शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

औरंगाबादेत हजार रुपयांत नळ अधिकृत कधी होणार?; महानगरपालिकेचा १५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 5:53 PM

अनधिकृत नळ अधिकृत करण्यासाठी महापालिका १५ आॅगस्टपासून फक्त १ हजार रुपये दंड आकारून नागरिकांना नळ अधिकृत करून देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

ठळक मुद्देशहरात आहेत दीड लाख अनधिकृत नळपाचशे रुपये दंड आकारून नळ अधिकृत करावे, अशी सर्वसाधारण सभेची शिफारस होती.शासन नियमानुसार किमान एक हजार रुपये दंड आकारावाच लागणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले

औरंगाबाद : अनधिकृत नळ अधिकृत करण्यासाठी महापालिका १५ आॅगस्टपासून फक्त १ हजार रुपये दंड आकारून नागरिकांना नळ अधिकृत करून देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. स्वातंत्र्य दिन उलटून चार दिवस झाले तरी महापालिकेने अद्याप अनधिकृत नळांसाठी अभय योजना सुरू केलेली नाही. नेहमीच घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या मनपाने अनधिकृत नळांची घोषणाही त्यात केल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे.

शहरात तीन लाखांहून अधिक मालमत्ता असताना महापालिकेच्या रेकॉर्डवर फक्त १ लाख २५ हजार अधिकृत नळ आहेत. १ लाख ५० हजारांपेक्षा जास्त अनधिकृत नळ आहेत. मनपाने पन्नास वेळेस अभय योजनेत नळ अधिकृत करून घ्यावे म्हणून नागरिकांना आवाहन केले. मात्र, नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला नाही. साडेतीन हजार रुपये दंड आणि वार्षिक पाणीपट्टी मिळून नागरिकांना ७ हजार ५०० रुपये खर्च येत होता. या खर्चामुळे अनेक नागरिकांनी नळ अधिकृत केलेले नाहीत.

उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यावर अनधिकृत नळ कनेक्शनचा मुद्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आला होता. मागील अनेक वर्षांपासून किमान दीड लाख नळ कनेक्शनधारक मोफत पाणी घेत आहेत. यामुळे महापालिकेला पाणीपुरवठ्यात मोठा आर्थिक फटका बसत आहे. दरवर्षी पाणीपुरवठ्याचा खर्च ८० ते ९० कोटींपर्यंत पोहोचला आहे. त्या तुलनेत पाणीपट्टी १५ ते २० कोटी रुपये जमा होते. ४० ते ५० कोटींची तूट मनपाला पाणीपुरवठ्यात सहन करावी लागत आहे. अनधिकृत नळधारकांना कुठेतरी शिस्त लागावी म्हणून ५०० रुपये दंड आकारून नळ अधिकृत करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. महापौर नंदकुमार घोडेले यांनीही ठराव मंजूर करून प्रशासनाला पाठविला होता.

पाचशे रुपये दंड आकारून नळ अधिकृत करावे, अशी सर्वसाधारण सभेची शिफारस होती. शासन नियमानुसार किमान एक हजार रुपये दंड आकारावाच लागणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी महापौरांना सांगितले. १५ आॅगस्टपासून एक हजार रुपये भरून नळ अधिकृत करण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. योजना संपल्यावर शहरात कुठेही अनधिकृत नळ दिसून आल्यास मालमत्ताधारकाला मोठा आर्थिक दंड लावण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते.शहरातील हजारो नागरिक १५ आॅगस्टपासून नळ अधिकृत करण्याची योजना सुरू होईल, यादृष्टीने वाट पाहत होते. मात्र, मनपाकडून अद्याप योजनेला सुरुवातच करण्यात आलेली नाही. महापालिकेचा हा कारभार पाहून शहर कसे स्मार्ट होईल, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.  

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीTaxकर