जागविल्या १९७१ युद्धाच्या आठवणी

By Admin | Updated: December 17, 2014 00:00 IST2014-12-16T23:42:18+5:302014-12-17T00:00:49+5:30

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील कारगिल स्मृतिवन येथील प्रांगणात १६ डिसेंबर या विजयी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या अनेक आठवणी जागवण्यात आल्या.

Wake up remembrance of 1971 war | जागविल्या १९७१ युद्धाच्या आठवणी

जागविल्या १९७१ युद्धाच्या आठवणी

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील कारगिल स्मृतिवन येथील प्रांगणात १६ डिसेंबर या विजयी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या अनेक आठवणी जागवण्यात आल्या. १३ शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना या निमित्ताने शहिदांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देण्यात आली. या पिढीने एनसीसी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये आपले करिअर घडवून राष्ट्रसेवा करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मानव विकास मिशनचे कार्याध्यक्ष भास्कर मुंडे, ज्ये. स्वा. सैनिक पन्नालाल गंगवाल, ब्रिगेडियर एस.यू.दशरथ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहिदांना अभिवादन व माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला.
सकाळी ७.३० ते ९.३० वाजेदरम्यान माजी सैनिक कल्याण कार्यालय, कारगिल स्मृतिवन समिती, समाजभूषण रुंजाजी भारसाखळे कॉलेज, द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटस् आॅफ इंडिया व नगरसेवक पंकज भारसाखळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मे. डॉ. कडेठाणकर, कॅ . सुरेंद्र सुर्वे, ग्रुप कॅ.नाईक, कर्नल रमेश वाघमारे, नेव्ही कॅ.कार्पाेरल पौलभाटिया, ए.के.पाठक, १९७१ च्या युद्धात सहभागी असलेले सैनिक एजाज शेख, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त केंद्रे, पोलीस अधीक्षक सावंत, शिवाजी चौधरी, गाडेकर, संभाजी गुठ्ठे, जगमोहनसिंग घायाळ, मे.बी.एस.पाठक यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक करताना नगरसेवक भारसाखळे म्हणाले, मागील ४ वर्षांपासून कारगिल स्मृतिवन येथे विजय दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येतो. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी. हेच या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी सिव्हिल रिस्पॉन्स टीमच्या के. नताशा जरिन, स्रेहा बक्षी, चार्टर्ड अकाऊंटंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय राठी, अगली गु्रप आॅफ औरंगाबादचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गोविंद केंद्रे यांनी केले. राहुल चौतमल व चमूने देशभक्तीपर गिते सादर केली. यशस्वीतेसाठी पंडित केंद्रे, जसवंतसिंग राजपूत, चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Wake up remembrance of 1971 war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.