शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

छत्रपती संभाजीनगरातील मुख्य जलवाहिन्यांवर हजारो नळकनेक्शन! मनपा प्रशासनाची डोळेझाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:18 IST

मोठ्या प्रमाणात पाणी शहरात येत असतानाही नागरिकांना आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतोय.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर नागरिकांनी हजारो नळकनेक्शन घेतले आहे. या अनधिकृत नळकनेक्शन धारकांना आठ ते दहा तास पाणीपुरवठा होतोय. काही वसाहतींमध्ये तर चक्क २४ तासही पाणी उपलब्ध आहे. लोकप्रतिनिधींच्या भीतीने प्रशासन पूर्वी कारवाई करीत नव्हते. आता पाच वर्षांपासून लोकप्रतिनिधीही महापालिकेत नाहीत. त्यानंतरही प्रशासन या गंभीर बाबीकडे डोळेझाक करीत आहे. प्रशासनाकडे योग्य नियोजन नसल्याने शहराला पाणी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

शहरात दररोज १४५ एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. शहराला दररोज २४० एमएलडी पाण्याची गरज असून, चार दिवसांत ५८० एमएलडी एवढे मुबलक पाणी जमा होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी शहरात येत असतानाही नागरिकांना आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतोय. पाणीपुरवठ्याचे कोणतेही नियोजन नसल्याने नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतोय. नक्षत्रवाडी येथील एमबीआरवरून शहरातील ३६ जलकुंभांवर पाणीपुरवठा होतो. या जलवाहिन्यांवर अवैध नळकनेक्शन घेता येत नाही. जलकुंभातून विविध वॉर्डांना पाणीपुरवठा करण्यासाठी १००, १५०, २००, ३०० मिमी व्यासापर्यंतच्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. या जलवाहिन्यांची नागरिकांनी अक्षरश: चाळणी केली आहे. त्यामुळे एखाद्या गल्लीतील शेवटच्या घरापर्यंत पाणीच पोहोचत नाही. त्याचप्रमाणे संबंधित वाॅर्डांतील सर्व पाण्याचे टप्पे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मेन लाईनवरील नळकनेक्शन धारकांना पाणीच पाणी मिळते.

४२ नळकनेक्शन कापलेसिल्क मिल कॉलनी येथे बुधवारी मनपाच्या विशेष पथकाने १५० मिमी व्यासाच्या मेन लाईनवरील तब्बल ४२ नळकनेक्शन कापले. रोबोट कॅमेऱ्याच्या मदतीने अगोदर जलवाहिनीवर किती नळकनेक्शन आहेत, याची पाहणी केली. त्यानंतर कारवाई केली. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडे दोन रोबोट आहेत.

रोबोटची कारवाई वाढविणाररोबोटद्वारे दिवसभरातून दोन ठिकाणी पाहणी केली जाते. ही संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. किमान चार ठिकाणी पाहणी करा असे सांगितले आहे. लवकरच रोबोटची संख्याही वाढविली जाणार आहे. जेथे अनधिकृत नळ दिसतील, ते कापले जात आहेत.-किरण धांडे, कार्यकारी अभियंता मनपा.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी