शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

शहरात पाण्याची असंख्य ठिकाणी गळती; मनपाच्या दुर्लक्षाने नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

By मुजीब देवणीकर | Updated: May 17, 2023 19:41 IST

अनेक वसाहतींमध्ये पाणी आल्यावर रस्त्यावर अक्षरश: हजारो, लाखो लीटर पाणी वाहत असते.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा पारा वाढताच शहरात पाण्याची मागणीही वाढली. महापालिकेकडे अतिरिक्त पाणी नाही. उपलब्ध पाणीच चार ते पाच दिवसाआड देण्यात येत आहे. एकीकडे पाणी नाही म्हणून ओरड करायची आणि दुसरीकडे पाण्याची गळती बंद करण्याची तसदी मनपा प्रशासन घ्यायला तयार नाही. मागील काही महिन्यांपासून रेल्वेस्टेशन प्रवेशद्वाराजवळ जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. व्हॉल्व्हमधून अनेक ठिकाणी गळती सुरू आहे, तरी प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही.

शहराला दररोज २०० ते २२० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडीहून दररोज १२० ते १२५ एमएलडी पाणी शहरात आणले जाते. त्यानंतरही नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. पाण्यासाठी सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना दिलासा मिळावा असे कोणतेही ठोस पाऊल मनपाकडून उचलण्यात येत नाही. उलट नागरिकांसमक्ष पाण्याची नासाडी केली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबद्दल चीड निर्माण होत आहे.

अनेक वसाहतींमध्ये पाणी आल्यावर रस्त्यावर अक्षरश: हजारो, लाखो लीटर पाणी वाहत असते. त्याचप्रमाणे किमान १०० पेक्षा अधिक व्हॉल्व्हमधून पाणी वाहत असते. मिलकॉर्नर, ज्युबली पार्क रस्त्यावर दररोज रात्री व्हॉल्व्हमधील पाणी वाया जात असते. या पाण्यावर गुळगुळीत डांबरी रस्ताही उखडत आहे. असाच काहीसा प्रकार रेल्वे स्टेशन येथे प्रवेशद्वाराजवळ पाहायला मिळाला. हे वाया जाणारे पाणी थांबवा अशी मागणी या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी केली. दरम्यान, या प्रकाराबद्दल पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, जलवाहिनीचे लिकेज, व्हॉल्व्हमधून वाहणारे पाणी असेल, ही दुरुस्तीची प्रक्रिया बाराही महिने सुरू असते. अनेक व्हॉल्व्ह खूप जुने आहेत, दरराेज चालू बंद करताना त्यातून किंचित पाणी बाहेर येते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी