शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

जालनेकरांना दूषित पाणी

By admin | Updated: August 17, 2014 00:23 IST

जालना: जायकवाडी- जालना या पाणीपुरवठा योजनेवर १९३ कोटी १६ लाख रुपयांचा खर्च होऊन सुद्धा जालनेकरांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.

जालना: जायकवाडी- जालना या पाणीपुरवठा योजनेवर १९३ कोटी १६ लाख रुपयांचा खर्च होऊन सुद्धा जालनेकरांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.गेल्या दोन वर्षापूर्वी जालनेकर पाणीटंचाईने त्रासले होते. त्यावेळी जायकवाडी- जालना या पाणीपुरवठा योजनेनेच उन्हाळ्या अखेर का असेना शहरवासियांना दिलासा दिला. गेल्यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे टंचाई जाणवली नाही. याही वर्षीच्या उन्हाळ्यात गेल्या दोन वर्षापूर्वीच्या कटू आठवणी जाणवल्या नाहीत. त्याचे कारण म्हणजे जायकवाडी- जालना योजनाच होय. आलीकडे जालनेकरांना दिवसेंदिवस दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे. त्याचे कारण म्हणजे ठिक ठिकाणी जलवाहिन्या मोठ्या प्रमाणात फुटल्या आहेत. मुळात नव्या व जुन्या जालन्यातील वसाहतीतील जलवाहिन्या या निझामकालीन आहेत. त्या जलवाहिन्या आता काही ठिकाणी जीर्ण अवस्थेत आल्या आहेत. परिणामी पाण्याचा दाब सहन करु शकत नाही. त्यामुळे जलवाहिन्या फुटत आहेत. त्याद्वारे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय तर होतो आहेच शिवाय परंतु रस्त्यांसह नाल्यांमधील घाण, साचलेल्या पाण्यामुळेच जलवाहिनीतून काही वसाहतींना सर्रास दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे. काही भागात पिवळसर असे पाणी नळांद्वारे येत असून, काही भागात पाण्यास दुर्गंधी येते आहे. या संदर्भात वसाहतींमधून मोठ्या प्रमाणात ओरड सुरु झाली आहे. पाणी भरल्या व साठविल्याशिवाय पर्याय नाही, परंतु हे दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. काही नागरिकांनी पाणी उकळून त्याचा वापर सुरु केला. तर काही ठिकाणी तेच पाणी पिण्यास वापरले जात आहे. ( प्रतिनिधी)१९३ कोटी १७ लाख रुपयांचा या योजनेवर खर्च झाला. परंतु एवढा मोठा खर्च होऊन सुद्धा सद्य स्थितीत शहरवासियांना शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे पुनरुर्जीवन करणे गरजेचे आहे. एका केंद्रातील जलशुद्धीकरणाचे काम ठप्पच आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेस १५ कोटी ४४ लाख रुपयांची गरज असल्याची माहिती मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी दिली.४प्रशासनाने जलवाहिन्यांची दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, पाण्याचा अपव्यय थांबवावा शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जगदीश नंद, संतोष गाढे यांनी केली.