शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

‘घरात घुसलात तर सोडणार नाही’, उद्धव ठाकरे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 12:08 IST

‘तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो’ या सूत्रानुसार आम्ही २५ वर्षे भाजपला जपले, जोपासले. त्यांना प्रत्येक वेळी मदत केली. पण हे आता आमच्याच घरात घुसायला निघालेत. आता सोडणार नाही

विहामांडवा (जि. औरंगाबाद): ‘तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो’ या सूत्रानुसार आम्ही २५ वर्षे भाजपला जपले, जोपासले. त्यांना प्रत्येक वेळी मदत केली. पण हे आता आमच्याच घरात घुसायला निघालेत. आता सोडणार नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला.पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवसेना एकटी लढल्यानंतर नुकसान होणार, एवढेच खासदार, आमदार निवडून येणार अशी गणिते मांडली जात आहेत. नुकसान कोणाचे होणार हे कळेलच. शेतकºयांना न्याय देण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली होती. जनतेला २०२२ पर्यंत हे देऊ, ते देऊ असे सांगत आहे. पण तुम्ही तोपर्यंत राहणार आहात का? कारण जनताच तुमचा निकाल लावणार आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.डल्ला मारणारे करताहेत हल्लाबोल-सध्या काहीजण रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना सत्तेत असून विरोधाची भूमिका घेत असल्याची टीका करतात; पण स्वत:साठी कधीतरी टीका केली का? जनतेच्या हितासाठीच सरकारवर टीका करत आहोत. दिल्ली ते गल्लीपर्यंत डल्ला करणारेच हल्लाबोल करत आहेत, अशी टीका ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. मात्र भाषणात सतत अडथळा येत होता.हे तरअधर्मी सरकार : केवळ जाहिरातबाजी करणाºया केंद्र आणि राज्य सरकारवरचा शेतकरी व सर्वसामान्यांचा विश्वास उडाला असून, धर्माला आत्महत्या करायला लावणारे हे अधर्मी सरकार असल्याची टीका, उद्धव ठाकरे यांनी जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद