शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

योजनेचाच ‘कचरा’!

By admin | Updated: November 10, 2014 01:18 IST

संजय तिपाले ,बीड जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या ‘घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन’ योजनेला ग्रामपंचायतींच्या उदासीनतेचे ग्रहण लागले आहे़

संजय तिपाले ,बीडजिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या ‘घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन’ योजनेला ग्रामपंचायतींच्या उदासीनतेचे ग्रहण लागले आहे़ स्वच्छतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वचजण ‘झाडून’ कामाला लागलेले असताना जिल्ह्यातील ग्रामपंचायती मात्र कमालीच्या उदासीन आहेत़ वर्ष संपत आल्यावर सात ग्रामपंचायतींनी निधी उचलून ‘श्रीगणेशा’ केला आहे़ लाखो रुपये अखर्चीत आहेत़ त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाच्या योजनेचाच ‘कचरा’ झाला आहे़ग्रामीण भागातील कचऱ्यांचे व्यवस्थापन व्हावे तसेच सांडपाण्यापासून साथीचे आजार न फैलावू देता त्याचा परसबागांसाठी वापर करुन गाव स्वच्छ, सुंदर करण्याकरता २०११ पासून शासनाने ही योजना सुरु केली आहे. २०१३- १४ मध्ये १०२४ पैकी केवळ ४० ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. त्यासाठी शासनाकडून दीड कोटी रुपयांचा निधी आलेला आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींना पंचायत समितीमार्फत निधीचे तीन टप्प्यांत वाटप केले जाते. पहिला हफ्ता ४० टक्के, पहिल्या हफ्त्याच्या तुलनेने ८० टक्के काम करणाऱ्या ग्रां.प. ला पुन्हा ४० टक्के निधी दिला जातो. काम शंभर टक्के पूर्ण झाल्यावर अंतिम मुल्यांकन होताच उर्वरित २० टक्के इतका निधी उपलब्ध केला जातो. दरम्यान, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने शासनाकडून आलेला ८० टक्के निधी पंचायत समित्यांना उपलब्ध करुन दिलेला आहे. मात्र, सहभाग नोंदविलेल्या ग्रामपंचायतींनी तांत्रिक प्रस्तावच सादर केले नाहीत. त्यामुळे त्यांच्या निधीवाटपात अडथळे येत आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांकडून तांत्रिक प्रस्ताव पंचायत समित्यांमध्ये प्राप्त होणे आवश्यक आहे;परंतु ग्रामपंचायती व उपविभागीय अभियंते यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे तांत्रिक प्रस्ताव पंचायत समितीपर्यंत पोहोचत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.योजनेचा उद्देश..!घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ही योजना पर्यावरण रक्षण व स्वच्छतेसंबंधी आहे. घनकचरा व्यवस्थापनात कंपोस्ट, गांडूळ खत व त्यानंतर त्यापासून नाडेप निर्मितीचा समावेश आहे तर सांडपाणी व्यवस्थापनात परसबाग, शोषखड्डा, पाझरखड्डा ही कामे करावयाची आहेत, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एस़ बी़ वाघमारे यांनी ‘लोकमत’ला दिली़तालुकानिहाय ग्रां.प. संख्यातालुकाग्रामपंचायतधारुर२शिरुर३वडवणी३पाटोदा३बीड४गेवराई ४केज ४परळी४अंबाजोगाई४आष्टी ४माजलगाव ५घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रमांतर्गत किती कामे झाली ? या कामांची आता स्थिती काय ? किती गावांना निधी वितरीत झाला ? या बाबतची २०११ पासूनची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सी़ एम़ ढोकणे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडून मागविली आहे़४आठ दिवसात अहवाल सादर करावा, अन्यथा बीडीओ जबाबदार राहतील, असा इशारा ढोकणे यांनी दिला आहे़१५० ते २९९ इतक्या कुटुंबांसाठी ७ लाख, ३०० ते ४९९ इतक्या कुटुंबसंख्येकरता १२ लाख, ५०० कुटुंब संख्येसाठी १५ लाख तर ५०० पेक्षा अधिक कुटुंबसंख्येच्या गावाला २० लाख रुपये इतका निधी देण्याची तरतूद आहे.