शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
4
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
5
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
6
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
7
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
8
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
9
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
10
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
11
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
12
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
13
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
14
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
15
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
16
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
17
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
18
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
19
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
20
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

Uddhav Thackeray: 'ओला दुष्काळसाठी कसले निकष, आता मंत्र्यांना चिखलात बुडवून काढायचं का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 15:38 IST

उद्धव ठाकरेंना या दौऱ्यात एका शेतकऱ्याने आसूड भेट देत सरकारला वठणीवर आणण्याची मागणी केली.

औरंगाबाद - राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी १ वाजता औरंगाबाद विमानतळावर पोहोचले. त्यांचं जल्लोषात स्वागतही करण्यात आलं. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी नियोजनानुसार दहेगाव आणि पेंढापूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी, शेतकऱ्यांनी आपली नुकसान झाल्याचं सांगत, व्यथाच मांडली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह सरकारवर जोरदार प्रहार केला. तसेच, शेतकऱ्यांनो सरकारवर आसूड चालवा, मी तुमच्यासोबत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली.   

उद्धव ठाकरेंना या दौऱ्यात एका शेतकऱ्याने आसूड भेट देत सरकारला वठणीवर आणण्याची मागणी केली. त्यावेळी. तुमच्या हाती आसूड आहे, तो तुमच्या हातात शोभून दिसतो. आमच्या हातात फोटोपुरता घेऊन तो शोभणार नाही. तुम्ही तो आसूड दाखवून सरकारला घाम फोडा, यासाठी शिवसेना तुमच्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी सराकारला सवाल केला आहे. 

ओला दुष्काळ सरकारला दिसत नसेल, दिसत असूनही डोळेझाक करत असेल. माझ्याशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली, निदान बळीराजाशी तरी गद्दारी करू नका. मला कृषीमंत्र्यांची कीव येते, तुम्हाला आसुरी महत्त्वाकांक्षा असतील. पण, ज्या एका कारणासाठी तुम्ही सत्तांतर घडवलं. पण, निदान अन्नदात्याशी तरी गद्दारी करु नका. आणखी काय हवं, म्हणजे तुम्हाला ओला दुष्काळ म्हणावं लागेल. माझा शेतकरी दादा खोटं बोलू शकत नाही हा मला विश्वास आहे. त्यामुळेच, मी ऐन दिवाळीत इथं आलोय, माझ्यासोबत तुम्हीही आल्यानंतर येथील परिस्थिती, सत्य महाराष्ट्राला, देशाला दिसेल,असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

ओला दुष्काळ नक्कीच जाहीर झाला पाहिजे, मी आमची मागणी आहे. अतिवृष्टीमुळे पीकांची नासाडी झालीय, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असा विभाग आहे. हे केवळ प्रतिकात्मक आहे. आता, ओला दुष्काळाचे निकष लावण्यासाठी मंत्र्यांना चिखलात बुचकळून काढायचं का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. निकष लावण्यासाठी नेमकं करायचं काय, हे केवळ सरकार उत्सवी आहे, मी गरज पडल्यास रस्त्यावर उतरेन. मी विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरणार नाही. तर, मी शेतकऱ्यांचा आवाज बनून रस्त्यावर उतरणार, अशी घोषणाच उद्धव ठाकरेंनी केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादAbdul Sattarअब्दुल सत्तारFarmerशेतकरी