शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी संकट : आंब्यांसह मोसंबी, द्राक्ष, पपई, केळी फळबागा साफ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 14:32 IST

अनेक भागांत घेतली जाणारी उन्हाळी पिके व भाजीपाल्यालाही जबर फटका बसला.

औरंगाबाद : मराठवाड्याला शनिवारी मध्यरात्री व रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात आंबा या फळपिकाला सर्वात मोठा फटका बसला. मोसंबी, चिकू, पपई, केळीच्या बागाही उद्ध्वस्त झाल्या. अनेक भागांत घेतली जाणारी उन्हाळी पिके व भाजीपाल्यालाही जबर फटका बसला. सोमवारी सकाळीही लातूर व उस्मानाबादच्या काही भागांत पाऊस झाला. 

परभणी जिल्ह्यात बागायती पिके साफपरभणी: शनिवारी रात्री जिल्ह्यातील परभणी, जिंतूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो एकरावरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनालाही या नुकसानीचा अहवाल पाठविण्याच्या सूचना जिल्हास्तरावरुन देण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री परभणी तालुक्यातील टाकळी बोबडे, पिंगळी कोथळा, जोड परळी आणि जिंतूर तालुक्यातील आसेगाव, दुधगाव, सोन्ना व कान्हड या ठिकाणी गारपीट झाली होती. टाकळी परिसरातील केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. तसेच जोड परळी शिवारात टरबूजांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. याशिवाय  काढून ठेवलेली हळद आणि कडब्याच्या वळ्यांचे नुकसान झाले.  

बीडमध्ये कांद्यांचे नुकसान  बीड : जिल्ह्यात रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि सौम्य गारपिटीमुळे आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यात कांदा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. वीज पडून पोखरी (ता. बीड) येथील आनंद काळे या शेतकऱ्याची बैलजोडी व चिंचवण (ता. वडवणी) येथील महादेव बाबासाहेब मात्रे यांच्या मालकीचे गाय वासरु ठार झाले. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरात विजेचे सिमेंट खांब मोडून  पडल्याने रानमळा, अर्धमसला, भाटेपुरी, निपाणी जवळका येथील विद्युत पुरवठा खंडीत झाला. दुपारपर्यंत तो सुरळीत झाला नव्हता.

लातुरात मेघगर्जनेसह पाऊस लातूर : जिल्ह्यात काही भागात सोमवारी पहाटे मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस झाला़ लातूर शहरात रविवारी मध्यरात्री विजांचा कडकडाट आणि पावसाने हजेरी लावल्याने अचानक वीजपुरवठाही खंडित झाला़ शिवाय, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, चाकूर, उदगीर, लातूर तालुक्यातील हरंगुळ बु़, पाखरसांगवी, खाडगाव, रेणापूर परिसरात रिमझिम पाऊस झाला़ शिरूर अनंतपाळ तालुक्यात काही भागात आंब्याचे नुकसान झाले आहे़  

उस्मानाबादेतही पाऊस उस्मानाबाद : जिल्ह्यातील जवळपास अर्ध्या भागाला रविवारी व सोमवारी सकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा जोरदार फटका बसला़ परंडा, भूम, वाशी व कळंब तालुक्यात पावसाची व वादळी वाऱ्याची तीव्रता अधिक होती़ परंडा व भूम तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब तसेच डीपीही आडव्या झाल्या आहेत़ परिणामी या भागातील वीजपुरवठा सायंकाळपर्यंत खंडीत होता़ सोमवारी सकाळी उमरगा तालुक्यातील येणेगूर परिसरात काहीकाळ जोरदार पाऊस झाला आहे़ या पावसामुळे उन्हाळी पिकांचे तसेच फळबागांचेही नुकसान झाले आहे़ शेतात पाणी साचल्याने परंडा, भूम तालुक्यातील शिवारांमध्ये कांदा तसेच पालेभाज्यांचे नुकसान झाले़ 

हिंगोलीतही वादळी वाराहिंगोली :  जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास सुसाट वाऱ्यासह वसमत तालुक्यातील आडगाव रंजे, हट्टा, शिरडशहापूर व कौठा येथे पाऊस झाला. तसेच सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सेनगाव तालुक्यात कडोळी, माझोड, तपोवन, गारखेडा, गोरेगाव परिसरात पाऊस झाला़ हळद उत्पादकांना फटका बसला आहे. 

नांदेड जिल्ह्यात फळपिकांचे नुकसान  नांदेड : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे  नांदेडसह बिलोली, नायगाव, हदगाव, माहूर, देगलूर, किनवट, लोहा, अर्धापूर या परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले़ त्यामुळे शेतातील ज्वारी, मका, तीळ या पिकांचे मोठे नुकसान झाले़ शेतकऱ्यांनी वाळत टाकलेल्या हळदीचेही या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.  अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील केळीनेही माना टाकल्या आहेत़   

जालना जिल्ह्यात फळबागांना फटका  जालना : जिल्ह्याच्या बहुतांश भागात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. बदनापूर तालुक्यातील कोठा जहांगीर, कोळगाव, माळेगाव, घनसावंगी तालुक्यातील देवहिवरा, सागर सहकारी साखर कारखाना, तनवाडी तर बदनापूर तालुक्यातील कंडारी, उज्जैनपुरी परिसरात गारपीट झाली. या गारपिटीमुळे अनेकांच्या शेतातील उन्हाळी बाजरीसह द्राक्ष, मोसंबी, चक्कू, पपई, केळी फळबागा, आंब्याला मोठा फटका बसला. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा परिसरातील भोपळ्याची शेतीही उद्ध्वस्त झाली आहे. अनेकांच्या शेतातील शेडनेटचेही मोठे नुकसान झाले. शिवाय कांदा बिजोत्पादनाही गारपिटीचा फटका बसला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRainपाऊसFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा