महानगरपालिकेत तीन अधिकारी दाखल
By Admin | Updated: June 20, 2016 00:51 IST2016-06-19T23:26:27+5:302016-06-20T00:51:15+5:30
औरंगाबाद : शासनाने महापालिकेत तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यातील एका उपअभियंत्यास प्रशासनाने नियुक्तीही दिली आहे

महानगरपालिकेत तीन अधिकारी दाखल
औरंगाबाद : शासनाने महापालिकेत तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यातील एका उपअभियंत्यास प्रशासनाने नियुक्तीही दिली आहे. मुख्य लेखाधिकारी म्हणून आलेल्या अधिकाऱ्यास अजून वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. तिसऱ्या अधिकाऱ्यास शनिवारी रुजू करण्यात आले.
महापालिकेत मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात आजारपणामुळे मागील काही महिन्यांपासून सुटीवर होते. त्यांचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ लेखाधिकारी संजय पवार यांना सोपविण्यात आला आहे. १२ जानेवारी २०१५ रोजी पवार यांनी खंडपीठात धाव घेतली होती. मुख्य लेखाधिकारी या पदावर आपली कायमस्वरूपी वर्णी लावावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती. या प्रकरणात न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला होता. शासनाने गुरुवारी मुख्य लेखाधिकारी या पदावर रामभाऊ सोळुंके यांची नियुक्ती केली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता सोळुंके पदभार स्वीकारण्यासाठी महापालिकेत दाखल झाले. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे प्रशासनाने त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला. उपायुक्त अय्युब खान यांची त्यांनी भेट घेतली. सोळुंके यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, शासनाने उपअभियंता म्हणून चहल यांची नियुक्ती केली आहे. मनपाने त्यांना रुजू करून घेतले.