शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

औरंगाबाद जिल्ह्यातील २६५ गावांना पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:43 IST

वैशाख महिना लागल्यानंतर उन्हाचा पारा चढू लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बिकट होऊ लागला असून, २६५ गावांना पाणीटंचाईची झळ बसते आहे. मराठवाड्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यांत सुरू असून त्यात गंगापूर तालुक्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्देवैशाख वणवा : गंगापूरमध्ये सर्वाधिक टँकर; ३०५ विहिरींचे अधिग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वैशाख महिना लागल्यानंतर उन्हाचा पारा चढू लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बिकट होऊ लागला असून, २६५ गावांना पाणीटंचाईची झळ बसते आहे. मराठवाड्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यांत सुरू असून त्यात गंगापूर तालुक्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील ८७ गावांत ८९ टँकरने पाणीपुरवठा होतो आहे. ३०५ विहिरींचे प्रशासनाने अधिग्रहण केले असून, ३२ वाड्या आणि २६५ गावांत ३२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात पावसाने दडी मारली. कुठेही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी फुलंब्री तालुक्यातील काही गावांना भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.सर्वाधिक तहानले औरंगाबादमराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत ४७२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ३६३ गावांमध्ये हा पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्हा सर्वाधिक तहानला आहे. २६५ गावांत ३२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विभागाची राजधानी असलेला औरंगाबाद जिल्हा सध्या पाणीटंचाईच्या झळा सोसत असल्याचे महसूलच्या आकड्यांवरून दिसते आहे. २३ एप्रिलपर्यंतची ही स्थिती असून येत्या महिन्यात यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्थलांतरासारखी स्थिती नाहीजिल्ह्यामध्ये अद्याप पाण्यामुळे स्थलांतर करण्याची परिस्थिती उद्भवलेली नाही. विभागातील एकूण जिल्ह्यांपैकी औरंगाबादेत गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे डिसेंबरपासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. पुढील महिनाअखेरीस टँकरचा आकडा ५०० पर्यंत जाईल; परंतु पाण्यामुळे स्थलांतर करावे लागेल, अशी स्थिती नसल्याचा दावा विभागीय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.तालुकानिहाय टँकर्सची स्थितीतालुका गावे टँकरऔरंगाबाद २५ ३७फुलंब्री ३७ ५३पैठण १४ २१गंगापूर ८७ ८९वैजापूर ३० ३८खुलताबाद १९ १८कन्नड १७ १५सिल्लोड ३५ ५२सोयगाव ०१ ०१एकूण २६५ ३२४

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabadऔरंगाबाद