शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

ठाकरेंचा मोठा निर्णय; बंडखोर जैस्वालांची उचलबांगडी, किशनचंद तनवाणी नवे महानगर प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 17:05 IST

उद्धव ठाकरेंकडून माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यावर महानगर प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे 

औरंगाबाद: शिवसेनेत मागील काही वर्षांपासून बाजूला पडलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यावर अखेर उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल यांची उचलबांगडी करत तनवाणी यांना महानगर प्रमुख पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे. यामुळे जैस्वाल आणि तनवाणी यांच्या मैत्री व प्रतीस्पर्धेचा नवा अंक आता पाहण्यास मिळणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत सुरु असताना अचानक शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडात शिवसेनेच्या ४० आमदारांचा सहभाग आहे. या बंडात औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे ५ आमदारांचा समावेश आहे. औरंगाबाद मध्ये विधानसभेचे आमदार प्रदीप जैस्वाल हे देखील शिंदे गटात सामील आहेत. दरम्यान, सत्तांतरानंतर शिंदे गट आता पक्षावर देखील वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बंडखोरांची त्यांच्या पदावरून उचलबांगडी करत आहेत. आता ठाकरे यांनी आ. जैस्वाल यांचे महानगरप्रमुख पद काढून घेत त्याजागी शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती केली आहे. तनवाणी आणि जैस्वाल यांचे मैत्री, एकमेकांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवणे असे अनेक किस्से आजही चर्चिले जातात. यामुळे शहरात पुन्हा एकदा जैस्वाल विरुद्ध तनवाणी असा सामना रंगणार आहे.

भाजप प्रवेश, पुन्हा घरवापसी आणि महानगरप्रमुख पद माजी आमदार किशनचंद तानवाणी हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून भाजपमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल विरुद्ध भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर तनवाणी पुन्हा शिवसेनेत परतले. परंतु, त्यांच्यावर पक्षाने कोणतीही जबाबदारी टाकली नव्हती. सेनेत बंडखोरी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी योग्य निर्णय घ्या अशा आशयाचे होर्डिंग शहरात लावले होते. तनवाणी मोठा निर्णय घेतील असे वाटत असताना आता त्यांची आगामी माहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचा वाढलेला प्रभाव, बंडखोर आमदारांची रणनीती आणि एमआयएमचे वाढते प्रस्थ अशी आव्हाने तनवाणी यांच्या पुढे आहेत. 

पक्ष बळकट करण्याचे लक्ष पक्षातील काही पदाधिकारी बंडखोर आमदारांकडे जात आहेत. मात्र, खरा शिवसैनिक टिकून आहे. आगामी काळात पक्ष वाढविण्यावर लक्ष असेल. शिवसैनिकांना बळ देण्याचे पहिले कार्य करणार असून त्यानंतर महापलिका निवडणुकांची तयारी करू. विधानसभा लढण्याचा विचार अद्याप केलेला नाही, पक्ष जो निर्णय घेईल त्यासाठी झोकून देऊन काम करत राहणार.- किशनचंद तनवाणी, महानगर प्रमुख, औरंगाबाद

टॅग्स :AurangabadऔरंगाबादKishanchand Tanvaniकिशनचंद तनवाणीShiv Senaशिवसेना