शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

सहाव्या दिवशी पाणी; जनता व्याकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:14 IST

उन्हाची दाहकता वाढताच शहरात पाण्याची मागणीही आता दुप्पट झाली आहे. ज्या वसाहतींना महापालिका सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करीत आहे, त्या वसाहतींमधील नागरिकांचा संयम आता हळूहळू ढळू लागला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उन्हाची दाहकता वाढताच शहरात पाण्याची मागणीही आता दुप्पट झाली आहे. ज्या वसाहतींना महापालिका सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करीत आहे, त्या वसाहतींमधील नागरिकांचा संयम आता हळूहळू ढळू लागला आहे. आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महापालिकेकडे सुरू झाली आहे. महापालिका तीन दिवसांआड पाणी देण्यास नकारघंटा वाजवीत आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत महापालिका नागरिकांची तहान कशी भागविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जायकवाडीहून शहरात पाण्याच्या विविध टाक्यांवर मुख्य लाईनद्वारे पाणी आणण्यात येते. अनेक वसाहतींमध्ये मुख्य लाईनवरूनच पाण्याचे हजारो कनेक्शन घेण्यात आले आहेत. सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीत तर पाणीच पडत नाही. त्यामुळे सिडको एन-३ पासून थेट चिकलठाण्यापर्यंतच्या अनेक वॉर्डांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अगोदरच महापालिका अनेक वसाहतींना पाच दिवसांनंतर म्हणजेच सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करते. त्यातही कमी पाणी देण्यात येत नसल्याची नागरिकांची ओरड अधिक वाढली आहे. बुढीलेन लोटाकारंजापासून थेट आझाद चौकापर्यंतच्या अनेक वॉर्डांना सहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. मुकुंदवाडी, जयभवानीनगर येथील वसाहतींमध्येही सहाव्या दिवशीच पाणी येते. गुलमंडी, खाराकुंआ भागातही परिस्थिती वेगळी नाही. शहरातील मोजक्याच वॉर्डांमध्ये सहाव्या दिवशी पाणीपुरवठा का करण्यात येतोय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. समान पद्धतीने पाणी द्यावे या मागणीकडे एक वर्षांपासून प्रशासन दुलर्क्ष करीत आहे. किराडपुरा, अल्तमश कॉलनी आदी गोरगरीब वसाहतींमध्ये नागरिकांकडे सहा दिवस पाणी साठविण्यासाठी जागाच नसते. त्यांना तीन दिवसांआड पाणी द्यावे या मागणीसाठी काँग्रेसने मनपासमोर मागील महिन्यात आंदोलनही केले. मात्र, आजपर्यंत प्रशासनाने निर्णय घेतला नाही. जुन्या शहरातील नगरसेवक तिसऱ्या दिवशी पाणी येत असल्याचा दावा करीत आहेत.दूषित पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढशहरातील ११५ वॉर्डांमधील किमान २५ पेक्षा अधिक वसाहतींमध्ये आजही दूषित पाणीपुरवठा होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे महापालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही.पाण्यात टाकायचे औैषध संपलेदूषित पाण्यामुळे साथरोग पसरू नयेत म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पाण्यात टाकणारे औषध देण्यात येते. मागील काही दिवसांपासून हे औषधही संपले आहे. पदमपुरा भागात गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले. या भागात मनपाने औषध वाटप केलेच नाही.

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण