शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

'वाट बघतोय रिक्षावाला...'; रिक्षात वाजणारे गाणे बंद करा, नाही तर...बेशिस्त चालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 16:05 IST

वाहतूक पोलीस, आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून कारवाई

औरंगाबाद : जोरजोरात गाणे वाजवत आणि नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर धावणाऱ्या बेशिस्त रिक्षांवर गुरुवारी वाहतूक पोलीस आणि आरटीओ कार्यालयाच्या पथकांनी कारवाईचा बडगा उगारला. यावेळी दंडात्मक कारवाईबरोबरच अनेक रिक्षा जप्त करून आरटीओ कार्यालयात उभ्या करण्यात आल्या.

शहरातील चौकाचौकात रिक्षांना अडवून कारवाई केली जात होती. या कारवाईनंतर काही रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयात जाऊन नाराजी व्यक्त केली. दहा हजार रुपये दंड कसा भरणार, असा प्रश्न उपस्थित केला. नियमांचे पालन केल्यास, कागदपत्रे योग्य ठेवल्यास कारवाई होत नाही, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.

का सुरू केली कारवाई ?शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून, खुनाच्या घटना घडत आहेत. याशिवाय टवाळखोर, झुंडशाही करणाऱ्यांच्या टोळक्यांमध्ये वाढ झाली असून, या प्रवृत्तीला वेळीच रोखून नागरिकांना सुरक्षितता देण्याची मागणी करणारे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांना बुधवारी दिले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्नांसह बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच वाहतूक पोलीस आणि आरटीओ कार्यालयाच्या पथकाने नियमांचे उल्लंघन करून धावणाऱ्या रिक्षांवर कारवाई सुरू केली.

२० रिक्षा जप्तपीयूसी नसणे, फिटनेस नसणे, परमिट नसणे, लायसन्स नसणे यासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात येत आहे. जवळपास २० रिक्षा जप्त करण्यात आल्याचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीसPoliceपोलिस