शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पाण्याची असंख्य ठिकाणी गळती; मनपाच्या दुर्लक्षाने नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

By मुजीब देवणीकर | Updated: May 17, 2023 19:41 IST

अनेक वसाहतींमध्ये पाणी आल्यावर रस्त्यावर अक्षरश: हजारो, लाखो लीटर पाणी वाहत असते.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा पारा वाढताच शहरात पाण्याची मागणीही वाढली. महापालिकेकडे अतिरिक्त पाणी नाही. उपलब्ध पाणीच चार ते पाच दिवसाआड देण्यात येत आहे. एकीकडे पाणी नाही म्हणून ओरड करायची आणि दुसरीकडे पाण्याची गळती बंद करण्याची तसदी मनपा प्रशासन घ्यायला तयार नाही. मागील काही महिन्यांपासून रेल्वेस्टेशन प्रवेशद्वाराजवळ जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. व्हॉल्व्हमधून अनेक ठिकाणी गळती सुरू आहे, तरी प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही.

शहराला दररोज २०० ते २२० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडीहून दररोज १२० ते १२५ एमएलडी पाणी शहरात आणले जाते. त्यानंतरही नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. पाण्यासाठी सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना दिलासा मिळावा असे कोणतेही ठोस पाऊल मनपाकडून उचलण्यात येत नाही. उलट नागरिकांसमक्ष पाण्याची नासाडी केली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबद्दल चीड निर्माण होत आहे.

अनेक वसाहतींमध्ये पाणी आल्यावर रस्त्यावर अक्षरश: हजारो, लाखो लीटर पाणी वाहत असते. त्याचप्रमाणे किमान १०० पेक्षा अधिक व्हॉल्व्हमधून पाणी वाहत असते. मिलकॉर्नर, ज्युबली पार्क रस्त्यावर दररोज रात्री व्हॉल्व्हमधील पाणी वाया जात असते. या पाण्यावर गुळगुळीत डांबरी रस्ताही उखडत आहे. असाच काहीसा प्रकार रेल्वे स्टेशन येथे प्रवेशद्वाराजवळ पाहायला मिळाला. हे वाया जाणारे पाणी थांबवा अशी मागणी या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी केली. दरम्यान, या प्रकाराबद्दल पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, जलवाहिनीचे लिकेज, व्हॉल्व्हमधून वाहणारे पाणी असेल, ही दुरुस्तीची प्रक्रिया बाराही महिने सुरू असते. अनेक व्हॉल्व्ह खूप जुने आहेत, दरराेज चालू बंद करताना त्यातून किंचित पाणी बाहेर येते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी