शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

Uddhav Thackeray: 'ओला दुष्काळसाठी कसले निकष, आता मंत्र्यांना चिखलात बुडवून काढायचं का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 15:38 IST

उद्धव ठाकरेंना या दौऱ्यात एका शेतकऱ्याने आसूड भेट देत सरकारला वठणीवर आणण्याची मागणी केली.

औरंगाबाद - राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी १ वाजता औरंगाबाद विमानतळावर पोहोचले. त्यांचं जल्लोषात स्वागतही करण्यात आलं. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी नियोजनानुसार दहेगाव आणि पेंढापूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी, शेतकऱ्यांनी आपली नुकसान झाल्याचं सांगत, व्यथाच मांडली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह सरकारवर जोरदार प्रहार केला. तसेच, शेतकऱ्यांनो सरकारवर आसूड चालवा, मी तुमच्यासोबत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली.   

उद्धव ठाकरेंना या दौऱ्यात एका शेतकऱ्याने आसूड भेट देत सरकारला वठणीवर आणण्याची मागणी केली. त्यावेळी. तुमच्या हाती आसूड आहे, तो तुमच्या हातात शोभून दिसतो. आमच्या हातात फोटोपुरता घेऊन तो शोभणार नाही. तुम्ही तो आसूड दाखवून सरकारला घाम फोडा, यासाठी शिवसेना तुमच्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी सराकारला सवाल केला आहे. 

ओला दुष्काळ सरकारला दिसत नसेल, दिसत असूनही डोळेझाक करत असेल. माझ्याशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली, निदान बळीराजाशी तरी गद्दारी करू नका. मला कृषीमंत्र्यांची कीव येते, तुम्हाला आसुरी महत्त्वाकांक्षा असतील. पण, ज्या एका कारणासाठी तुम्ही सत्तांतर घडवलं. पण, निदान अन्नदात्याशी तरी गद्दारी करु नका. आणखी काय हवं, म्हणजे तुम्हाला ओला दुष्काळ म्हणावं लागेल. माझा शेतकरी दादा खोटं बोलू शकत नाही हा मला विश्वास आहे. त्यामुळेच, मी ऐन दिवाळीत इथं आलोय, माझ्यासोबत तुम्हीही आल्यानंतर येथील परिस्थिती, सत्य महाराष्ट्राला, देशाला दिसेल,असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

ओला दुष्काळ नक्कीच जाहीर झाला पाहिजे, मी आमची मागणी आहे. अतिवृष्टीमुळे पीकांची नासाडी झालीय, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असा विभाग आहे. हे केवळ प्रतिकात्मक आहे. आता, ओला दुष्काळाचे निकष लावण्यासाठी मंत्र्यांना चिखलात बुचकळून काढायचं का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. निकष लावण्यासाठी नेमकं करायचं काय, हे केवळ सरकार उत्सवी आहे, मी गरज पडल्यास रस्त्यावर उतरेन. मी विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरणार नाही. तर, मी शेतकऱ्यांचा आवाज बनून रस्त्यावर उतरणार, अशी घोषणाच उद्धव ठाकरेंनी केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादAbdul Sattarअब्दुल सत्तारFarmerशेतकरी