शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

भाजी मंडई तीस फूट खोल पाण्यात ! महापालिकेच्या ‘बीओटी’ बनवेगिरीची दशकपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 19:01 IST

दहा वर्षांपूर्वी विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्यात आलेली भाजी मंडई पालिकेने अक्षरश: गाडून टाकली आहे.

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : स्मार्ट होत चाललेल्या शहराला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा मात्र विसर पडला असून, दहा वर्षांपूर्वी विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्यात आलेली भाजी मंडई पालिकेने अक्षरश: गाडून टाकली आहे. आज या सर्वांत जुन्या मंडईच्या जागेवर ३० फुटांपेक्षा खोल खड्डा असून, त्यात पाणी भरले आहे. नजिकच्या भविष्यात मंडई उभारण्याचा पालिकेचा किंवा कंत्राटदाराचाही विचार दिसत नसल्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. आता या पाण्यावर चीनसारखी तरंगती बाजारपेठ उभारणार की काय, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

२०११ मध्ये मोठा गाजावाजा करून महापालिकेने औरंगपुरा भाजीमंडई जमीनदोस्त केली. या ठिकाणी अत्याधुनिक मंडई आणि भव्य शॉपिंग कॉम्पलेक्स उभारण्याची घोषणा केली. ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर पाटील कन्स्ट्रक्शन्स या विकसकाला जमीन देण्यात आली. या प्रकल्पाला डिसेंबर २०२१ मध्ये १० वर्षे पूर्ण होत आहेत. या मंडईच्या जागेवर अंडरग्राऊंड बांधकाम करण्यासाठी ३० फूटांहून अधिक खोदकाम केले असून, त्याला नाल्याच्या पाण्याचा पाझर फुटला आहे. त्यात मैलापाणी, कचरा साचल्याने डास, जलचर प्राणी आणि दुर्गंधी पसरली आहे.

बीओटीचे गोंडस नावपालिकेचा किंचितही फायदा नसलेल्या या प्रकल्पाला बीओटी असे नाव देण्यात आले. भाजीमंडईची १४७१ चौरस मीटर जागा पाटील कन्स्ट्रक्शनला देण्यात आली. मंडईसमोर ३६५.७५ चौ.मी. व वाहनतळासाठी नाल्यावरील २४३.६० चौ.मी. जागेचे नियोजन आहे. पालिकेला दरमहा १०० रुपये चौ.मी. दराने भाडे मिळेल असे जाहीर केले गेले. तीस वर्षांनंतर विकासकाने पालिकेला प्रकल्प हस्तांतरित करावा, असे करारात म्हटले गेले. त्यापैकी दहा वर्षे एव्हाना संपली आहेत.

मागीलवर्षी प्रयत्न झाले...पालिकेने मागील वर्षी मंडईच्या आसपासची अतिक्रमणे काढली. विकासकाला प्रकल्प वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्याने थोडेफार काम केले. सध्या तर विकासकाची वीजही कापण्यात आल्याने पाझराचे पाणी काढण्याचे काम बंद पडले आहे. हा परिसर दारूड्यांचा अड्डा बनला आहे.

सुनावणी घेण्यात येईलप्रकल्प पूर्ण व्हावा यादृष्टीने विकसकाला अनेकदा संधी दिली. पाच ते सहावेळा मुदतवाढ देण्यात आली. प्रकल्पाच्या जागेवर पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. लवकरच विकसकाला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी सुनावणीत देण्यात येईल. एक प्रकल्प १० वर्षे पूर्ण होत नसेल तर काय म्हणावे?- बी.बी. नेमाने, अतिरिक्त आयुक्त, मनपा

प्रकल्पाची वैशिष्ट्ये :भाजी विक्रेत्यांसाठी ७५ ओटेअन्य व्यावसायिकांसाठी ५० दुकाने- महापालिकेच्या हिश्शात ओटे, दुकाने- तीस वर्षांसाठी भाडेकरार- महिन्याला ४३,२१,३८० रुपये उत्पन्नाचे स्वप्न

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका