शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

केंद्रीय प्राध्यापक भरतीचा विषय यूजीसीच्या अजेंड्यावर - भूषण पटवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 05:09 IST

महाविद्यालयातील प्राध्यापकांची नेमणूक हा चिंतेचा विषय आहे. प्राध्यापक पदाचा लिलाव होत असेल, तर गुणवत्ता कशी सुधारणार ?

औरंगाबाद : महाविद्यालयातील प्राध्यापकांची नेमणूक हा चिंतेचा विषय आहे. प्राध्यापक पदाचा लिलाव होत असेल, तर गुणवत्ता कशी सुधारणार ? असा सवाल उपस्थित करीत केंद्रीय पद्धतीने किंवा इतर काही यंत्रणेची उभारणी करून प्राध्यापक भरती करण्याचा विषय विद्यापीठ अनुदान आयोगाने अजेंड्यावर घेतला आहे. याविषयी येत्या नोव्हेंबर महिन्यात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला डॉ. पटवर्धन यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या पातळीवर प्राध्यापक भरतीसंदर्भात सक्षम यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. याविषयीच्या प्राथमिक चर्चा करण्यात आल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी)विविध व्यासपीठांवर प्राध्यापक भरतीविषयी मंथन होत आहे. यातून येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या यूजीसीच्या महत्त्वाच्या बैठकीत हा विषय अजेंड्यावर घेण्यात येणार आहे.राज्य आणि केंद्रीय पातळीवर भरती आयोग आहेत. त्यांच्या मार्फत प्राध्यापक भरती करायची की, स्वतंत्र शिक्षक भरती आयोग स्थापन करायचा, यावर विचार सुरू आहे. केंद्रीय पातळीवर कोणतेही धोरण ठरवताना अगोदर तीन-चार महिने चर्चा केली जाते. त्यावर विविध मते प्राप्त होतात. त्यानंतर प्रत्यक्ष धोरण राबविण्याचा विचार केला जातो. आता यूजीसीसह मंत्रालयीन स्तरावर प्राध्यापक भरतीविषयी चर्चा होत आहे.हा विषय यूजीसीच्या अजेंड्यावर येईल. त्याचे लोकांनाही महत्त्व पटले आहे. खाजगीमध्ये बोलताना प्रत्येक जण यात लक्ष घालण्याची वेळ आली असल्याचे सांगतो. यूजीसी निधी देत असलेल्या केंद्रीय विद्यापीठांमध्ये केंद्रीय पद्धतीने भरती प्रक्रिया राबविणे सोपे जाईल. मात्र, राज्य विद्यापीठांसाठी यूजीसी मार्गदर्शक तत्त्वे आखून देईल, त्या तत्त्वांचेपालन राज्य शासनालाही करावेच लागेल, कारण जनतेचा आणिशिक्षण क्षेत्राचा दबाव असणार आहे. त्यामुळे प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेविषयी लवकरच धोरण जाहीर केले जाईल, असेही डॉ. भूषण पटवर्धन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.>‘लोकमत’च्या वृत्ताची दखल>प्राध्यापक भरतीविषयी ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची खूप चर्चा झाली. आमच्याकडेही काहींनी हा विषय मांडला. यातून चर्चा होत गेली. एखाद्या विषयाची चर्चा होत असेल तर त्याविरोधातील प्रतिक्रियाहीसमजतात. मात्र, केंद्रीय प्राध्यापक भरतीला सर्वाधिक पाठिंबा असल्याचेहीडॉ. पटवर्धन म्हणाले.