शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

Uddhav Thackeray: 'ओला दुष्काळसाठी कसले निकष, आता मंत्र्यांना चिखलात बुडवून काढायचं का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 15:38 IST

उद्धव ठाकरेंना या दौऱ्यात एका शेतकऱ्याने आसूड भेट देत सरकारला वठणीवर आणण्याची मागणी केली.

औरंगाबाद - राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी १ वाजता औरंगाबाद विमानतळावर पोहोचले. त्यांचं जल्लोषात स्वागतही करण्यात आलं. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी नियोजनानुसार दहेगाव आणि पेंढापूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी, शेतकऱ्यांनी आपली नुकसान झाल्याचं सांगत, व्यथाच मांडली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह सरकारवर जोरदार प्रहार केला. तसेच, शेतकऱ्यांनो सरकारवर आसूड चालवा, मी तुमच्यासोबत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली.   

उद्धव ठाकरेंना या दौऱ्यात एका शेतकऱ्याने आसूड भेट देत सरकारला वठणीवर आणण्याची मागणी केली. त्यावेळी. तुमच्या हाती आसूड आहे, तो तुमच्या हातात शोभून दिसतो. आमच्या हातात फोटोपुरता घेऊन तो शोभणार नाही. तुम्ही तो आसूड दाखवून सरकारला घाम फोडा, यासाठी शिवसेना तुमच्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी सराकारला सवाल केला आहे. 

ओला दुष्काळ सरकारला दिसत नसेल, दिसत असूनही डोळेझाक करत असेल. माझ्याशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली, निदान बळीराजाशी तरी गद्दारी करू नका. मला कृषीमंत्र्यांची कीव येते, तुम्हाला आसुरी महत्त्वाकांक्षा असतील. पण, ज्या एका कारणासाठी तुम्ही सत्तांतर घडवलं. पण, निदान अन्नदात्याशी तरी गद्दारी करु नका. आणखी काय हवं, म्हणजे तुम्हाला ओला दुष्काळ म्हणावं लागेल. माझा शेतकरी दादा खोटं बोलू शकत नाही हा मला विश्वास आहे. त्यामुळेच, मी ऐन दिवाळीत इथं आलोय, माझ्यासोबत तुम्हीही आल्यानंतर येथील परिस्थिती, सत्य महाराष्ट्राला, देशाला दिसेल,असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

ओला दुष्काळ नक्कीच जाहीर झाला पाहिजे, मी आमची मागणी आहे. अतिवृष्टीमुळे पीकांची नासाडी झालीय, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असा विभाग आहे. हे केवळ प्रतिकात्मक आहे. आता, ओला दुष्काळाचे निकष लावण्यासाठी मंत्र्यांना चिखलात बुचकळून काढायचं का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. निकष लावण्यासाठी नेमकं करायचं काय, हे केवळ सरकार उत्सवी आहे, मी गरज पडल्यास रस्त्यावर उतरेन. मी विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरणार नाही. तर, मी शेतकऱ्यांचा आवाज बनून रस्त्यावर उतरणार, अशी घोषणाच उद्धव ठाकरेंनी केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादAbdul Sattarअब्दुल सत्तारFarmerशेतकरी