शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पाण्याची असंख्य ठिकाणी गळती; मनपाच्या दुर्लक्षाने नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

By मुजीब देवणीकर | Updated: May 17, 2023 19:41 IST

अनेक वसाहतींमध्ये पाणी आल्यावर रस्त्यावर अक्षरश: हजारो, लाखो लीटर पाणी वाहत असते.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा पारा वाढताच शहरात पाण्याची मागणीही वाढली. महापालिकेकडे अतिरिक्त पाणी नाही. उपलब्ध पाणीच चार ते पाच दिवसाआड देण्यात येत आहे. एकीकडे पाणी नाही म्हणून ओरड करायची आणि दुसरीकडे पाण्याची गळती बंद करण्याची तसदी मनपा प्रशासन घ्यायला तयार नाही. मागील काही महिन्यांपासून रेल्वेस्टेशन प्रवेशद्वाराजवळ जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. व्हॉल्व्हमधून अनेक ठिकाणी गळती सुरू आहे, तरी प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही.

शहराला दररोज २०० ते २२० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडीहून दररोज १२० ते १२५ एमएलडी पाणी शहरात आणले जाते. त्यानंतरही नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. पाण्यासाठी सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना दिलासा मिळावा असे कोणतेही ठोस पाऊल मनपाकडून उचलण्यात येत नाही. उलट नागरिकांसमक्ष पाण्याची नासाडी केली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबद्दल चीड निर्माण होत आहे.

अनेक वसाहतींमध्ये पाणी आल्यावर रस्त्यावर अक्षरश: हजारो, लाखो लीटर पाणी वाहत असते. त्याचप्रमाणे किमान १०० पेक्षा अधिक व्हॉल्व्हमधून पाणी वाहत असते. मिलकॉर्नर, ज्युबली पार्क रस्त्यावर दररोज रात्री व्हॉल्व्हमधील पाणी वाया जात असते. या पाण्यावर गुळगुळीत डांबरी रस्ताही उखडत आहे. असाच काहीसा प्रकार रेल्वे स्टेशन येथे प्रवेशद्वाराजवळ पाहायला मिळाला. हे वाया जाणारे पाणी थांबवा अशी मागणी या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी केली. दरम्यान, या प्रकाराबद्दल पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, जलवाहिनीचे लिकेज, व्हॉल्व्हमधून वाहणारे पाणी असेल, ही दुरुस्तीची प्रक्रिया बाराही महिने सुरू असते. अनेक व्हॉल्व्ह खूप जुने आहेत, दरराेज चालू बंद करताना त्यातून किंचित पाणी बाहेर येते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी