शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शेतीसाठी ड्रेनेजमधून पाणी घेणाऱ्या तीन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:30 IST

ड्रेनेजचे पाणी चोरणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या मनपा पथकावर दगडफेक करण्यात आली होती

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेमधून शेतीसाठी चोरून वीज आणि पाणी घेताना तीन शेतकऱ्यांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज, सोमवारी (दि. १८ ) दुपारी २ वाजेच्या सुमारास पावरलूम परिसरात घडली. यासोबतच चार शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. 

हर्सूल परिसर ते झाल्टापर्यंत महानगरपालिकेच्या भूमिगत गटार योजनेतून शहराचे सांडपाणी वाहते. यातील पाण्यावर काही शेतकरी शहराच्या आसपासच्या भागात शेती करतात. पावरलूम परिसरात अशाच प्रकारे ड्रेनेजचे पाणी चोरून शेती केली जाते. आज दुपारी या भागातील ड्रेनेज लाईनवरील चेंबरवर लावलेल्या पाण्याच्या मोटारीस दुरुस्त करताना तीन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या चार शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच नागरिकांनी सुद्धा बचावकार्य सुरु केले आहे. जनार्दन विठ्ठल साबळे (55), दिनेश जगन्नाथ दराखे (40, दोघे रा. चिकलठाणा) व रामेश्वर केरुबा डांबे (रा.निकलक, ता. बदनापूर,जालना )  अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. मृतामधील रामेश्वर यांचा मृतदेह अद्याप मिळाला नाही. तर रामकिसन माने , उमेश कावडे, प्रकाश केरुबा वाघमारे आणि नवनाथ रंगनाथ कावडे (रा. चिखलठाणा ) या चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरु आहेत. घटनेने खळबळ उडाली आहे. 

मनपा पथकावर केली होती दगडफेक मागील काही दिवसांपासून शहराच्या जवळील शेतीसाठी भूमिगत गटारीमधून शेतकरी पाणी चोरत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली. न्यायालयाने याची नोंद घेत महानगरपालिकेने या शेतकऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी असे आदेश दिले. यानुसार महानगरपालिकेची पथक दोन वेळेस या भागात कारवाईसाठी गेले होते. मात्र, शेतकऱ्याने दगडफेक केल्याने पथकाला माघार घ्यावी लागली होती. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDeathमृत्यूFarmerशेतकरीPoliceपोलिसagricultureशेती