शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

उद्याच्या शटडाऊननंतर दोन एमएलडी पाणी वाढणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 17:54 IST

शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जायकवाडीत वीज वितरण कंपनी दुरुस्तीचे काम करणार आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी मनपाच्या पाणीपुरवठ्याचा खंडणकाळ नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

औरंगाबाद : शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जायकवाडीत वीज वितरण कंपनी दुरुस्तीचे काम करणार आहे. याच कालावधीत महापालिका तीन ठिकाणी असणारी पाणीगळती थांबविणार आहे. फारोळा, नक्षत्रवाडी आणि ढोरकीन येथेही पंपगृहाची कामे युद्धपातळीवर करण्यात येणार आहेत. या कामांमुळे शहराच्या पाण्यात किमान दोन एमएलडीने वाढ होणार आहे. याशिवाय काही अंशी पाणीवितरणही (डिस्चार्ज) वाढणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे महापौर नंदकुमार घोडेले यांना देण्यात आली.

बुधवारी दुपारी महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. शुक्रवारी खंडणकाळात वीज कंपनी, मनपातर्फे कोणकोणती कामे करण्यात येणार आहेत, याचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत  कोल्हे यांनी नमूद केले की, मागील सहा महिन्यांपासून महावितरण कंपनीला शटडाऊन पाहिजे होते. दसरा आणि दिवाळीच्या मध्ये खंडणकाळाला आयुक्तांनी मंजुरी दिली. अवघ्या सहा तासांमध्ये महापालिका आणि महावितरण कंपनी संपूर्ण ताकदीने विविध दुरुस्तीची कामे करणार आहे. शुक्रवार आणि शनिवारी औरंगाबादकरांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. नागरिकांनी सध्या असलेले पाणी फेकून न देता जपून ठेवावे, असे आवाहनही मनपातर्फे करण्यात आले आहे.

मनपातर्फे होणारी मोठी कामेढोरकीन येथे दोन ठिकाणी जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येईल. ढाकेफळ येथे काही व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात येणार आहे. ढोरकीन येथे पाण्याची गळती थांबविण्यात येणार आहे. आर.एल. स्टीलजवळ मोठा व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यात येईल. अजित सीडस्जवळही एक मोठी दुरुस्ती आहे.

दुरुस्तीचे फायदे कायजायकवाडीत वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. भविष्यात हा त्रास कमी होईल. धरणातून पाणी ओढण्याची क्षमता पूर्वीच्या तुलनेत वाढणार आहे. दोन एमएलडी पाण्याची वाढ विविध कामे झाल्यावर अपेक्षित आहे. जायकवाडी, फारोळा, नक्षत्रवाडी, ढोरकीन येथे पंपगृहांसह छोटी-मोठी कामे करण्यात येतील.

उपाययोजना कराशुक्रवारी शहरात अजिबात पाणीपुरवठा होणार नाही. शहरात महापालिकेच्या मालकीचे ७९ टँकर आहेत. हे सर्व टँकर आणीबाणीच्या परिस्थितीसाठी म्हणून भरून ठेवण्यात यावेत, अशी सूचना महापौर घोडेले यांनी केली. शहरातील काही पाण्याच्या टाक्यांमध्ये आणीबाणी म्हणून पाणी साठवून ठेवावे. मागणी खूपच वाढल्यास या टाक्यांमधील पाणी टँकरने द्यावे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाmahavitaranमहावितरणJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी