शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा मराठवाड्याला जबर फटका; ११ हजार हेक्टरवर नुकसान, संथ पंचनामे, मदत कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:04 IST

अवकाळीचा मराठवाड्याला जबर फटका;  वीज पडून २५ जणांचा मृत्यू; ४०० जनावरेही दगावली

छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यात सुमारे पंचवीस दिवसांच्या कालावधीत मराठवाड्याला अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसला. अवकाळी पावसाने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये बीड जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. एकट्या बीड जिल्ह्यात साडेचार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. वीज पडून आठही जिल्ह्यांत मिळून २५ असून, २९ जण जखमी झाले आहेत. तर सुमारे ४०० जनावरे दगावली आहेत. हळद, भुईमूग, ज्वारी, कांदा यासह केळी, आंबा या पिकांना मोठा फटका बसला आहे.

बीड आणि परभणी जिल्ह्यात काही घरांची पूर्णतः पडझड झाली असून, ८४ घरे अंशतः कोसळली आहेत. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. अवकाळी पावसाचा मराठवाड्यातील सुमारे ६०० गावांना फटका बसला असून, सात हजारांपेक्षा अधिक शेतकरी बाधित झाल्याची नोंद आहे.नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात हळद पिकाला मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात बागायती क्षेत्र असलेल्या ४३५४.७५ हेक्टर व फळ पिकांचे १६७.९२ हेक्टर, असे एकूण ४५२२. ६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

नांदेड : ४८१ हेक्टरचे नुकसानसुमारे १६ दिवस चाललेल्या या मान्सूनपूर्व पावसाने ७९२ शेतकऱ्यांची ४८१.६२ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. उन्हाळी हंगामातील तीळ, भुईमूग, ज्वारी, हळद, केळी, कांदा यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, बागायती व भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला आहे. तसेच नदी, नाल्यांना पूर आल्याने लगतची शेती खरडून नुकसान झाले आहे.  विजेच्या कडकडाटामुळे जिल्ह्यात दहा जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. नायगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील दोन शेतकरी वीज पडल्याने जखमी झाले असून, सांगवी येथील चंद्रकांत महागावे या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. विशेषतः नायगाव, मुखेड, मुदखेड, कंधार, उमरी, भोकर, धर्माबाद, देगलूर, किनवट, बिलोली, हदगाव, अर्धापूर तालुक्यांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. नायगाव तालुक्यात सुमारे ७०० शेतकऱ्यांचे ४१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या तालुक्यात १५६ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे.

बीड : साडेचार हजार हेक्टरला फटकाफळपिकांचे मोठे नुकसान; १४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या२२८.९ मिमी पाऊस झाला.अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यापासून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.१४ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे.शेतीचे नुकसान : बागायती ४३५४.७५ हेक्टर व फळपिके १६७.९२ हेक्टर, असे एकूण ४५२२. ६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

लातूर : फळपिकांचे मोठे नुकसानजिल्ह्यात शेतकरी आत्महत्या नाही२३९.४ मिमी पाऊस झाला.आंबा, पपई, खरबूज, चिकू, पेरूसह टोमॅटो, सिमला मिरची, शेवग्याचे नुकसान.जिल्ह्यात २ हजार ३८७. ०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान.महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू झाले आहेत.शेतकऱ्याच्या आत्महत्येची घटना नाही.

हिंगोली : मे महिन्यात १३६.८ मिलिमीटर- १२९.९० हेक्टरकेळी, पपई, हळद या पिकांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाकडून जिल्ह्यात पंचनामे सुरू आहेत.- मे महिन्यात ४ शेतकरी आत्महत्या झाल्या.

परभणी : १३१ मिलिमीटर पाऊस झाला.पिकांचे नुकसान झाले नाही. त्यामुळे पंचनामे नाहीत.मे महिन्यात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

सर्व आशा, अपेक्षांचा स्वप्नभंगरात्रंदिवस मेहनत करून टोमॅटोला चांगली बाजारपेठ मिळेल, या आशेने अडीच एकरांत टोमॅटोची यशस्वी लागवड केली. परंतु अवकाळी पावसाने शेतात पाणीच पाणी झाल्याने डोळ्यांदेखत टोमॅटोचा अक्षरशः चिखल झाला. त्यामुळे आमच्या सर्व आशा, अपेक्षांचा स्वप्नभंग झाला.-कृष्णा दादासाहेब थोरवे, शेतकरी, कुंडी वाहिरा, ता. आष्टी

शेतमालाचे पैसे नाही तर चिखलच हातीआमची पाच महिन्यांची मेहनत पाण्यात गेली. आमचे सर्व रस्ते बंद झालेत, मजुरांचे पैसे देणे बाकी आहे. सध्या पेरणीचे दिवस आलेत. खते, बी-बियाणे कुठून आणायचे? मुलांची फीस आहे. कांद्याचे पैसे हातात येण्याऐवजी कांद्याचा चिखलच आमच्या हाती आला आहे. आम्ही कसं करायचं?- महेश दरेकर, शेतकरी, शिदेवाडी, ता. आष्टी

वादळीवाऱ्याने प्रचंड नुकसानमे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस व वादळी वारे वाहिल्याने केळीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. दोन एकरांत केळीची लागवड केली होती. जवळपास ३ ते ४ लाख रुपयांचे वादळात नुकसान झाले आहे.-बालाजी जाधव, शेतकरी, म्हतारगाव, ता. वसमत

कांद्याची नासाडी झालीयावर्षी एका एकरमध्ये कांदा लागवड केली होती. लागवडीसाठी ३५ हजार रुपये खर्च झाला. ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने थैमान घातले. सतत पाऊस होत असल्याने कांद्याला जमिनीतच सड लागली. ७० टक्के कांद्याची नासाडी झाली.- इमरान खान अजमत खान पठाण, जवळा पांचाळ, ता. कळमनुरी

मदतीचा हात द्यावासततचा पाऊस आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो मदतीचा हात द्यावा. कारण, पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यातच अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांना फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.-योगेश पवार, चाभरा, ता. हदगाव.

टॅग्स :RainपाऊसCropपीकMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी