शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

रेल्वेचा प्रवास 22 तासांचा, टेस्टिंगसाठी दीड तास, सोशल डिस्टन्सचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 1:11 PM

सचखंड एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांची तपासणी, अनेकांचे घेतले स्वॅब

ठळक मुद्देरेल्वेस्टेशनवर कोरोना टेस्टिंगची सुविधातपासणी करताना सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही.

औरंगाबाद : दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांची रेल्वेस्टेशनवर आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. तब्बल २२ तासांचा प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना दीड तास रांगेत ताटकळावे लागत आहे. सोशल डिस्टन्सचेही पालन होत नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. शिवाय इतर रेल्वेंतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी होत नसल्याने कोरोना वाढीचा धोका नाकारता येत नाही.

मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने रेल्वे सेवाही बंद करण्यात आली होती. रुग्ण संख्या कमी होत असल्याने अनलॉक प्रक्रिया सुरू करून काही मार्गांवर रेल्वे सेवा केंद्र शासनाने सुरू केली होती. काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता दररोज अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. सचखंड एक्स्प्रेससह सध्या मुंबई आणि हैदराबादसाठी विशेष रेल्वे धावत आहे; परंतु केवळ सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. यातून कोरोनाबाधितांचा आकडा समोर येत आहे.

रेल्वेस्टेशनवर कोरोना टेस्टिंगची सुविधाऔरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दिल्ली येथून सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी महापालिकेकडून पथक नेमण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची माहिती नोंदविल्यानंतर रेल्वे स्टेशनवर तैनात केलेल्या पथकाकडून तपासणीसाठी नाकातील नमुना घेतला जातो. त्यानंतर प्रवासी रवाना होतात. अहवालाची माहिती प्रवाशांना नंतर कळविली जाते.

टेस्टिंगसाठी लागतो वेळटेस्टिंगसाठी प्रवाशांना जवळपास दीड तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तपासणीसाठी केवळ एकच पथक राहिले तर हा वेळ आणखी वाढतो. शिवाय तपासणी करताना सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. प्रवासी रांगेत अगदी एकमेकांच्या जवळ उभे असतात. त्याकडे कोणाचे लक्ष जाताना दिसत नाही. त्यातूनही कोरोनाचे आमंत्रण मिळू शकते.

झांसीहून औरंगाबादला कामासाठी आलो आहे. रेल्वे आल्यानंतर इथे तपासणी होणार असल्याचे कळाले. त्यासाठी रांगेत उभा राहिलो. जवळपास अर्धा तास उलटल्यानंतर माझा नंबर आला आणि तपासणीसाठी नमुना घेण्यात आला.-अमनाथ गुप्ता, प्रवासी

मथुराहून आलो आहे. तपासणीसाठी एक तास रांगेत उभे राहावे लागले. एक तास रांगेत गेला; परंतु तपासणी होणे अधिक गरजेचे आहे. प्रशासन जे काम करीत आहे, ते योग्यच वाटते. -विशाल सिंह, प्रवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनcorona virusकोरोना वायरस बातम्या