शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहराचा कचरा ९० टनाने वाढला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 18:21 IST

कचरा उचलण्यासाठी कंपनीला दरमहा २ कोटी

ठळक मुद्देनागरिकांचे खिसेही रिकामे स्वच्छता कराशिवाय उपभोक्ता कर

औरंगाबाद : शहरातील नऊपैकी आठ झोनमध्ये कचरा उचलण्याचे काम बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी ही खाजगी कंपनी करीत आहे. कंपनी दररोज तब्बल ३९० टन कचरा उचलत असल्याची अतिशयोक्तीपूर्ण बाब समोर आली. शहरात आतापर्यंत फक्त ३०० टन कचरा जमा होत होता. हा कचरा उचलण्यासाठी कंपनी मनपाकडून दरमहा २ कोटी रुपये वसूल करते. प्रशासनानेही कचऱ्याच्या नावावर नागरिकांकडून दरवर्षी १० कोटी रुपये वसूल करण्याची तयारी सुरू केली आहे.  औरंगाबादकर मालमत्ताकरासोबत स्वच्छता कर भरतात. तरीही मनपा हा वेगळा कर आकारणार आहे.

शहरातील कचरा संकलनाचे काम रेड्डी कंपनी करीत आहे. १ टन कचरा कंपनीने जमा करून चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर नेल्यास मनपा १६६२ रुपये देत आहे. मनपाच्या नऊपैकी आठ झोनमध्ये कंपनी कचरा जमा करीत आहे. झोन क्रमांक सहामध्ये कंपनीने कामच सुरू केले नाही. अवघ्या आठ झोनचा कचरा ३९० टन होत असल्याची माहिती  मनपा अधिकाऱ्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिली. कंपनीचे दररोजचे बिल ६ लाख ४८ हजार १८० रुपये होत आहे. महिनाभराचे कंपनीचे बिल १ कोटी ९५ लाख  ४५ हजार ४०० रुपये होत आहे. कंपनी कचऱ्यामध्ये दगड, विटा, बांधकाम साहित्य टाकून बिल वसूल करीत असल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला होता. या गंभीर प्रकाराकडे प्रशासन अजिबात लक्ष देण्यास तयार नाही.

नियमबाह्य कामकंपनीने शहरातील २ लाख ३० हजार मालमत्ताधारकांकडून दररोज ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करावा, असा करारच के लेला आहे. कंपनी प्रत्येक वसाहतीमधील चौकात साचलेला कचरा जमा करीत आहे. डोअर टू डोअर कलेक्शन अजिबात नाही. दरवर्षी कंपनी मनपाकडून २४ ते २५ कोटी रुपये वसूल करीत आहे. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शहरात जिकडे तिकडे कचऱ्याचे डोंगर दिसून येत आहेत.

नागरिकांवर उपभोक्ता कचऱ्याचा बोजा रेड्डी कंपनीचा खर्च भागविण्यासाठी मनपाने नागरिकांवर उपभोक्ता कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील २ लाख ३० हजार निवासी, २५ हजार व्यापारी मालमत्ताधारकांडून दरवर्षी १० कोटी रुपये कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या वसुलीसाठी स्वतंत्र खाजगी कंत्राटदार देण्यात येणार आहे. यासाठी मनपाने आचारसंहिता लागण्यापूर्वी निविदा काढली होती. या निविदा प्रक्रियेला एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नाही. आता पुन्हा आठ दिवसांची अल्प निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

काय आहे निविदेतनिविदेनुसार शहरातील डोअर टू डोअर कचरा संकलनावर २ लाख ३० हजार निवासी मालमत्तांकडून दरमहा ३० रुपये उपभोक्ता कर वसूल केला जाणार आहे. यातून ७ कोटी ९२ लाख रुपये तर २५ हजार व्यावसायिक मालमत्तांकडून व्यवसायानुरूप ६० ते ३०० रुपयांपर्यंत  दरमहा शुल्क आकारून त्यातून १ कोटी ८० लाख रुपये वसुलीचे टार्गेट आहे. ६० टक्के वसुली झाली तरी दरवर्षी ६ कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत येतील, अशी अपेक्षा आहे. 

स्वच्छता कराशिवाय उपभोक्ता करशहरातील मालमत्ताधारक दरवर्षी मनपाला मालमत्ताकर भरतात. या करासोबत मनपा स्वच्छता करही वसूल करते. आता कचरा घेणाऱ्या कंपनीसाठी स्वतंत्र उपभोक्ता कर वसूल करण्यात येणार आहे. इंदूर महापालिका नागरिकांकडून दररोज १ रुपया वसूल करते. त्यामुळे औरंगाबाद मनपानेही अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद