शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखालील भुयारी मार्ग देशासाठी ठरेल मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 6:00 PM

संग्रामनगर रेल्वेफाटक बंद झाल्यापासून रहिवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पुलाखाली भुयारी मार्ग उभारण्याच्या कामाचा रविवारी शुभारंभ झाला.

औरंगाबाद : संग्रामनगर रेल्वेफाटक बंद झाल्यापासून रहिवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पुलाखाली भुयारी मार्ग उभारण्याच्या कामाचा  रविवारी शुभारंभ झाला. हा भुयारी मार्ग देशासाठी मॉडेल ठरणार असून, यापुढे रेल्वे उड्डाणपूल होईल तेथे भुयारी मार्ग उभारेल, असा निर्णय घेण्यात आल्याचे ‘दमरे’चे वरिष्ठ मंडळ अभियंता डी.डी. नागपुरे यांनी सांगितले. 

संग्रामनगर रेल्वे फाटकाजवळ भुयारी मार्गाचे भूमिपूजन अणि कोनशिला स्थापना समारंभ रविवारी (दि.१२) खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेविका शोभा बुरांडे, स्मिता घोगरे, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा, मेट्रो असोसिएशनचे श्रीमंत गोर्डे पाटील, डॉ. प्रेम खडकीकर, शिवानंद वाडकर, प्रदीप बुरांडे, किशोर शितोळे, भाऊ सुरडकर, ‘दमरे’चे मंडळ अभियंता सुजितकुमार, सहायक अभियंता खोब्रे आदी उपस्थित होते. 

डी.डी. नागपुरे म्हणाले की, संग्रामनगरमुळे ‘संग्राम’ झाला आहे. रेल्वे उड्डाणपूल होईल तेथे भुयारी मार्ग करण्याचे धोरण ठरविण्यात आले. त्याचा देशभरात फायदा होईल. खा. खैरे म्हणाले की, उड्डाणपूल झाल्यानंतर फाटक बंद करण्याचा रेल्वेचा नियम आहे. नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली; परंतु फाटक बंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. संग्रामनगर येथील नागरिकांमुळे रेल्वेचा नियम बदलला. भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. त्याचा देशासाठी फायदा झाला. रेल्वेस्टेशन एमआयडीसीतून बायपासला जोडणाऱ्या पुलासाठी ‘एमआयडीसी’ने पैसे दिले पाहिजेत. 

नागरिकांची दिवाळीदोन वर्षांपूर्वी रेल्वे फाटक बंद केले. ये-जा करण्यासाठी होणाऱ्या अडचणींमुळे नागरिकांनी आंदोलन केले. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडे चकरा माराव्या लागल्या. निधीचा प्रश्न होता. या सगळ्या अडचणींनंतर भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. भुयारी मार्ग झाल्यानंतर नागरिक खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील, असे श्रीमंत गोर्डे पाटील म्हणाले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबाद