शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

यंदाही औरंगाबादकरांचा उन्हाळा त्रासदायक, ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकायला जागाच नाही

By मुजीब देवणीकर | Updated: February 1, 2023 15:22 IST

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतचे विदारक चित्र

औरंगाबाद : दरवर्षी उन्हाळ्यात औरंगाबादकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची आणखी एक जलवाहिनी टाकण्याचा निर्णय मार्च २०२२ मध्ये घेण्यात आला. वर्ष उलटत आले तरी या कामाचा अद्याप श्रीगणेशाच झाला नाही. आता काम सुरू करायचे म्हटले तर जलवाहिनी टाकण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याची बाब समोर आली. यंदाही औरंगाबादकरांना पाणीटंचाईचा मुकाबला करावाच लागणार आहे.

शहराची तहान भागविण्यासाठी १९७५ मध्ये पहिल्यांदा जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली. नंतर १९९२ मध्ये १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली. या दोन्ही जलवाहिन्यांद्वारे १२० एमएलडी पाणी दररोज शहरात येते. शहराची तहान भागविण्यासाठी किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. कायमस्वरूपी शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या योजनेअंतर्गंत तब्बल २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे कामही सुरू आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी एक ते दीड वर्ष लागणार आहे. तेव्हापर्यंत शहराची तहान भागविण्यासाठी आणखी एक ९०० मिमी व्यासाची योजना टाकण्याची संकल्पना काही अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून आली. शासनानेही १९३ कोटींच्या या योजनेला मान्यता दिली. अमृत-२ मध्ये या योजनेला मंजुरी घेतली. मंजुरीच्या अधीन राहून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चार टप्प्यांत निविदा प्रक्रिया राबविली. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक संपताच कामाला सुरुवात होणार आहे.

आता जागेचा शोध सुरू७०० मिमी व्यासाच्या बाजूलाच १४०० मिमीची जलवाहिनी आहे. आणखी थोड्या बाजूला २५०० मिमीची सर्वांत मोठी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. आता ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी कुठे टाकावी, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी तर जागाच शिल्लक नाही. जिथे जागा उपलब्ध आहे, तेथे तारेवरची कसरत करीत जलवाहिनी टाकावी लागेल. जुन्या दोन्ही जलवाहिन्या तीन ठिकाणी ‘क्राॅस’ झालेल्या असल्यामुळे ९०० मिमीची जलवाहिनी टाकताना जमिनीची अडचण निर्माण होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी