शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

औरंगाबाद शहराचा कचरा ९० टनाने वाढला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 18:21 IST

कचरा उचलण्यासाठी कंपनीला दरमहा २ कोटी

ठळक मुद्देनागरिकांचे खिसेही रिकामे स्वच्छता कराशिवाय उपभोक्ता कर

औरंगाबाद : शहरातील नऊपैकी आठ झोनमध्ये कचरा उचलण्याचे काम बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी ही खाजगी कंपनी करीत आहे. कंपनी दररोज तब्बल ३९० टन कचरा उचलत असल्याची अतिशयोक्तीपूर्ण बाब समोर आली. शहरात आतापर्यंत फक्त ३०० टन कचरा जमा होत होता. हा कचरा उचलण्यासाठी कंपनी मनपाकडून दरमहा २ कोटी रुपये वसूल करते. प्रशासनानेही कचऱ्याच्या नावावर नागरिकांकडून दरवर्षी १० कोटी रुपये वसूल करण्याची तयारी सुरू केली आहे.  औरंगाबादकर मालमत्ताकरासोबत स्वच्छता कर भरतात. तरीही मनपा हा वेगळा कर आकारणार आहे.

शहरातील कचरा संकलनाचे काम रेड्डी कंपनी करीत आहे. १ टन कचरा कंपनीने जमा करून चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर नेल्यास मनपा १६६२ रुपये देत आहे. मनपाच्या नऊपैकी आठ झोनमध्ये कंपनी कचरा जमा करीत आहे. झोन क्रमांक सहामध्ये कंपनीने कामच सुरू केले नाही. अवघ्या आठ झोनचा कचरा ३९० टन होत असल्याची माहिती  मनपा अधिकाऱ्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिली. कंपनीचे दररोजचे बिल ६ लाख ४८ हजार १८० रुपये होत आहे. महिनाभराचे कंपनीचे बिल १ कोटी ९५ लाख  ४५ हजार ४०० रुपये होत आहे. कंपनी कचऱ्यामध्ये दगड, विटा, बांधकाम साहित्य टाकून बिल वसूल करीत असल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला होता. या गंभीर प्रकाराकडे प्रशासन अजिबात लक्ष देण्यास तयार नाही.

नियमबाह्य कामकंपनीने शहरातील २ लाख ३० हजार मालमत्ताधारकांकडून दररोज ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करावा, असा करारच के लेला आहे. कंपनी प्रत्येक वसाहतीमधील चौकात साचलेला कचरा जमा करीत आहे. डोअर टू डोअर कलेक्शन अजिबात नाही. दरवर्षी कंपनी मनपाकडून २४ ते २५ कोटी रुपये वसूल करीत आहे. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शहरात जिकडे तिकडे कचऱ्याचे डोंगर दिसून येत आहेत.

नागरिकांवर उपभोक्ता कचऱ्याचा बोजा रेड्डी कंपनीचा खर्च भागविण्यासाठी मनपाने नागरिकांवर उपभोक्ता कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील २ लाख ३० हजार निवासी, २५ हजार व्यापारी मालमत्ताधारकांडून दरवर्षी १० कोटी रुपये कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या वसुलीसाठी स्वतंत्र खाजगी कंत्राटदार देण्यात येणार आहे. यासाठी मनपाने आचारसंहिता लागण्यापूर्वी निविदा काढली होती. या निविदा प्रक्रियेला एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नाही. आता पुन्हा आठ दिवसांची अल्प निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

काय आहे निविदेतनिविदेनुसार शहरातील डोअर टू डोअर कचरा संकलनावर २ लाख ३० हजार निवासी मालमत्तांकडून दरमहा ३० रुपये उपभोक्ता कर वसूल केला जाणार आहे. यातून ७ कोटी ९२ लाख रुपये तर २५ हजार व्यावसायिक मालमत्तांकडून व्यवसायानुरूप ६० ते ३०० रुपयांपर्यंत  दरमहा शुल्क आकारून त्यातून १ कोटी ८० लाख रुपये वसुलीचे टार्गेट आहे. ६० टक्के वसुली झाली तरी दरवर्षी ६ कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत येतील, अशी अपेक्षा आहे. 

स्वच्छता कराशिवाय उपभोक्ता करशहरातील मालमत्ताधारक दरवर्षी मनपाला मालमत्ताकर भरतात. या करासोबत मनपा स्वच्छता करही वसूल करते. आता कचरा घेणाऱ्या कंपनीसाठी स्वतंत्र उपभोक्ता कर वसूल करण्यात येणार आहे. इंदूर महापालिका नागरिकांकडून दररोज १ रुपया वसूल करते. त्यामुळे औरंगाबाद मनपानेही अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद