शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

सद्भावना राखण्यासाठी एकजुटीने धावले हजारो औरंगाबादकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:39 IST

‘सामाजिक सलोखा’, ‘पाणी वाचवा, झाडी जगवा’, ‘बेटी बचाव, बेटी पढ़ाव’चा संदेश देत आणि सामाजिक सद्भावना राखण्यासाठी आयोजित ‘रन फॉर औरंगाबाद’ या उपक्रमात सहभागी होत हजारो औरंगाबादकर एकजुटीने धावले.

ठळक मुद्देप्रशासनाच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद : पाच वर्षांच्या बालकांसह वृद्ध, महिला, शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग

औरंगाबाद : ‘सामाजिक सलोखा’, ‘पाणी वाचवा, झाडी जगवा’, ‘बेटी बचाव, बेटी पढ़ाव’चा संदेश देत आणि सामाजिक सद्भावना राखण्यासाठी आयोजित ‘रन फॉर औरंगाबाद’ या उपक्रमात सहभागी होत हजारो औरंगाबादकर एकजुटीने धावले.शहर पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा परिषदेतर्फे शनिवारी रात्री ७.३० वाजता ‘रन फॉर औरंगाबाद’ हा ५ किलोमीटर धावण्याचा उपक्रम घेण्यात आला. महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंदर सिंगल, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, लोकमत महामॅरेथॉनच्या संचालिका रुचिरा दर्डा, एमजीएमचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी ध्वज दाखवून ‘रन फॉर औरंगाबाद’चा शुभारंभ केला. तत्पूर्वी, रिलॅक्स झीलच्या वतीने दहा मिनिटे वॉर्मअप करण्यात आले. त्यानंतर ही दौड क्रांतीचौकातून रेल्वेस्टेशन रस्त्यावरील एमटीडीसी कार्यालयापर्यंत गेली. तेथून वळण घेऊन परत क्रांतीचौकात या दौडची सांगता करण्यात आली. शहरात शांतता नांदावी याकरिता आयोजित या स्तुत्य उपक्रमात रुचिरा दर्डा यांच्यासह लोकमत महामॅरेथॉनची संपूर्ण टीम सहभागी झाली होती. या उपक्रमाचे स्वागत करीत असे आणखी उपक्रम शहरात होतील, अशी आशा टीम मेम्बर्सनी व्यक्त केली.या दौडमध्ये सुमारे साडेतीन ते चार हजार औरंगाबादकर मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. यात शहरातील उर्दू, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या विविध शाळांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी गणवेशात सहभागी झाल्या. भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेतील तरुण, तरुणींचा सहभाग लक्षणीय होता.यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी सामाजिक सलोखा, पाणी बचत, बेटी बचाव, बेटी पढ़ाओ हा संकल्प आज करूया, असे आवाहन केले. विशेष पोलीस महानिरीक्षक सिंगल आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना शहरात सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले, तसेच यापुढे शहरात शांतता नांदेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.शिव स्वराज्य प्रतिष्ठानच्याढोल पथकाने आणली रंगत‘रन फॉर औरंगाबाद’ सुरू होण्यापूर्वी शिव स्वराज्य प्रतिष्ठानच्या ढोल पथकाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. या ढोल पथकाने उत्तम आणि शिस्तबद्ध सादरीकरण करून धावपटूंचा उत्साह वाढविला..८५ वर्षीय चौहान यांचा सहभागया स्तुत्य उपक्रमात ८५ वर्षीय सुरेंद्र चौहान हे त्यांची व्हिंटेज कार घेऊन आले होते. त्यांचा उत्साह पाहून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्टेजवर बोलावून त्यांना मनोगत व्यक्त करायला लावले. यावेळी चौहान यांनी हम सब एक है, असे म्हटले आणि हजारो नागरिकांनी टाळ्या वाजवून त्यांना साद दिली.यांची झाली मदतहेल्प रायडर्सचे संदीप कुलकर्णी, राजाभाऊ जाधवर, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. रश्मी बोरीकर, डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. सोमाणी, मुकुंद भोगले, प्रकाश बोर्डे, रिलॅक्स झिलचे संजय पाटील, शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे सुमित पवार, रोशन जैसवानी.वाहतूक शाखेचा बंदोबस्त‘रन फॉर औरंगाबाद’ या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त एच. एस.भापकर, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक उत्तम मुळक, वाहतूक शाखेच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी पुढाकार घेतला. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज, उपनिरीक्षक सरला गाडेकर आणि कर्मचाऱ्यांनी क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ दिली नाही.दोन मुलींना आली चक्करदौडमध्ये गरुडझेप अकादमीच्या दोन मुलींना चक्कर आल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.एनर्जी ड्रिंक आणि पाण्याची सुविधा‘रन फॉर औरंगाबाद’च्या मार्गावर अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि एनर्जी ड्रिंकची व्यवस्था करण्यात आली होती. धावपटू या एनर्जी ड्रिंक आणि पाण्याचा लाभ घेत होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक