शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
4
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
5
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
6
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
7
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
8
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
9
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
10
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
11
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
12
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
13
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
14
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
15
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
16
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
17
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
18
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
19
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
20
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान

मराठवाड्याचा पाणी प्रश्न म्हणजे आपली शेंडी दुसऱ्याच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 1:16 PM

नीरा-भीमा स्थिरीकरणातून मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी आणि कोकणचे पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का? अशी प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे यांच्याशी साधलेला हा संवाद... 

- स.सो.खंडाळकर 

पाणी हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न. त्यातल्या त्यात पाण्याच्या बाबतीत मराठवाडा आणि नगर-नाशिकचे भांडण दरवर्षी बघावयास मिळते. नीरा-भीमा स्थिरीकरणातून मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी आणि कोकणचे पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का? अशी प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे यांच्याशी साधलेला हा संवाद... 

प्रश्न : कृष्णा खोऱ्यातून किती पाणी मराठवाड्याला मिळू शकते?प्रा. पुरंदरे : सात टीएमसी पाणी मिळू शकेल. एकूण २५ टीएमसी पाणी मिळायला हवे. त्यापैकी सात टीएमसी पाण्यासाठी ५०० कोटी रु. खर्चही झाले आहेत; पण १८ टीएमसी पाणी मिळण्याची शक्यता कमी होत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी कृष्णा खोऱ्यातून २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले होते; पण नेहमीप्रमाणे नोकरशाही आडवी आली. त्यांनी यात खो घालून ठेवला. सात टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळू शकेल, असे आता सांगता येऊ शकेल.

प्रश्न : यात काय राजकारण घडतेय..? प्रा. पुरंदरे : मोठे राजकारण घडतेय. विजयसिंह मोहिते पाटील हे आता भाजपमध्ये चालले आहेत. त्यामागे हे पाण्याचेच राजकारण आहे. नीरा-भीमा स्थिरीकरणातून एकूण ५६ टीएमसी पाणी उजनीला मिळायला हवे आणि त्यापैकी २५ टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्याला मिळायला हवे. बारामतीच्या पाण्याचे प्रकरणही उद्भवलेय, ते यातूनच. 

प्रश्न : आणखी काय उपाययोजना करायला हव्यात? प्रा. पुरंदरे : मराठवाड्यातील कालव्यांची स्थिती वाईट आहे. मराठवाड्यातही समन्यायी पाणीवाटप व्हायला हवे.वैतरणेचे पाणी सध्या मुंबईला जाते. ते मराठवाड्याकडे वळवणे सहज शक्य नाही. त्यासाठी फार मोठे राजकीय प्रयत्न करावे लागतील, असा इशाराही ते आताच देऊन ठेवत आहेत. तांत्रिक दृष्टीने वैतरणेचे पाणी मराठवाड्याकडे वळवणे शक्यही आहे. पाटबंधारे महामंडळाच्या प्रस्तावानुसार प्रवाही पद्धतीने पाणी वळवता येऊ शकेल. 

कोकणचे पाणी वळवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीयजे लोक नाशिक-नगरमधून मराठवाड्याला पाणी मिळू देत नाहीत, ते लोक कोकणचे पाणी मराठवाड्याकडे वळू देतील काय? मला तरी कोकणचे पाणी मिळण्याची शक्यता तशी कमीच वाटते. वैतरणेतून ३९ टीमएसी पाण्यासाठी लिफ्ट करावे लागणार नाही; पण काही योजनांसाठी लिफ्ट करावे लागेल. मात्र, पर्यावरणवादी त्याला आक्षेप घेतील.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद