शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाचार हजार मतदारांनी निवडले ‘नोटा’

By admin | Updated: October 20, 2014 00:32 IST

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी पहिल्यांदाच मतदार यंत्रावर ‘नोटा’ (नन आॅफ द अ‍ॅबाऊ) चा पर्याय देण्यात आला आहे.


उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी पहिल्यांदाच मतदार यंत्रावर ‘नोटा’ (नन आॅफ द अ‍ॅबाऊ) चा पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायाला जिल्ह्यातील तब्बल ४ हजार २७७ मतदारांनी पसंती दिल्याचे दिसते. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाचा विचार केला असता, तुळजापूर मतदारसंघातील सर्वाधिक १ हजार ३१४ जणांनी ‘नोटा’चा वापर केल्याचे समोर आले आहे.
एखाद्या मतदारसंघामध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार लायक वाटत नसल्यास अनेकजण मतदानाचा हक्क बजावत नव्हते. त्यामुळे मतदानाचा टक्काही घसरत होता. मात्र निवडणूक आयोगाने अशा मतदारांना त्यांच्या भावना मतदारांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात याव्यात, यासाठी मतदान यंत्रावर ‘नोटा’ हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातील हजारो मतदारांनी या पर्यायाचा वापर केला आहे. उस्मानाबाद, तुळजापूर मतदारसंघामध्ये तर अपक्ष उमेदवारापेक्षाही ‘नोटा’लाच अधिक पसंती मिळाली असल्याचे दिसते.
या मतदार संघातील अ‍ॅड. रामेश्वर धोंडिबा शेटे यांना १ हजार ५१, पिंटू पांडुरंग चांदणे यांना ७६९, सुबराबाई शिवाजी राठोड यांना ६२९, संजय सुरेश रेणुके यांना ४७१, किरण जाधव यांना ४३३ तर राहुल नागनाथ जवान यांना ३८५ मते मिळाली. याच्या उलट ‘नोटा’ला १ हजार ३१४ मतदारांनी पसंती दिली.
दरम्यान, हीच अवस्था अन्य तालुक्यातही पहावयास मिळते. परंडा विधानसभा मतदारसंघातहीे १ हजार १५१ जणांनी ‘नोटा’चे बटन दाबले आहे. येथेही अपक्ष ‘नोटा’ एवढी मते घेवू शकले नाहीत. संभाजी नानासाहेब शिंदे ७७२, आर्यनराजे किसनराव शिंदे ५३६ तर अ‍ॅड. प्रबुद्धा साहेबराव अहिरे यांना ४८१ एवढी मते मिळाली. हेच चित्र उस्मानाबाद मतदार संघातही दिसते. अनेक अपक्षांना पाचशेचा आकडाही पार करता आलेला नाही. मात्र ‘नोटा’ला ६०१ इतकी मते मिळाली आहेत. उमरगा मतदार संघामध्येही यापेक्षा वेगळे चित्र नाही. येथेही तब्बल १ हजार २११ जणांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. एकूण चारही मतदारसंघात ‘नोटा’ मिळालेल्या मतांची गोळागेरीज केली असता, हा आकडा आता ४ हजार २७७ वर जावून ठेपतो. एकूणच चारही मतदारसंघामध्ये निवडणूक रिंगणामध्ये असलेले उमेदवार उपरोक्त सव्वाचार हजारांवर मतदारांना योग्य असल्याचे वाटले नाही, हेच यातून समोर येते.