शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विद्यापीठाचा ‘जिवनसाधना’ पुरस्कार रा. श्री. मोरवंचीकर यांना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 18:56 IST

वर्धापन दिनी २३ ऑगस्टला प्रदान केला जाणार

ठळक मुद्देविद्यापीठाच्या इतिहास विभागात दिर्घ सेवा १३ जणांच्या प्रस्तावातून झाली निवड

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे देण्यात येणारा ‘जिवनसाधना’ पुरस्कार ज्येष्ठ इतिहासकार डॉ. रा.श्री. मोरवंचीकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारचे वितरण विद्यापीठाच्या वर्धापन दिनी शुक्रवारी (दि.२३) होणार आहे. याशिवाय विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यातुन प्रत्येक एक आदर्श परीक्षा केंद्राची निवड करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवेले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यापीठाच्या ६१ व्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी कुलगुरू डॉ. येवले यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रकुलगुरू डॉ. प्रविण वक्ते, कुलसचिव डॉ.  साधना पांडे, वित्त व लेखाधिकारी राजेंद्र मडके,परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा, विद्यार्थी विकास संचालक डॉ.मुस्तजिब खान उपस्थित होते.  यावेळी बोलताना डॉ. येवले म्हणाले, विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे संचालक डॉ. सच्चिदानंद जोशी, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे सल्लागार डॉ. दिलीप मालखेडे प्रमुख पाहुण म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे दोन्ही पाहुणे हेतु ठेवून बोलाविण्यात आले आहेत. तंत्रशिक्षण परिषदेसोबत विद्यापीठ विविध सेवासंदर्भात करार करणार आहे. तर कला केंद्राचे संचालक डॉ. जोशी यांच्या माध्यमातुन विद्यापीठात असलेली विविध प्रकारच्या गुणवत्तेला संधी मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. येवले यांनी स्पष्ट केले.

मागील काही वर्षांपासून विद्यापीठातर्फे भरमसाठ प्रमाणात जिवनगौरव पुरस्कारांची खिरापत वाटण्यात येत होती. ही खिरापत बंद करत केवळ विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील एका व्यक्तीला जिवनसाधना पुरस्कार देण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला होता. यानुसार संस्था, व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. एकुण १३ जणांनी प्रस्ताव पाठविले. त्यातील विद्यापीठाच्या इतिहास विभागात दिर्घ सेवा करणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रा.श्री. मोरवंचीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चार आदर्श परीक्षा केंद्र जाहीर  विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्कृष्ट परीक्षा घेणाऱ्या चार परीक्षांची निवड पुरस्कारसाठी करण्यात आली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातुन देवगिरी महाविद्यालय, जालनामधून बद्रीनारायण बारवाले, बीडमधून माजलगावचे सुंदरराव सोळुंके महाविद्यालय आणि उस्मानाबाद जिल्ह्यातुन आर.पी. महाविद्यालयाची निवड केल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. या महाविद्यालयांना सन्मानित केले जाणार आहे.  याशिवाय १८० विद्यार्थ्यांनी पारितोषिकांनी सन्मानित केले जाणार आहे.

१४ सप्टेंबर रोजी दीक्षांत सोहळा  विद्यापीठाचा दोन वर्षांपासून रखडलेला दीक्षांत सोहळा १४ सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुण म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा ३० आॅगस्टपूर्वी राज्यपालांच्या उपस्थितीत घेण्याचा मानस होता. मात्र राज्यपालांची मुदत ३१ आॅगस्ट रोजी संपत असल्यामुळे त्यांनी सोहळ्यास उपस्थित राहण्यास नकार दर्शविला. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी डॉ. पटवर्धन यांची वेळ मिळाल्यामुळे सोहळा आयोजित केल्याचेही कुलगुरूंनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेचे संयोजन संजय शिंदे यांनी केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद