शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

'अर्जंट ब्रेक'च बेतले जीवावर; अपघातात दुचाकीस्वार शाळकरी मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 18:43 IST

समोरच्या वाहनावर धडकेपासून वाचण्यासाठी लावले 'अर्जंट ब्रेक'

ठळक मुद्देमित्रांसोबत जात होते विद्यापीठ परिसरातबसने अचानक वेग कमी केला

औरंगाबाद : चार मित्र दोन दुचाकीने विद्यापीठात जात असताना समोरील वाहनाने अचानक वेग कमी केल्याने जोरदार ब्रेक लावल्यानंतर दुचाकी उलटून झालेल्या अपघातात दहावीत शिकणारा १६ वर्षीय मुलगा ठार झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास लोखंडी पुल ते महावीर चौकदरम्यान घडला.या अपघाताची नोंद छावणी ठाण्यात करण्यात आली.

उर्वेश सुभाष जुमडे (रा.राजमाता जिजाऊ नगर, मुकुंदवाडी परिसर) असे मृत मुलाचे नाव आहे. याविषयी छावणी पोलिसांनी सांगितले की, उर्वेश आणि त्याचा मित्र जयेश नरवडे (वय १६,रा. जयभवानीनगर),  प्रतीक सुनील आठवले(रा. सिडको एन-४) आणि आकाश उद्धव सोनार (वय १६,रा.जयभवानीनगर) हे सिडको एन-३ मधील सेंट मीरा इंग्लीश स्कुलमध्ये दहावीचे विद्यार्थी आहेत. आज सकाळी उर्वेश आणि जयेश एका दुचाकीने तर प्रतिक आणि आकाश हे दुसऱ्या मोटारसायकलने नाश्ता करण्यासाठी विद्यापीठ परिसरातील एका हॉटेलवर जात होते.

वेगवेगळ्या दुचाकीने गप्पा मारत ते महावीर चौकाकडून छावणीतील लोखंडी पुलाकडे जात होते. तेथील चारचाकी वाहनाच्या दालनासमोर अचानक समोरील वेगातील बसने आणि मित्राने दुचाकीचा वेग कमी केला. आपण दुचाकीला धडकू या भितीपोटी उर्वेशने वेगातील दुचाकीला ब्रेक लावले आणि त्याची दुचाकी उलटली. या घटनेत उर्वेशच्या डोक्याला गंभीर दुखपात होऊन तो दुचाकीखाली दबला तर सोबतचा मित्र हा बाजूला पडल्याने त्यास कमी मार लागला. यावेळी वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड हे कार मधून येथून जात होते. त्यांनी गाडी थांबवत उर्वेशला आणि त्याच्या मित्राला घाटीत दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी उर्वेशला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद