शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंचा मोठा निर्णय; बंडखोर जैस्वालांची उचलबांगडी, किशनचंद तनवाणी नवे महानगर प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 17:05 IST

उद्धव ठाकरेंकडून माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यावर महानगर प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे 

औरंगाबाद: शिवसेनेत मागील काही वर्षांपासून बाजूला पडलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यावर अखेर उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल यांची उचलबांगडी करत तनवाणी यांना महानगर प्रमुख पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे. यामुळे जैस्वाल आणि तनवाणी यांच्या मैत्री व प्रतीस्पर्धेचा नवा अंक आता पाहण्यास मिळणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत सुरु असताना अचानक शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडात शिवसेनेच्या ४० आमदारांचा सहभाग आहे. या बंडात औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे ५ आमदारांचा समावेश आहे. औरंगाबाद मध्ये विधानसभेचे आमदार प्रदीप जैस्वाल हे देखील शिंदे गटात सामील आहेत. दरम्यान, सत्तांतरानंतर शिंदे गट आता पक्षावर देखील वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बंडखोरांची त्यांच्या पदावरून उचलबांगडी करत आहेत. आता ठाकरे यांनी आ. जैस्वाल यांचे महानगरप्रमुख पद काढून घेत त्याजागी शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती केली आहे. तनवाणी आणि जैस्वाल यांचे मैत्री, एकमेकांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवणे असे अनेक किस्से आजही चर्चिले जातात. यामुळे शहरात पुन्हा एकदा जैस्वाल विरुद्ध तनवाणी असा सामना रंगणार आहे.

भाजप प्रवेश, पुन्हा घरवापसी आणि महानगरप्रमुख पद माजी आमदार किशनचंद तानवाणी हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून भाजपमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल विरुद्ध भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर तनवाणी पुन्हा शिवसेनेत परतले. परंतु, त्यांच्यावर पक्षाने कोणतीही जबाबदारी टाकली नव्हती. सेनेत बंडखोरी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी योग्य निर्णय घ्या अशा आशयाचे होर्डिंग शहरात लावले होते. तनवाणी मोठा निर्णय घेतील असे वाटत असताना आता त्यांची आगामी माहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचा वाढलेला प्रभाव, बंडखोर आमदारांची रणनीती आणि एमआयएमचे वाढते प्रस्थ अशी आव्हाने तनवाणी यांच्या पुढे आहेत. 

पक्ष बळकट करण्याचे लक्ष पक्षातील काही पदाधिकारी बंडखोर आमदारांकडे जात आहेत. मात्र, खरा शिवसैनिक टिकून आहे. आगामी काळात पक्ष वाढविण्यावर लक्ष असेल. शिवसैनिकांना बळ देण्याचे पहिले कार्य करणार असून त्यानंतर महापलिका निवडणुकांची तयारी करू. विधानसभा लढण्याचा विचार अद्याप केलेला नाही, पक्ष जो निर्णय घेईल त्यासाठी झोकून देऊन काम करत राहणार.- किशनचंद तनवाणी, महानगर प्रमुख, औरंगाबाद

टॅग्स :AurangabadऔरंगाबादKishanchand Tanvaniकिशनचंद तनवाणीShiv Senaशिवसेना