शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

'अर्जंट ब्रेक'च बेतले जीवावर; अपघातात दुचाकीस्वार शाळकरी मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 18:43 IST

समोरच्या वाहनावर धडकेपासून वाचण्यासाठी लावले 'अर्जंट ब्रेक'

ठळक मुद्देमित्रांसोबत जात होते विद्यापीठ परिसरातबसने अचानक वेग कमी केला

औरंगाबाद : चार मित्र दोन दुचाकीने विद्यापीठात जात असताना समोरील वाहनाने अचानक वेग कमी केल्याने जोरदार ब्रेक लावल्यानंतर दुचाकी उलटून झालेल्या अपघातात दहावीत शिकणारा १६ वर्षीय मुलगा ठार झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास लोखंडी पुल ते महावीर चौकदरम्यान घडला.या अपघाताची नोंद छावणी ठाण्यात करण्यात आली.

उर्वेश सुभाष जुमडे (रा.राजमाता जिजाऊ नगर, मुकुंदवाडी परिसर) असे मृत मुलाचे नाव आहे. याविषयी छावणी पोलिसांनी सांगितले की, उर्वेश आणि त्याचा मित्र जयेश नरवडे (वय १६,रा. जयभवानीनगर),  प्रतीक सुनील आठवले(रा. सिडको एन-४) आणि आकाश उद्धव सोनार (वय १६,रा.जयभवानीनगर) हे सिडको एन-३ मधील सेंट मीरा इंग्लीश स्कुलमध्ये दहावीचे विद्यार्थी आहेत. आज सकाळी उर्वेश आणि जयेश एका दुचाकीने तर प्रतिक आणि आकाश हे दुसऱ्या मोटारसायकलने नाश्ता करण्यासाठी विद्यापीठ परिसरातील एका हॉटेलवर जात होते.

वेगवेगळ्या दुचाकीने गप्पा मारत ते महावीर चौकाकडून छावणीतील लोखंडी पुलाकडे जात होते. तेथील चारचाकी वाहनाच्या दालनासमोर अचानक समोरील वेगातील बसने आणि मित्राने दुचाकीचा वेग कमी केला. आपण दुचाकीला धडकू या भितीपोटी उर्वेशने वेगातील दुचाकीला ब्रेक लावले आणि त्याची दुचाकी उलटली. या घटनेत उर्वेशच्या डोक्याला गंभीर दुखपात होऊन तो दुचाकीखाली दबला तर सोबतचा मित्र हा बाजूला पडल्याने त्यास कमी मार लागला. यावेळी वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड हे कार मधून येथून जात होते. त्यांनी गाडी थांबवत उर्वेशला आणि त्याच्या मित्राला घाटीत दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी उर्वेशला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद