तीन तलाठी बेपत्ता आहेत.

By Admin | Updated: December 22, 2015 00:11 IST2015-12-21T23:49:39+5:302015-12-22T00:11:55+5:30

न्नड : तहसील कार्यालयांतर्गतचे तीन तलाठी बेपत्ता आहेत. त्यापैकी एकजण तीन वर्षांपासून, एक दहा महिन्यांपासून बेपत्ता आहे, तर एक निलंबित असून त्याला

Three Talathi are missing. | तीन तलाठी बेपत्ता आहेत.

तीन तलाठी बेपत्ता आहेत.

न्नड : तहसील कार्यालयांतर्गतचे तीन तलाठी बेपत्ता आहेत. त्यापैकी एकजण तीन वर्षांपासून, एक दहा महिन्यांपासून बेपत्ता आहे, तर एक निलंबित असून त्याला दिलेल्या मुख्यालयातही तो हजर नाही. तलाठी हे गावपातळीवरील अत्यंत महत्त्वाचे पद आहे. जमिनीची मालकी व खरेदी विक्री, शेतकऱ्यांना कर्ज घेताना त्यांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा टाकणे, याशिवाय शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक लागणारी कागदपत्रे देणे, याशिवाय शासनाकडून मिळणाऱ्या आदेशानुसार करावी लागणारी कामे तलाठ्याशी संबंधित असतात. ही कामे शेतकऱ्यांशी थेट संबंधित असतात. त्यामुळे तलाठ्यांबरोबर सर्वसामान्यांची कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची कामे पडतात. एखाद्या सजाचे तलाठीपद रिक्त असले की त्याचा अतिरिक्त भार दुसऱ्या तलाठ्यावर टाकला जातो. बेपत्ता तलाठ्यांमुळे अशीच परिस्थिती उद्भवली आहे. गैरहजर तलाठ्यांपैकी डी. टी. लोकणार हे १३ आॅगस्ट २०१२ पासून गैरहजर आहेत. त्यांची नेमणूक जैतखेडा सजावर आहे. मात्र ते गैरहजर असल्यामुळे डी. वाय. बागूल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. तलाठी डी. यू. चौरे यांची नेमणूक बहिरगाव येथे असून ते दि. ४ एप्रिल २०१५ पासून गैरहजर आहेत. एस. टी. मोरे यांची नेमणूक विटा येथे आहे. मात्र ते १९ सप्टेंबर २०११ पासून वैद्यकीय रजेवर आहेत. बी. एस. शेख हे निलंबित असून त्यांना सिल्लोड मुख्यालय देण्यात आले आहे; पण त्यांचे उपस्थिती प्रमाणपत्र तहसील कार्यालयास प्राप्त नाही. त्यामुळे गैरहजर व निलंबित तलाठी यांचे वेतन बंद आहे. तसेच त्यांची विभागीय चौकशी तहसील कार्यालयाने प्रस्तावित केलेली आहे, असे तहसील कार्यालयातून कळाले आहे; पण तोपर्यंत तरी तलाठ्यांची ही पदे भरता येणार नाहीत.

Web Title: Three Talathi are missing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.