्यातील पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरता येऊ शकते. दौलताबाद समुद्रसपाटीपासून बरेच उंचीवर आहे. पडेगाव, भावसिंगपुरा, छावणी, रेल्वे स्टेशनपर्यंत या तलावाचे पाणी कोणत्याही पाण्याच्या मोटारी न लावता गुरुत्वाकर्षणाने देता येऊ शकते. याकडे शासन, प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी कधीच लक्ष दिले नाही.

हर्सूल सावंगी पाझर तलावहर्सूल गावापासून हाकेच्या अंतरावर हर्सूल-सावंगी पाझर तलाव आहे. या तलावाच्या पाण्याचा अजिबात वापर होत नाही. या तलावातही अनेक दशकांपासून गाळच गाठलेला नाही. ३० फूट पाणीक्षमता असलेल्या या तलावातील पाण्यावर प्रक्रिया करून नारेगाव, चिकलठाणापर्यंत देता येऊ शकते.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई