शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

५२ लाख लोकांना पाणी

By admin | Updated: May 4, 2016 01:28 IST

औरंगाबाद : पाणीपुरवठ्याच्या सर्व योजना अवसायनात निघाल्यामुळे यावर्षीही मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे. टँकरने पाणीपुरवठा हा एकमेव पर्याय प्रशासनाकडे शिल्लक राहिल्याने

औरंगाबाद : पाणीपुरवठ्याच्या सर्व योजना अवसायनात निघाल्यामुळे यावर्षीही मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे. टँकरने पाणीपुरवठा हा एकमेव पर्याय प्रशासनाकडे शिल्लक राहिल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच ५२ लाख लोकांना ३३३८ टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. मे अखेरपर्यंत हा आकडा ४ हजारांपर्यंत जाण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ५०० गावे, १२ लाख लोकसंख्या आणि ५०० टँकरची वाढ झाली आहे. यंदाचा दुष्काळ मागच्या वर्षीच्या तुलनेत भयावह असल्याचे आकड्यांवरून दिसते. पारा ४२ डिग्रीसेल्सिअसच्या पुढे-मागे सरकत असल्यामुळे पाण्याचे साठे आटू लागले आहेत. मराठवाड्यातील सुमारे ५२ लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. २ हजार ५०३ गावांना ३३३८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत १२३ गावे आणि १६४ टँकर वाढले आहेत. वैशाख महिना अजून जायचा आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वणवण करावी लागणार हे निश्चित आहे. विभागातील २५०३ गावांना टँकरचे पाणी पुरविले जात असून नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागत आहे. १९२५ गावांसाठी ४६८९ विहिरी विभागीय प्रशासनाच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. मेच्या पहिल्या आठवड्यातच ५०० गावे नव्याने दुष्काळाच्या गर्तेत आली आहेत. गेल्या महिन्यात २ हजार ६० गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. सद्य:स्थितीत २५०३ गावांत टँकरचे पाणी दिले जात आहे. वाढलेल्या गावांतील ११ लाख लोकसंख्येची त्यात भर पडली आहे. ५९३ टँकर वाढले आहेत. विभागात बीड जिल्ह्यातील ६७१ गावांत १२ लाख ७० हजार १२२ नागरिकांना ८६६ टँकरने, औरंगाबाद जिल्ह्यातील ५६९ गावांतील ११ लाख ६१ हजार ९४९ नागरिकांना ७५८ टँकरने, जालना जिल्ह्यातील ४०३ गावांना व ७ लाख ८५ हजार ८२२ नागरिकांना ४८० टँकरने, उस्मानाबाद जिल्ह्यातील २४६ गावांतील ५ लाख ३३ हजार ७७२ नागरिकांना ३७९ टँकरने पाणीपुरवठा होतो आहे, तर लातूर जिल्ह्यातील ३ लाख ६२ हजार नागरिक व २१० गावांत २८१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.