शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

भाजी मंडई तीस फूट खोल पाण्यात ! महापालिकेच्या ‘बीओटी’ बनवेगिरीची दशकपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 19:01 IST

दहा वर्षांपूर्वी विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्यात आलेली भाजी मंडई पालिकेने अक्षरश: गाडून टाकली आहे.

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : स्मार्ट होत चाललेल्या शहराला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा मात्र विसर पडला असून, दहा वर्षांपूर्वी विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्यात आलेली भाजी मंडई पालिकेने अक्षरश: गाडून टाकली आहे. आज या सर्वांत जुन्या मंडईच्या जागेवर ३० फुटांपेक्षा खोल खड्डा असून, त्यात पाणी भरले आहे. नजिकच्या भविष्यात मंडई उभारण्याचा पालिकेचा किंवा कंत्राटदाराचाही विचार दिसत नसल्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. आता या पाण्यावर चीनसारखी तरंगती बाजारपेठ उभारणार की काय, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

२०११ मध्ये मोठा गाजावाजा करून महापालिकेने औरंगपुरा भाजीमंडई जमीनदोस्त केली. या ठिकाणी अत्याधुनिक मंडई आणि भव्य शॉपिंग कॉम्पलेक्स उभारण्याची घोषणा केली. ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर पाटील कन्स्ट्रक्शन्स या विकसकाला जमीन देण्यात आली. या प्रकल्पाला डिसेंबर २०२१ मध्ये १० वर्षे पूर्ण होत आहेत. या मंडईच्या जागेवर अंडरग्राऊंड बांधकाम करण्यासाठी ३० फूटांहून अधिक खोदकाम केले असून, त्याला नाल्याच्या पाण्याचा पाझर फुटला आहे. त्यात मैलापाणी, कचरा साचल्याने डास, जलचर प्राणी आणि दुर्गंधी पसरली आहे.

बीओटीचे गोंडस नावपालिकेचा किंचितही फायदा नसलेल्या या प्रकल्पाला बीओटी असे नाव देण्यात आले. भाजीमंडईची १४७१ चौरस मीटर जागा पाटील कन्स्ट्रक्शनला देण्यात आली. मंडईसमोर ३६५.७५ चौ.मी. व वाहनतळासाठी नाल्यावरील २४३.६० चौ.मी. जागेचे नियोजन आहे. पालिकेला दरमहा १०० रुपये चौ.मी. दराने भाडे मिळेल असे जाहीर केले गेले. तीस वर्षांनंतर विकासकाने पालिकेला प्रकल्प हस्तांतरित करावा, असे करारात म्हटले गेले. त्यापैकी दहा वर्षे एव्हाना संपली आहेत.

मागीलवर्षी प्रयत्न झाले...पालिकेने मागील वर्षी मंडईच्या आसपासची अतिक्रमणे काढली. विकासकाला प्रकल्प वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्याने थोडेफार काम केले. सध्या तर विकासकाची वीजही कापण्यात आल्याने पाझराचे पाणी काढण्याचे काम बंद पडले आहे. हा परिसर दारूड्यांचा अड्डा बनला आहे.

सुनावणी घेण्यात येईलप्रकल्प पूर्ण व्हावा यादृष्टीने विकसकाला अनेकदा संधी दिली. पाच ते सहावेळा मुदतवाढ देण्यात आली. प्रकल्पाच्या जागेवर पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. लवकरच विकसकाला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी सुनावणीत देण्यात येईल. एक प्रकल्प १० वर्षे पूर्ण होत नसेल तर काय म्हणावे?- बी.बी. नेमाने, अतिरिक्त आयुक्त, मनपा

प्रकल्पाची वैशिष्ट्ये :भाजी विक्रेत्यांसाठी ७५ ओटेअन्य व्यावसायिकांसाठी ५० दुकाने- महापालिकेच्या हिश्शात ओटे, दुकाने- तीस वर्षांसाठी भाडेकरार- महिन्याला ४३,२१,३८० रुपये उत्पन्नाचे स्वप्न

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका