शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याची स्थिती स्फोटक; शहराची तहान भागविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 15:43 IST

मोमबत्ता, हर्सूल सावंगी तलावाच्या पाण्याचा वापरच नाही

औरंगाबाद : दरवर्षी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याची स्थिती स्फोटक बनते. यंदाही तशीच स्थिती असून, महापालिका प्रशासनाने मागील काही वर्षांमध्ये शहराची तहान भागविण्यासाठी कोणत्याही दीर्घकालीन उपाययोजनाच केलेल्या नाहीत. तहान लागली तर तात्पुरत्या उपाययोजनांवर दरवर्षी भर देण्यात येतो. शहरालगत असलेल्या दौलताबाद येथील मोमबत्ता तलाव, हर्सूल सावंगी येथील पाझर तलावाच्या पाण्याचा पिण्यासाठी अजिबात वापर होत नाही. तलावातील पाण्याचे निव्वळ बाष्पीभवन होते, हे विशेष.

वाढत्या लोकसंख्येला समाधानकारक पाणी देणे, हे महापालिकेचे दायित्व आहे. १०२ टीएमसीचे धरण उशाला असल्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या पर्यायी स्रोतांचा कधीच विचार केला नाही. जायकवाडीहून शहरात पाणी आणण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. सध्या मनपा सद्य:स्थितीत असलेल्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी तब्बल १४० कोटी रु. खर्च करीत आहे. तरीही ओरड कायम आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा खर्च मनपाला परवडणारा नाही. त्यामुळे आतापासूनच पर्यायी जलस्रोतांचा वापर करणे गरजेचे आहे.

हर्सूल तलावाची स्थितीहर्सूल तलावाच्या पाण्यावर १९७० पर्यंत संपूर्ण शहराची तहान भागवली जात होती. या तलावाचे लाभक्षेत्र परिसरात मागील ७ दशकांमध्ये वाढच केली नाही. उलट तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे दरवर्षी तलाव ओसंडून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात खाम नदीपात्रातून वाहून जाते. गाळ काढणे, लाभक्षेत्र वाढविले तर भविष्यात मोठ्या प्रमाणात शहराला फायदा होऊ शकतो.

मोमबत्ता तलावाचे पाणीदौलताबाद घाटात जि.प.च्या अखत्यारीत असलेल्या मोमबत्ता तलावातील गाळ, लाभक्षेत्र वाढवून त्यातील पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरता येऊ शकते. दौलताबाद समुद्रसपाटीपासून बरेच उंचीवर आहे. पडेगाव, भावसिंगपुरा, छावणी, रेल्वे स्टेशनपर्यंत या तलावाचे पाणी कोणत्याही पाण्याच्या मोटारी न लावता गुरुत्वाकर्षणाने देता येऊ शकते. याकडे शासन, प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी कधीच लक्ष दिले नाही.

हर्सूल सावंगी पाझर तलावहर्सूल गावापासून हाकेच्या अंतरावर हर्सूल-सावंगी पाझर तलाव आहे. या तलावाच्या पाण्याचा अजिबात वापर होत नाही. या तलावातही अनेक दशकांपासून गाळच गाठलेला नाही. ३० फूट पाणीक्षमता असलेल्या या तलावातील पाण्यावर प्रक्रिया करून नारेगाव, चिकलठाणापर्यंत देता येऊ शकते.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई