जायकवाडी धरणातील पाण्याची आवक घटली

By Admin | Updated: December 16, 2014 23:59 IST2014-12-16T23:38:02+5:302014-12-16T23:59:54+5:30

पैठण : दुष्काळ व पाणी टंचाईने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी पाच दिवसांत सव्वा फुटाने वाढली आहे,

Water in the Jamui dam dam decreases | जायकवाडी धरणातील पाण्याची आवक घटली

जायकवाडी धरणातील पाण्याची आवक घटली

पैठण : दुष्काळ व पाणी टंचाईने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी पाच दिवसांत सव्वा फुटाने वाढली आहे, तर जायकवाडीच्या जलसाठ्यात जवळपास तीन टीएमसीने वाढ झाली आहे. दरम्यान, रविवारी रात्री तीन वाजता मुळा धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आला असून, भंडारदरा धरणातून ४८८२ क्युसेक्स विसर्ज सुरू आहे. धरणात २१९६ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे.
आज सायंकाळी धरणातील पाणी पातळी १५०६.२८ फुटांपर्यंत गेली होती, तर धरणातून एकूण जलसाठा १४१२.६५४ द.ल.घ.मी.एवढा झाला होता. धरणात ६७४.५४८ द.ल.घ.मी. इतका उपयुक्त जलसाठा झाला आहे. धरणात ३१.६७ टक्के जलसाठा झाला आहे.
सध्या धरणात २१९६ क्युसेक्स आवक सुरू आहे. मुळा धरणातून विसर्ग बंद करण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसांत धरणात ८६.९१४ द.ल.घ.मी.ने वाढ झाली आहे.

Web Title: Water in the Jamui dam dam decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.