शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

यंदा दुप्पट पाणीसाठा, तरीही टंचाईच्या झळा; मराठवाडा हळूहळू टँकरच्या फेऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:45 IST

तापमान वाढत असल्यामुळे जलसाठ्यातील पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील मोठ्या, लघू आणि मध्यम प्रकल्पांत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट जलसाठा आहे, तरीही विभाग हळूहळू टँकरच्या फेऱ्यात येऊ लागला आहे. विशेषत: जायकवाडी धरण असतानाही विभागाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकरच्या फेऱ्या सध्या सुरू आहेत.

तापमान दिवसेंदिवस वाढू लागले आहे. विभागात सोमवारी सरासरी ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. तापमान वाढत असल्यामुळे जलसाठ्यातील पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत आहे. सर्व जिल्ह्यांना पुढील तीन महिन्यांसाठी टंचाई आराखडा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आठ जिल्ह्यांतील ३ वाड्या मिळून २४ गावांमध्ये सध्या १९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पुढील तीन महिन्यांत हा आकडा ३००च्या आसपास जाण्याची शक्यता असून, टँकरचा आकडा ४०० च्या आसपास असेल. ७० विहिरी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये १७ तर नांदेडमध्ये २ टँकर सध्या सुरू आहेत. उर्वरित जिल्ह्यांतून टँकरची मागणी येत असल्याचे विभागीय प्रशासनाने सांगितले. जायकवाडी धरणात सध्या ५७.६१ टक्के जलसाठा आहे. मागच्या वर्षी २४ मार्च रोजी २३.१६ टक्के जलसाठा होता.

विभागात सध्या असलेला जलसाठामोठे प्रकल्प : ४४आजचा जलसाठा : ५५.२७ टक्केमागच्या वर्षीचा जलसाठा : २३.७४ टक्केमध्यम प्रकल्प : ८१आजचा जलसाठा : ४३.२८ टक्केमागच्या वर्षीचा जलसाठा : २१.६५ टक्केलघू प्रकल्प: ७९५आजचा जलसाठा : ३१.९८ टक्केमागच्या वर्षीचा जलसाठा : १८.५५ टक्के

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणMarathwadaमराठवाडाWaterपाणीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर