शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

सहाव्या दिवशी पाणी; जनता व्याकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:14 IST

उन्हाची दाहकता वाढताच शहरात पाण्याची मागणीही आता दुप्पट झाली आहे. ज्या वसाहतींना महापालिका सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करीत आहे, त्या वसाहतींमधील नागरिकांचा संयम आता हळूहळू ढळू लागला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उन्हाची दाहकता वाढताच शहरात पाण्याची मागणीही आता दुप्पट झाली आहे. ज्या वसाहतींना महापालिका सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करीत आहे, त्या वसाहतींमधील नागरिकांचा संयम आता हळूहळू ढळू लागला आहे. आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महापालिकेकडे सुरू झाली आहे. महापालिका तीन दिवसांआड पाणी देण्यास नकारघंटा वाजवीत आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत महापालिका नागरिकांची तहान कशी भागविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जायकवाडीहून शहरात पाण्याच्या विविध टाक्यांवर मुख्य लाईनद्वारे पाणी आणण्यात येते. अनेक वसाहतींमध्ये मुख्य लाईनवरूनच पाण्याचे हजारो कनेक्शन घेण्यात आले आहेत. सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीत तर पाणीच पडत नाही. त्यामुळे सिडको एन-३ पासून थेट चिकलठाण्यापर्यंतच्या अनेक वॉर्डांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अगोदरच महापालिका अनेक वसाहतींना पाच दिवसांनंतर म्हणजेच सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करते. त्यातही कमी पाणी देण्यात येत नसल्याची नागरिकांची ओरड अधिक वाढली आहे. बुढीलेन लोटाकारंजापासून थेट आझाद चौकापर्यंतच्या अनेक वॉर्डांना सहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. मुकुंदवाडी, जयभवानीनगर येथील वसाहतींमध्येही सहाव्या दिवशीच पाणी येते. गुलमंडी, खाराकुंआ भागातही परिस्थिती वेगळी नाही. शहरातील मोजक्याच वॉर्डांमध्ये सहाव्या दिवशी पाणीपुरवठा का करण्यात येतोय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. समान पद्धतीने पाणी द्यावे या मागणीकडे एक वर्षांपासून प्रशासन दुलर्क्ष करीत आहे. किराडपुरा, अल्तमश कॉलनी आदी गोरगरीब वसाहतींमध्ये नागरिकांकडे सहा दिवस पाणी साठविण्यासाठी जागाच नसते. त्यांना तीन दिवसांआड पाणी द्यावे या मागणीसाठी काँग्रेसने मनपासमोर मागील महिन्यात आंदोलनही केले. मात्र, आजपर्यंत प्रशासनाने निर्णय घेतला नाही. जुन्या शहरातील नगरसेवक तिसऱ्या दिवशी पाणी येत असल्याचा दावा करीत आहेत.दूषित पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढशहरातील ११५ वॉर्डांमधील किमान २५ पेक्षा अधिक वसाहतींमध्ये आजही दूषित पाणीपुरवठा होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे महापालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही.पाण्यात टाकायचे औैषध संपलेदूषित पाण्यामुळे साथरोग पसरू नयेत म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पाण्यात टाकणारे औषध देण्यात येते. मागील काही दिवसांपासून हे औषधही संपले आहे. पदमपुरा भागात गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले. या भागात मनपाने औषध वाटप केलेच नाही.

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण