शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

...त्यावेळी सहन केले आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 14:28 IST

नजीरबंदी : आता भाजप देत असलेला फटका बसतोय मात्र तो कुठे बसला आणि कसा बसला हे शिवसेनेला कळेनासे झाले आहे.

- नजीर शेख रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन कुणी करायचे; म्हणजे कुणाच्या हस्ते करायचे यावरुन औरंगाबाद महापालिकेत शिवसेना आणि भाजपमध्ये वाद नेहमीप्रमाणे रंगलाय. एकमेकांवर मात करण्यासाठी काही खेळ्यांही खेळल्या जात आहेत. कोण अधिक कुटील डाव खेळतो, याची दोघांमध्ये स्पर्धा लागली आहे. मुंबईमध्ये सागरी महामार्गाच्या उद्घाटनावेळी शिवसेनेने भाजपला डावलले तर मेट्रो ५ च्या कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात भाजपचे शिवसेनेशिवाय कार्यक्रम उरकून घेतला. मुंबई- कल्याणमधील वादाचे परिणाम औरंगाबादेतही दिसून येत आहेत.

औरंगाबादमध्ये १०० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन शिवसेनेचे धाकलेसाहेब आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा शिवसेनेचा इरादा आहे. तर भाजपला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घ्यायचा आहे. मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे एकत्र आले तर साहजिक आहे की आदित्य यांना दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल. मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच नारळ फोडावा लागेल आणि श्रेय भाजपकडे जाईल, अशी खेळी आहे. शिवसेनेलाही मुख्यमंत्र्यांनी येणे आवडणारे नाही, मात्र रस्त्यांच्या कामाला सरकारने जरी पैसे दिले असले तरी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटी  रुपये दिले असे ठासून सांगत आहेत. पैसे सरकारचे म्हणजे जनतेचेच आहेत याचा श्रेय घेण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या मंडळींना विसर पडलाय. 

पकड ढिली होतेय...अनेक वर्षापासून शिवसेनेची महापालिकेवर पकड आहे. मात्र मागील पाच वर्षांत ही पकड भाजपमुळे ढिली झाली आहे. ही पकड आणखी सैल होऊन महापालिका हातातून निसटून जाते की काय, अशी भीती शिवसेनेतील ‘सबसे बडे बाबा’सह इतर कार्यकर्त्यांना पडली आहे. ही पकड ढिली करण्यासाठी त्याचा दोर कापण्याचे काम महापालिका आयुक्त करीत असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी सांगत आहेत. महापालिकेत महापौर शिवसेनेचा असताना आणि महापौर व त्यांच्या पक्षाने आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे तसेच सिटी बस आणि इतर काही प्रकल्पांचे उद्घाटन करायचे ठरविले असताना त्यात खोडा घातला जात असल्याची शिवसेनेची भावना बनली आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि नगरविकास मंत्रीपद भाजपकडे असल्याने शिवसेनाही हतबल होऊन बसली आहे. त्यामुळे एक पाऊल माघार घेत शिवसेनेने  आदित्य ठाकरे यांच्या हस्ते २३ डिसेंबर रोजी केवळ सिटी बस आणि एसटीपी प्लांटचे उद्घाटन करण्याचे जाहीर केले मात्र महापालिका आयुक्तांनी या उद्घाटन कार्यक्रमाला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे सत्ता असूनही शिवसेना हतबल झाली आहे. त्यामुळे आता जरी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सिटी बस आणि एसटीपी प्लांटचे उद्घाटन झाले तरी जानेवारी महिन्यात शंभर कोटींच्या रस्त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा भाजपचा मानस आहे. भाजपची ही खेळी यशस्वी झाली आहे. बरे हा वाद चालू असताना विरोधी पक्ष बघ्याच्या भूमिकेत आहे. उद्घाटने कुणाच्याही हस्ते करा, विकासकामे लवकर सुरु करा, अशी मागणी त्यांच्याकडून होताना दिसत नाही. दोन्ही पक्षांतील सुंदोपसुंदी पाहून आपले चांगले मनोरंजन होत आहे, असा समज विरोधी पक्षाने करुन घेतलेला दिसत आहे. 

श्रेयवादाची लढाई महापालिकेत हा वाद चालू असतानाच सिडकोची घरे ‘लीज होल्ड’मधून ‘फ्री होल्ड’ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. याचे श्रेयही भाजपने आपल्याकडे घेतले. राज्य सरकारमध्येही विचारले जात नाही आणि महापालिकेच्या सत्तेतही काही चालू दिले जात नाही, याची सल शिवसेनेला आहे. काही वर्षांपूर्वी औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेच्या मागे भाजप गपगुमाने जात आहे, असे मानले जायचे. शिवसेनेच्या काही ‘दादा’ मंडळींनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची थोबाडे फोडली आहेत. थोबाड फुटले तरी तोंड उघडण्याचे धाडस त्यावेळी झाले नाही. मात्र परिस्थिती बदलली आणि भाजपकडून बदला घेण्याचे काम सुरु झाले. आता शिवसेनेला रोज तोंब दाबून बुक्क्यांचा मार देण्याचे काम चालू आहे. शिवसेनेने मारहाण केल्याच्यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्याच्या हातातोंडाला इजा झाली, डोके फुटले, रक्तही बाहेर आले. औषधोपचाराने कार्यकर्ते बरे झाले. आता भाजप देत असलेला फटका बसतोय मात्र तो कुठे बसला आणि कसा बसला हे शिवसेनेला कळेनासे झाले आहे. मलम लावायचे तरी कुठे? नुसते विव्हळण्याचे आवाज ऐकू येत आहेत. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliticsराजकारणfundsनिधी