शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मॉब लिंचिंग नव्हे, ते तर रस्त्यावर झालेले भांडण : चिरंजीव प्रसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 19:51 IST

घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करणार

ठळक मुद्देदीडशे अज्ञात लोकांवर गुन्हे दाखलअफवांवर विश्वास ठेवू नका

औरंगाबाद : शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. रस्त्यावर झालेल्या भांडणाला मॉब लिंचिंगचा रंग देऊन जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

रस्त्यावर वाहनचालकांत झालेल्या शाब्दिक चकमकीवरून हा वाद झाला; परंतु लोकांना जमवून या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. यात कुणावरही अन्याय होणार नाही; परंतु अपवृत्तीचे लोक पोलिसांच्या नजरेत आल्यास त्यांना पोलीस सोडणार नसल्याचे आयुक्त प्रसाद म्हणाले. 

आझाद चौकातील जमाव पोलिसांनी पांगविला; परंतु काहींनी हेतुपुरस्सरपणे लोकांना बोलावून दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता. एकाच बाजूला जमाव होता, तर दुसऱ्या बाजूला कोणतीही गर्दी नव्हती. याविषयीदेखील आजूबाजूच्या घटना त्यामागील कोण, याविषयीची सखोल चौकशी पोलीस करीत आहेत. फिर्यादीच्या पुरवणी जबाबाविषयी विचारले असता त्यावर सध्या बोलणे योग्य नसून, तो माझ्याकडे आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

दीडशे अज्ञात लोकांवर गुन्हे दाखलआझाद चौक ते रोशनगेट रोडवर  काहीजण घोषणा देत वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत होते. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून जिन्सी पोलीस ठाण्यात जवळपास १५० अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल व व्हिडिओ चित्रीकरणात आलेल्या लोकांचे चेहरे ओळखून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.  

सीसीटीव्ही फुटेज केले हस्तगतआझाद चौकात झालेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून, यामध्ये फिर्यादी व आरोपी यांचा केवळ १ मिनिटाचा संवाद झाल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळावर असलेल्या व्यक्तींकडून माहिती गोळा करण्यात येत असून, यामध्ये खोटी तक्रार अथवा बनाव असल्याचे सिद्ध झाल्यास खोटी तक्रार देणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त प्रसाद यांनी दिला आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नकागेल्या काही दिवसांपासून यू-ट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अफवा पसरविणाऱ्या व्हिडिओवर शहरवासीयांनी विश्वास ठेवू नये. नागरिकांनी पोलिसांकडे आलेल्या व्हिडिओची शहानिशा करावी. खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

फूड डिलिव्हरला नोटीस देणारशहरात व्यसनाधीनता वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याने त्याकडे पहिल्यांदा लक्ष केंद्रित करून हॉटेल, बीअरबार बंदीचे काम सोमवारपासून सुरू केले आहे; परंतु रात्री उशिरापर्यंत फूड डिलिव्हरी करणाऱ्यांची शहरात वर्दळ असते. यासाठी त्यांनीही रात्री उशिराच्या फूड डिलिव्हरीची आॅर्डर घेऊ नयेत, यासाठी त्यांची बैठक घेऊन त्यांनाही नोटिसा देणार आहोत. रात्री गुन्हेगारीच्या प्रकारात वाढ होत असल्याने हे पाऊल उचलणे गरजेचे आहे. रस्त्यावर गस्तीपथके लक्ष ठेवून राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद