सौर कालगणना ग्लोबल होण्यासाठी स्वत:पासून प्रयत्न करा

By Admin | Updated: June 23, 2014 00:32 IST2014-06-23T00:13:45+5:302014-06-23T00:32:25+5:30

औरंगाबाद : भारतीय सौर कालगणना ही संपूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे.

Try yourself out to become a global solar chassis | सौर कालगणना ग्लोबल होण्यासाठी स्वत:पासून प्रयत्न करा

सौर कालगणना ग्लोबल होण्यासाठी स्वत:पासून प्रयत्न करा

औरंगाबाद : भारतीय सौर कालगणना ही संपूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे. सूर्याला केंद्रबिंदू मानून वर्षातील १२ महिने ३६५ दिवसांची अचूक गणिती मांडणी यात करण्यात आली आहे. पाश्चात्त्य कालगणना या चुकीच्या, विसंगत तत्त्वावर आधारित आहेत. याकरिता भारतीय सौर कालगणनेला जागतिक स्तरावर रुजविण्यासाठी सर्वप्रथम तिचा वापर आपल्या दैनंदिन जीवनापासून करा, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी केले.
सौर कालगणना प्रचार-प्रसार मंच, ऊर्जा सहयोगी व स्वदेशी जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ‘सौर कालगणना’ या विषयावर ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या व्यासपीठावर न्या. अंबादास जोशी, केशवराव डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ऊर्जा सहयोग प्रकाशित एस.बी. कुलकर्णी व विष्णू देशपांडेलिखित ‘इन्व्हर्टर’ (अखंड वीजपुरवठा संयंत्र) या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जलतज्ज्ञ चितळे म्हणाले की, सूर्यावर आधारित कालगणनेवरील ग्रंथ चौथ्या शतकात लिहिण्यात आला आहे. त्यावेळी देशात स्वत:च्या प्रयोगशाळा होत्या. जगात सर्वप्रथम कालगणनेची अचूक मांडणी भारतीय ज्योतिषांनी केली. ही कालगणनेची मांडणी ‘पंचांग’ स्वरूपात आजही रूढ आहे. भारतीय जगाचा पाठीवर जेथे गेले आहेत तेथे त्यांनी सौर कालगणनेचा प्रचार-प्रसार केला आहे. देशभरात भारतीय संस्कृतीचे मानदंड आजही उभे आहेत. हेच आधुनिक तीर्थक्षेत्र बनले पाहिजे. पाश्चात्त्य दिनदर्शिका अवैज्ञानिक व विसंगतीने भरलेली आहे. त्याचाच अवलंब आपण आजही करीत आहोत. सौरकालगणना जपान, चीनने स्वीकारली; पण भारतीयांनी अजूनही आपली सौरकालगणना दैनंदिन जीवनात स्वीकारली नाही, ही खंत चितळे यांनी व्यक्त केली. अणुऊर्जेतून ऊर्जानिमित्ती केल्यास त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देत न्या. जोशी यांनी ऊर्जा भोगी संस्कृतीकडे न वळता ऊर्जा बचतीकडे वळा, असा संदेश दिला.
सौर कालगणना म्हणजे काय
सौर कालगणनेत २१ मार्च अर्थात १ चैत्रपासून वर्षाला आरंभ होतो. याच दिवसापासून सौर वर्षाची सुरुवात होते. या दिवशी जगभरात रात्र आणि दिवस समसमान १२ तासांचे असतात.
याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि दिवस मोठा होत जातो. २३ सप्टेंबरपासून सूर्याचे दक्षिणायन सुरू होते. उत्तर गोलार्धात सूर्य अधिक काळ राहतो. यामुळे वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद हे सलग पाच महिने ३१ दिवसांचे, तर उर्वरित ३० दिवसांचे असतात. चैत्र महिना लीप वर्ष असेल तर ३१ चा; अन्यथा ३० दिवसांचा असतो.

Web Title: Try yourself out to become a global solar chassis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.