वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: May 23, 2014 00:21 IST2014-05-23T00:00:12+5:302014-05-23T00:21:08+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या विविध अपघातात तिघे ठार तर दहाजण जखमी झाले़

वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
उस्मानाबाद : जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या विविध अपघातात तिघे ठार तर दहाजण जखमी झाले़ हे अपघात तुळजापूर, नागोबा मंदिर, भूम शहर, नाथवाडी (ताक़ळंब) नजीक बुधवारी रात्री व गुरूवारी दुपारच्या दरम्यान घडले. तिघे जखमी भूम: बैलगाडी-टमटम अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, दोन महिलांसह तिघे जखमी झाले़ हा अपघात गुरूवारी दुपारी भूम शहरानजीकच्या परंडा मार्गावरील माऊली मंदिराजवळ घडला़भूम येथून वांगी (खु़) कडे टमटम (क्ऱएम़एच़-एऩ१००८) दुपारी जात होते़ त्या टमटममध्ये प्रवाशांसह एक लाकूड मध्यभागी होते़ शहरानजीकच्या परंडा मार्गावरील माऊली मंदिराजवळ बैलगाडीला ओव्हरटेक करताना टमटममधील लाकूड बैलगाडीच्या चाकात अडकले़ काही क्षणातच टमटम उलटून आतील रेखा सारंग वाघमारे (वय-४५ रा़वांगी) यांचा मृत्यू झाला़ तर लिलावती साईराम गुंजाळ, गयाबाई दिगंबर सुके, हनुमंत शिवाजी माळी (सर्व रा़वांगी खुद़) हे जखमी झाले़ उत्तम वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टमटमचालक मच्छिंद्र गुंजाळ याच्याविरूध्द भूम ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दोन गंभीर येरमाळा: भरधाव वेगातील वाहनाने दुचाकीस जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या एकाचा सोलापूर येथील रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला़ तर या अपघातात इतर दोघे गंभीर जखमी झाले़ हा अपघात मंगळवारी दुपारच्या सुमारास सोलापूर-धुळे महामार्गावरील नाथवाडी (ताक़ळंब) येथे झाला़ वाशी तालुक्यातील वडजी येथील कृष्णा श्रीराम जाधवर (वय-२०), श्रीराम महादेव जाधवर (वय-५०), दत्ता रामू जाधवर (वय-१६) हे तिघे गुरूवारी दुपारी दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५- झेड ६३६२) येरमाळ्याहून येडशीकडे जात होते़ धुळे-सोलापूर महामार्गावरील नाथवाडी (ताक़ळंब) नजीक भरधाव वेगातील वाहनाने दुचाकीस जोराची धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले़ जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे नेण्यात येत असताना कृष्णा जाधवर याचा मृत्यू झाला़ तर इतर दोघांना उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले़ याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़ बस-ट्रकची भीषण धडक तुळजापूर: ट्रक-बसची समोरासमोर जोराची धडक होवून झालेल्या भीषण अपघातात एक मुलगी ठार झाली असून, पाच जण गंभीर जखमी झाले़ हा अपघात बुधवारी रात्रीच्या सुमारास तुळजापूर-नळदुर्ग महामार्गावरील नागोबा मंदिराजवळ घडली़ तुळजापूरकडे येणार्या बसची (क्रक़े़ए़३६- आऱ९८१) तीर्थ नजीकच्या नागोबा मंदिरासमोरील महामार्गावर ट्रकशी (क्ऱएम़एच़१३-के़२५०७) जोराची धडक झाली़ या अपघातात बसमधील रेणुका कन्हैय्या तेलंग (वय-१६ रा़चिलवडी ता़उस्मानाबाद) ही मुलगी जागीच ठार झाली़ तर साबय्या कराप्पा भंडारी, ज्योती सिध्दप्पा तेलंग, भीमाबाई गुत्तेदार, शोभा गुत्तेदार, मोहन बिंदू जाधव हे जखमी झाले़ जखमींवर तुळजापूर येथील ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ पोहेका वाल्मिक कोळी यांच्या फिर्यादीवरून बस, ट्रक चालकांविरूध्द तुळजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)