शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

महिलांविषयक गुन्ह्यांनी ओलांडली शंभरी

By admin | Updated: May 12, 2014 00:08 IST

उस्मानाबाद : एकीकडे जिल्ह्यात दरोडेखोर, चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़ तर दुसरीकडे जवळच्याच माणसांपासून महिला, युवतींना मोठा धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे़

 उस्मानाबाद : एकीकडे जिल्ह्यात दरोडेखोर, चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़ तर दुसरीकडे जवळच्याच माणसांपासून महिला, युवतींना मोठा धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे़ चालू वर्षी चार महिन्यातील महिला विरोधी गुन्हेगारीची आकडेवारी विचार करायला लावणारी आहे़ या कालावधीत एकीचा हुंड्यासाठी खून झाला असून, ११ विवाहितांनी जीवनयात्रा संपविली आहे़ तर १३ जणी बलात्कारासारख्या क्रूरकृत्याच्या बळी ठरल्या आहेत़ जाचाचे ४८ तर विनयभंगाचे ३९ गुन्हे पोलिस दफ्तरी नोंद आहेत़ स्पर्धेच्या युगात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विविध योजनांसह आरक्षणही लागू करण्यात आले आहे़ मात्र, धावपळीच्या आणि आधुनिकतेच्या युगात शहरासह ग्रामीण भागातील महिला, युवती खर्‍याच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न समोर येत आहे़ जिल्ह्यातील १७ पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या गुन्हेगारी नोंद रजिस्टरमध्ये महिलांच्या आलेल्या तक्रारी आणि गुन्ह्यांचे प्रकार पाहता स्पर्धेच्या युगात शिक्षितच अज्ञानी आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होतो़ जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०१४ या कालावधीत हुंड्यासाठी एका विवाहितेचा सासरच्या मंडळींनी खून केला आहे़ दोघींचा हुंड्यासाठी बळी गेला आहे़ ११ जणींनी जाचास कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली आहे़ खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत़ तर १३ युवती, महिला या बलात्कारासारख्या नीच कृत्याच्या शिकार ठरल्या आहेत़ तब्बल ४८ विवाहितांनी जाचप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत़ काहींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे़ तर रस्त्यावर, शेतात, नव्हे स्वत:च्या घरात सुरक्षित असतानाही जिल्ह्यातील ३९ जणींचा काही महाभागांनी विनयभंग केला आहे़ तर छेडछाड प्रकरणी एक गुन्हा, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एक गुन्हा दाखल झाला आहे़ (प्रतिनिधी) कारणांचा शोध आवश्यक महिला, मुलींवरील वाढलेले अत्याचार, जाचहट, हुंडाबळी आदींची मुख्य कारणे शोधण्याची वेळ आली आहे़ आरक्षण, कायदे लागू करूनही याघटनांची तीव्रता कमी होताना दिसत नाही़ त्यामुळे समाजाची मानसिकता बदलण्यासाठी व विक्रत लोकांवर कठोर कारवाईसाठी कारणांचा शोध घेऊन आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे़ तक्रार निवारण केंद्राची मदत पोलिस दलांतर्गत विवाहित दाम्पत्यात झालेली भांडणे सोडविण्यासाठी महिला तक्रार निवारण केंद्र उभारण्यात आले आहे़ गत अनेक वर्षापासून या महिला तक्रार निवारण केंद्रातून अनेकांचे संसार पुन्हा फुलले आहेत़ मात्र, तडजोडीत ज्यांचे जमतच नाही त्यांनी अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे़ फिरते पथक कार्यरत युवती, महिलांची छेडछाड, विनयभंग आदी विविध प्रकार रोखण्यासाठी पोलिस दलाच्या वतीने विविध शाळा, महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या कालावधीत फिरते पथक कार्यान्वित करण्यात आले आहे़ उस्मानाबाद येथील या पथकाने वारंवार रोडरोमिओंसह इतर टवाळखोरांवर कारवाई करून वचक निर्माण केला आहे़ मात्र, अनेकांना कायद्याची आणि कारवाईची भिती नसल्याने या घटना सुरूच असल्याचे चित्र आहे़ सामाजिक मूल्यांची जपणूक व्हावी, समाजात पाश्चात संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात अनुकरण होत आहे़ पूर्वीप्रमाणे एकत्रित कुटुंब पध्दती कमी प्रमाणात आहे़ भौतिक सुखसुविधांचा मोह वाढत आहे़ मूल्यांवर समाधान मानणारे कमी प्रमाणात असल्याने अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. जुन्या मूल्यांची जपणूक करून एकमेकांच्या अडचणी चर्चेतून सोडविल्यानंतर अत्याचाराच्या घटना कमी होतील, अशी आशा मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ महेश कानडे यांनी दिली़