शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
2
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
3
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
4
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
5
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
6
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
7
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
8
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
10
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
11
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
12
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
13
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
14
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
15
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
16
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
17
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
18
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
19
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
20
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?

वाळूज एमआयडीसीतून ५ तालुक्यांना २०० टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 5:52 PM

वाळूज एमआयडीसीच्या जलकुंभावरुन पाच तालुक्यांत जवळपास २०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

वाळूज महानगर : औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागांत पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याअभावी माणसांसह जनावरांचेही हाल होत असल्याने वाळूज एमआयडीसीच्या जलकुंभावरुन पाच तालुक्यांत जवळपास २०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे राज्यभरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याची सर्वाधिक झळ औरंगाबाद जिल्ह्याला बसली आहे. औरंगाबाद तालुक्यासह वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, कन्नड या पाच तालुक्यांत अनेक भागात तीव्र पाणी टंचाई सुरु आहे. गावची लोकसंख्या, जनावरांची संख्या व पाणीटंचाई लक्षात घेवून त्यानुसार टँकर मंजूर करण्यात येतात. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत एमआयडीसीला दिला जातो. हा प्रस्ताव तपासून एमआयडीसी गरजेनुसार पाणी टँकर मंजूर करते.

त्यानुसार महाराणा प्रताप चौकालगत असलेल्या एमआयडीसीच्या जलकुंभावरुन १२० व अन्य जलकुंभावरुन ६० ते ७० टँकर असे जवळपास २०० टँकरने या पाच तालुक्यांतील टंचाईग्रस्त भागात दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. याच बरोबर एमआयडीसीच्या शेंद्रा येथील जलकुंभावरुनही औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील भागात दररोज १०० टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

या संदर्भात एमआयडीसीचे अभियंता दिलीप परळीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaluj MIDCवाळूज एमआयडीसी