शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वाळूज दंगलीचे खटले जलदगती न्यायालयात चालविणार : मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 6:03 PM

दंगलखोरांना लवकरात लवकर शासन व्हावे, यासाठी या दंगलीचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

औरंगाबाद : ९ आॅगस्ट रोजी वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेल्या दंगलीतील अनेक आरोपी अजूनही जेलमध्ये आहेत. दंगलखोरांना लवकरात लवकर शासन व्हावे, यासाठी या दंगलीचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. शहरात झालेल्या विविध दंगलीची चौकशीचे काय झाले, या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात फडणवीस यांनी औरंगाबाद ग्रामीण आणि शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांसोबत गुन्हे आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, सर्व पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस उपाधीक्षक आणि शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

गुन्हे आढावा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दोषसिद्धीचे प्रमाण, गुन्हे उघडीस येण्याचे प्रमाण आणि महिलाविषयक गुन्हे का वाढत आहेत, या प्रमुख मुद्यांवर आढावा घेण्यात आला. यात औरंगाबाद ग्रामीण पोलीस राज्यातील पहिल्या चारमध्ये आहेत. शहर पोलिसांची कामगिरी चांगली आहे. मात्र, त्यात अधिक चांगले काम होऊ शकते. 

मोबाईल आणि दुचाकी चोऱ्यांचा तपास गांभीर्याने करामोबाईल, दुचाकी चोरी तक्रारदारांसाठी महत्त्वाचा विषय असतो. यामुळे अशा गुन्ह्यांचा तपास गांभीर्याने करून तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल परत कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करा. चोरट्यांना शोधून काढले पाहिजे आणि तक्रारदाराला त्याचा माल परत केला पाहिजे. फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने तपास गुणात्मक कसा होईल, यावर तपास अधिकाऱ्यांनी जोर देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीWaluj MIDCवाळूज एमआयडीसीMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदCourtन्यायालयPoliceपोलिस