भोकर तालुक्यातील २३ गावांत पाणीटंचाई
By Admin | Updated: May 27, 2014 01:01 IST2014-05-27T00:47:10+5:302014-05-27T01:01:28+5:30
भोकर : मागील वर्षी पाऊस जास्त झाला असला तरी यावर्षी उन्हाळ्यात २३ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़

भोकर तालुक्यातील २३ गावांत पाणीटंचाई
भोकर : मागील वर्षी पाऊस जास्त झाला असला तरी यावर्षी उन्हाळ्यात २३ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ यापैकी एका गावात टँकरने तर उर्वरित २२ गावांत विहीर अथवा बोअर अधिग्रहण करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे़ मागील वर्षी भोकर तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला़ यामुळे तालुक्यातील सुधा प्रकल्पासह सर्व लहान मोठे तलाव शंभर टक्के भरले़ दरवर्षी तालुक्यात जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई भेडसावत होती़ पण यावर्षी एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईला सुरुवात झाली़ सध्या २३ गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़ यापैकी कामनगाव येथे टँकरने पणीपुरवठा सुरू करण्यात आला असून जगराम तांडा, मसाईनगर, धावरी बु़, पांडुरणा, पाळी, सोनारी, गारगोटवाडी, चिंचाळा, कोळगाव खु़, विष्णूनगर, सोमठाणा, मसलगा, अम्रुनाईकतांडा, नसलापूर, किशननाईकतांडा, सावरगाव (माळ), जांभळी, कांडली, बल्लाळ, धावरी खु़, हाडोळी, दिवशी खु़ तांडा, नांदा खु़ तांडा येथील बोअर अथवा विहिरी अधिग्रहण करण्यात येत आहेत़ पावसाळा सुरू होण्यास आणखी कालावधी असल्याने पाणीटंचाईग्रस्त गावांत भर पडणार आहे़ अधिग्रहण केलेल्या गावांची संख्या २२ असून या गावांना विजेच्या लपंडावाचाही त्रास सहन करावा लागतो. रात्री-बेरात्री ग्रामस्थांना पाणी भरावे लागत आहे़ यामुळे शेतीच्या कामाकडेही दुर्लक्ष होत आहे़ (वार्ताहर) ३५ वर्षांत तीन योजना ३५ वर्षांत तीन योजना राबवूनसुद्धा गारगोटवाडीच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याची बातमी लोकमतमधून प्रसिद्ध होताच या गावात अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून पुन्हा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे़ यामुळे गावकर्यांना दिलासा मिळाला असून यात महत्त्वाची भूमिका तहसीलदार महेश परांडेकर यांनी निभावली़