शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

'अर्जंट ब्रेक'च बेतले जीवावर; अपघातात दुचाकीस्वार शाळकरी मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 18:43 IST

समोरच्या वाहनावर धडकेपासून वाचण्यासाठी लावले 'अर्जंट ब्रेक'

ठळक मुद्देमित्रांसोबत जात होते विद्यापीठ परिसरातबसने अचानक वेग कमी केला

औरंगाबाद : चार मित्र दोन दुचाकीने विद्यापीठात जात असताना समोरील वाहनाने अचानक वेग कमी केल्याने जोरदार ब्रेक लावल्यानंतर दुचाकी उलटून झालेल्या अपघातात दहावीत शिकणारा १६ वर्षीय मुलगा ठार झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास लोखंडी पुल ते महावीर चौकदरम्यान घडला.या अपघाताची नोंद छावणी ठाण्यात करण्यात आली.

उर्वेश सुभाष जुमडे (रा.राजमाता जिजाऊ नगर, मुकुंदवाडी परिसर) असे मृत मुलाचे नाव आहे. याविषयी छावणी पोलिसांनी सांगितले की, उर्वेश आणि त्याचा मित्र जयेश नरवडे (वय १६,रा. जयभवानीनगर),  प्रतीक सुनील आठवले(रा. सिडको एन-४) आणि आकाश उद्धव सोनार (वय १६,रा.जयभवानीनगर) हे सिडको एन-३ मधील सेंट मीरा इंग्लीश स्कुलमध्ये दहावीचे विद्यार्थी आहेत. आज सकाळी उर्वेश आणि जयेश एका दुचाकीने तर प्रतिक आणि आकाश हे दुसऱ्या मोटारसायकलने नाश्ता करण्यासाठी विद्यापीठ परिसरातील एका हॉटेलवर जात होते.

वेगवेगळ्या दुचाकीने गप्पा मारत ते महावीर चौकाकडून छावणीतील लोखंडी पुलाकडे जात होते. तेथील चारचाकी वाहनाच्या दालनासमोर अचानक समोरील वेगातील बसने आणि मित्राने दुचाकीचा वेग कमी केला. आपण दुचाकीला धडकू या भितीपोटी उर्वेशने वेगातील दुचाकीला ब्रेक लावले आणि त्याची दुचाकी उलटली. या घटनेत उर्वेशच्या डोक्याला गंभीर दुखपात होऊन तो दुचाकीखाली दबला तर सोबतचा मित्र हा बाजूला पडल्याने त्यास कमी मार लागला. यावेळी वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड हे कार मधून येथून जात होते. त्यांनी गाडी थांबवत उर्वेशला आणि त्याच्या मित्राला घाटीत दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी उर्वेशला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद