शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विधानसभेत वंचित-मनोज जरांगे युती? प्रकाश आंबेडकर म्हणाले, "त्यांनी आता २८८ जागा...

By विजय सरवदे | Updated: July 8, 2024 11:42 IST

गरीब मराठ्यांना न्याय द्यायचा असेल, तर राखीव मतदारसंघ सोडून उर्वरित सर्व जागांवर गरीब मराठ्यांना उभे करावे.

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, असा प्रस्ताव आपण ठेवला होता, पण आता विधानसभेच्या २८८ जागा लढविणार, असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे आता त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी सायंकाळी सुभेदारी विश्रामगृह येथे व्यक्त केले.

अकोला येथून मुंबईला जाण्यासाठी ते येथे आले होते. सुभेदारी विश्रामगृह येथे थोडी विश्रांती घेतली व ते विमानाने मुंबईला रवाना झाले. याप्रसंगी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधताना ते म्हणाले, आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती पुढल्या आठवड्यात ठरवू. निवडणुकीत आमचा मित्र कोण आणि दुश्मन कोण असेल, हेही ठरविले जाईल. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी राज्यातील राखीव मतदारसंघ सोडून उरलेल्या सर्व जागांवर गरीब मराठे उभे करावेत. लोकांच्या मनात असेल, तर मतदान करतील. आता निवडून आलेले मराठा समाजाचे ३१ खासदार हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांनी मनोज जरांगेंना झुलवत ठेवले आहे. गरीब मराठ्यांना न्याय द्यायचा असेल, तर राखीव मतदारसंघ सोडून उर्वरित सर्व जागांवर गरीब मराठ्यांना उभे करावे.

लाडकी बहीण या योजनेवर फार चांगल्या कॉमेंट येत आहेत. दीड हजारामध्ये गॅस स्वस्त मिळेल का, त्यातून शाळा-महाविद्यालयाची फी भरू शकतो का, आम्ही पौष्टिक आहार घेऊ शकतो का, अशा बोलक्या भावना अनेक मुलींनी व्यक्त केल्या आहेत. आमच्या आवाक्यात ज्या गोष्टी येतील, तेच जाहीर केले पाहिजे. राज्य शासनाने त्या विद्यार्थिनींच्या कॉमेंटला खरं उतरले पाहिजे. सरकारने जाहीर केलेले हे अनुदान क्षणिक असून दीड हजारात आम्ही काहीच करू शकत नाहीत, अशा मुलींच्या व्यथा आहेत.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलVidhan Bhavanविधान भवनElectionनिवडणूक 2024Aurangabadऔरंगाबाद