शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

ह्रदयद्रावक... हायवा चालकांच्या ओव्हरटेक स्पर्धेत तीन सख्खी भावंडे चिरडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 05:47 IST

बहिणीसह दोन भावांचा जागीच मृत्यू, कुटुंबच कोलमडून पडले; आईवडिलांच्या आक्रोशाने परिसर हादरून गेला

लोकमत न्यूज नेटवर्क   छत्रपती संभाजीनगर : वाळू वाहणाऱ्या दोन सुसाट व बेफाम हायवा चालकांच्या ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेत तीन सख्ख्या भावंडांचा करुण अंत झाला. तिघेही दुचाकीवरून ट्रीपल सीट घरी परतत असताना ते या हायवांच्या चाकाखाली सापडले. थेट अंगावरूनच अवजड हायवा गेल्याने बहीण व दोन भावांचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक्षा भगवान अंभोरे (२२), प्रदीप ऊर्फ लखन भगवान अंभोरे (२५) व प्रवीण भगवान अंभोरे (२८) अशी मृत भावंडांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी बीड बायपासवरील हॉटेल पाटीलवाड्यासमोर हा अपघात घडला.   

मैदानी चाचणीत यशस्वी ठरली; पण... nगुरुवारी पहाटे ५ वाजताच तिघेही एकाच दुचाकीवरून शेंद्रा परिसरात गेले होते. nप्रतीक्षाने मैदानी चाचणीदेखील यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्या आनंदात ते तिघेही ९ वाजता घराकडे निघाले.nमात्र, बाळापूर फाट्याजवळ दोन सुसाट हायवा एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत हाेते.nत्या बेजबाबदार चालकांच्या स्पर्धेत तीन भावंडांच्या दुचाकीला धडक लागली व दुचाकी थेट एका हायवाच्या चाकाखाली सापडली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. हायवा चालक मात्र पसार झाले.

तिघांचे मृतदेह पाहताच वडिलांना धक्काच असह्य तिघांचे मृतदेह घाटीच्या शवविच्छेदनगृहात रवाना करण्यात आले. घटनेची माहिती कळताच सर्व नातेवाइकांनी घाटीत धाव घेतली. मुलांचा किरकोळ अपघात झालाय, असे सांगून आई-वडिलांना शहरात बोलावण्यात आले. लवकरच शासकीय सेवेत रुजू होताना पाहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आई-वडिलांवर मात्र लाडकी मुलगी व दोन मुलांचे मृतदेह पाहण्याची वेळ आली. आईचा आक्रोश थांबत नव्हता, तर वडिलांना धक्काच असह्य झाला. प्रवीण यांच्या पत्नीला नातेवाइकांना आवरणे कठीण झाले होते.  

मैदान मारले होतेnमूळ जिंतूर तालुक्यातील अकोली येथील अंभोरे कुटुंबातील मोठा मुलगा प्रवीण सातारा परिसरात पत्नी व एक वर्षाच्या मुलासह राहतो. त्यांची लहान बहीण प्रतीक्षा काही महिन्यांपूर्वीच मुंबई पोलिस भरती व वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली होती. 

सरकारी नोकरीचे स्वप्न अधुरेच प्रतीक्षाला वन परीक्षेच्या लेखी परीक्षेत १२० पैकी ८४, तर मैदानी चाचणीत ८० पैकी ५० गुण प्राप्त झाले होते. मुंबई पोलिस भरतीत ती प्रतीक्षा यादीत होती.निवड होण्यापूर्वीच तिचाकरुण अंत झाला.

घरातील तरुण दोन मुले आणि एक मुलगी अपघातात ठार झाल्याने त्यांच्या आईवडिलांनी हंबरडा फोडला तेव्हा काळीज हेलावले.

 

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस