जिल्हा निर्मितीबाबत उदगीरकरांची निराशा
By Admin | Updated: June 16, 2014 01:15 IST2014-06-16T00:33:51+5:302014-06-16T01:15:03+5:30
उदगीर : गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेला उदगीरकरांचा नवीन जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाला राज्य शासनाने अखेर बगल दिली़

जिल्हा निर्मितीबाबत उदगीरकरांची निराशा
उदगीर : गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेला उदगीरकरांचा नवीन जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाला राज्य शासनाने अखेर बगल दिली़ त्यामुळे उदगीरकरांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे़ दरम्यान, उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांनी उदगीर जिल्हा निर्मितीसंदर्भात विधानसभेत औचित्याचा मुद्दा मांडला आहे़
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती राज्य शासनाने केली आहे़ मराठवाड्यात बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई या नव्या जिल्ह्याची तर लातूर जिल्हयचे विभाजन करून उदगीर या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे़ पलघर जिल्हयच्या निर्मितीबरोबर राजय शासनाकडून मराठवाड्याला विश्ेषत: उदगीरकरांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती़ परंतु, शुक्रवारी मंत्रिमंडळाने केवळ ठाणे जिल्ह्याच्या विभाजनालाच मंजुरी दिल्याने उदगीरकरांच्या अपेक्षांवर पुन्हा पाणी फेरले गेले आहे़ लातूर जिल्ह्याचे विभाजन करून उदगीर या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे़ उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांनी सन २०११ च्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न क्रमांक ६२७९ नुसार अंतारांकित प्रश्न उपस्थित केला होता़
त्यावेळी तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी उदगीरला जिल्ह्याचा दर्जा देण्याबाबत शासनाचे नियोजन असल्याचे जाहीर केले होते़ पुन्हा आ़ भालेराव यांनी या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडला आहे़ उदगीरला जिल्ह्याचा दर्जा मिळावा यासाठी उदगी येथे उदगीर जिल्हा निर्मिती कृती समितीची स्थापना करण्यात आली़ या कृती समितीने वेळोवेळी आंदोलने केली़ शिवाय सर्वपक्षीय नेत्यांनी अनेकवेळा उदगीरला जिल्ह्याचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत़ शिवाय, तत्कालिन आमदार व लोकशाळी आघाडी समन्वयक समितीचे अध्यक्ष प्रा़एऩडी़पाटील यांनीही विधीमंडळात ८ फेब्रुवारी १९८९ रोजी प्रश्न उपस्थित करून विधिमंडळात चर्चा केली होती़
सीमा प्रश्नाचा तिढा उदगीर जिल्हा निर्मितीने सुटू शकेल, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व माजी आ़ कै़ बापूसाहेब पाटील एकंबेकर यांनी मांडले होते़ शासन दरबारी त्यांनी यासाठी मोठा पाठपुरावाही केला होता़ उदगीरकरांच्या या मागणीला अजून यश आले नसले तरी शासन दरबारी मात्र या प्रश्नाचे भीजत घोंगडे पडले आहे़(वार्ताहर)