शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

उद्याच्या शटडाऊननंतर दोन एमएलडी पाणी वाढणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 17:54 IST

शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जायकवाडीत वीज वितरण कंपनी दुरुस्तीचे काम करणार आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी मनपाच्या पाणीपुरवठ्याचा खंडणकाळ नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

औरंगाबाद : शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जायकवाडीत वीज वितरण कंपनी दुरुस्तीचे काम करणार आहे. याच कालावधीत महापालिका तीन ठिकाणी असणारी पाणीगळती थांबविणार आहे. फारोळा, नक्षत्रवाडी आणि ढोरकीन येथेही पंपगृहाची कामे युद्धपातळीवर करण्यात येणार आहेत. या कामांमुळे शहराच्या पाण्यात किमान दोन एमएलडीने वाढ होणार आहे. याशिवाय काही अंशी पाणीवितरणही (डिस्चार्ज) वाढणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे महापौर नंदकुमार घोडेले यांना देण्यात आली.

बुधवारी दुपारी महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. शुक्रवारी खंडणकाळात वीज कंपनी, मनपातर्फे कोणकोणती कामे करण्यात येणार आहेत, याचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत  कोल्हे यांनी नमूद केले की, मागील सहा महिन्यांपासून महावितरण कंपनीला शटडाऊन पाहिजे होते. दसरा आणि दिवाळीच्या मध्ये खंडणकाळाला आयुक्तांनी मंजुरी दिली. अवघ्या सहा तासांमध्ये महापालिका आणि महावितरण कंपनी संपूर्ण ताकदीने विविध दुरुस्तीची कामे करणार आहे. शुक्रवार आणि शनिवारी औरंगाबादकरांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. नागरिकांनी सध्या असलेले पाणी फेकून न देता जपून ठेवावे, असे आवाहनही मनपातर्फे करण्यात आले आहे.

मनपातर्फे होणारी मोठी कामेढोरकीन येथे दोन ठिकाणी जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येईल. ढाकेफळ येथे काही व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात येणार आहे. ढोरकीन येथे पाण्याची गळती थांबविण्यात येणार आहे. आर.एल. स्टीलजवळ मोठा व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यात येईल. अजित सीडस्जवळही एक मोठी दुरुस्ती आहे.

दुरुस्तीचे फायदे कायजायकवाडीत वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. भविष्यात हा त्रास कमी होईल. धरणातून पाणी ओढण्याची क्षमता पूर्वीच्या तुलनेत वाढणार आहे. दोन एमएलडी पाण्याची वाढ विविध कामे झाल्यावर अपेक्षित आहे. जायकवाडी, फारोळा, नक्षत्रवाडी, ढोरकीन येथे पंपगृहांसह छोटी-मोठी कामे करण्यात येतील.

उपाययोजना कराशुक्रवारी शहरात अजिबात पाणीपुरवठा होणार नाही. शहरात महापालिकेच्या मालकीचे ७९ टँकर आहेत. हे सर्व टँकर आणीबाणीच्या परिस्थितीसाठी म्हणून भरून ठेवण्यात यावेत, अशी सूचना महापौर घोडेले यांनी केली. शहरातील काही पाण्याच्या टाक्यांमध्ये आणीबाणी म्हणून पाणी साठवून ठेवावे. मागणी खूपच वाढल्यास या टाक्यांमधील पाणी टँकरने द्यावे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाmahavitaranमहावितरणJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी