शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

औरंगाबाद जिल्ह्यातील २६५ गावांना पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:42 AM

वैशाख महिना लागल्यानंतर उन्हाचा पारा चढू लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बिकट होऊ लागला असून, २६५ गावांना पाणीटंचाईची झळ बसते आहे. मराठवाड्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यांत सुरू असून त्यात गंगापूर तालुक्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्देवैशाख वणवा : गंगापूरमध्ये सर्वाधिक टँकर; ३०५ विहिरींचे अधिग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वैशाख महिना लागल्यानंतर उन्हाचा पारा चढू लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बिकट होऊ लागला असून, २६५ गावांना पाणीटंचाईची झळ बसते आहे. मराठवाड्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यांत सुरू असून त्यात गंगापूर तालुक्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील ८७ गावांत ८९ टँकरने पाणीपुरवठा होतो आहे. ३०५ विहिरींचे प्रशासनाने अधिग्रहण केले असून, ३२ वाड्या आणि २६५ गावांत ३२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात पावसाने दडी मारली. कुठेही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी फुलंब्री तालुक्यातील काही गावांना भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.सर्वाधिक तहानले औरंगाबादमराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत ४७२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ३६३ गावांमध्ये हा पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्हा सर्वाधिक तहानला आहे. २६५ गावांत ३२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विभागाची राजधानी असलेला औरंगाबाद जिल्हा सध्या पाणीटंचाईच्या झळा सोसत असल्याचे महसूलच्या आकड्यांवरून दिसते आहे. २३ एप्रिलपर्यंतची ही स्थिती असून येत्या महिन्यात यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्थलांतरासारखी स्थिती नाहीजिल्ह्यामध्ये अद्याप पाण्यामुळे स्थलांतर करण्याची परिस्थिती उद्भवलेली नाही. विभागातील एकूण जिल्ह्यांपैकी औरंगाबादेत गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे डिसेंबरपासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. पुढील महिनाअखेरीस टँकरचा आकडा ५०० पर्यंत जाईल; परंतु पाण्यामुळे स्थलांतर करावे लागेल, अशी स्थिती नसल्याचा दावा विभागीय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.तालुकानिहाय टँकर्सची स्थितीतालुका गावे टँकरऔरंगाबाद २५ ३७फुलंब्री ३७ ५३पैठण १४ २१गंगापूर ८७ ८९वैजापूर ३० ३८खुलताबाद १९ १८कन्नड १७ १५सिल्लोड ३५ ५२सोयगाव ०१ ०१एकूण २६५ ३२४

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabadऔरंगाबाद