शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

दोन रेल्वे रद्द, खाजगी बसगाड्या निम्म्यावर, मुंबईच्या विमानाला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:24 IST

मुंबईत बरसणाऱ्या पावसामुळे मंगळवारी औरंगाबादहून मुंबईला जाणाºया प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले. मुंबईहून येणारी आणि मुंबईला जाणारी तपोवन एक्स्प्रेस रद्द झाली. नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिकपर्यंतच धावली. याबरोबर मुंबईतील पावसामुळे अनेकांनी प्रवास टाळल्याने एसटी आणि खाजगी बसच्या संख्येवरही परिणाम झाला. त्याबरोबर मुंबईहून येणाºया विमानालाही दोन तास विलंब झाला.

ठळक मुद्देमुंबईतील पावसाचा परिणाम : प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

औरंगाबाद : मुंबईत बरसणाऱ्या पावसामुळे मंगळवारी औरंगाबादहून मुंबईला जाणाºया प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले. मुंबईहून येणारी आणि मुंबईला जाणारी तपोवन एक्स्प्रेस रद्द झाली. नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिकपर्यंतच धावली. याबरोबर मुंबईतील पावसामुळे अनेकांनी प्रवास टाळल्याने एसटी आणि खाजगी बसच्या संख्येवरही परिणाम झाला. त्याबरोबर मुंबईहून येणाºया विमानालाही दोन तास विलंब झाला.मुंबई परिसरातील जोरदार पावसामुळे आणि सोमवारी मुंबई-पुणेदरम्यान झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे अनेक रेल्वेंवर परिणाम झाला. यामुळे २ जुलै रोजी सुटणाºया मुंबई-नांदेड-मुंबई या दोन्ही तपोवन एक्स्प्रेस (१७६१७-१७६१८) रद्द करण्यात आल्या. तसेच १ जुलैला सुटलेली नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस (११४०२) नाशिकपर्यंतच धावली. २ जुलैला सुटणारी मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेसही (११४०१) नाशिक येथूनच सोडण्यात आली.१८ बोगींच्या तपोवन एक्स्प्रेसने औरंगाबादहून दररोज तीनशे ते चारशे प्रवासी मुंबईला जातात. मुंबईतील पावसामुळे रेल्वे रद्द झाल्याची माहिती अनेक प्रवाशांपर्यंत पोहोचलेली नव्हती. त्यामुळे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अनेक प्रवासी रेल्वेस्टेशनवर दाखल झाले होते. मात्र, याठिकाणी आल्यानंतर रेल्वे रद्द झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे रेल्वेस्टेशनहून माघारी फिरण्याची वेळ अनेकांवर आली. रेल्वे रद्द झाल्याने अनेकांनी तिकीट रद्द करून रिफं ड घेण्यासाठी आरक्षण कार्यालयात गर्दी केली होती. मुंबईला जाणे आवश्यक असल्याने अनेक जण खाजगी बसकडे वळले. मात्र, याठिकाणी अधिक रक्कम मोजावी लागत असल्याचा अनुभव अनेकांना आला.प्रवासी घटलेएसटी महामंडळाच्या मुंबईसाठी पाच बस धावतात. पावसाळ्यात एसटी प्रवासी संख्येवर परिणाम होत असतो. त्यात मुंबईत पाऊस सुरू असल्याने मुंबईला जाणाºया प्रवाशांची संख्या कमी झाल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. औरंगाबादहून दररोज ३० खाजगी बस मुंबईला जातात; परंतु ही संख्या अर्धी झाल्याची माहिती औरंगाबाद बस ओनर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे राजन हौजवाला यांनी दिली.विमानाला उशीरएअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद विमान दुपारी ३.२५ वा. उड्डाण करते. सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास हे विमान औरंगाबादला येते; परंतु या विमानाला जवळपास दोन तास विलंब झाल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस