शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

यंदाही औरंगाबादकरांचा उन्हाळा त्रासदायक, ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकायला जागाच नाही

By मुजीब देवणीकर | Updated: February 1, 2023 15:22 IST

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतचे विदारक चित्र

औरंगाबाद : दरवर्षी उन्हाळ्यात औरंगाबादकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची आणखी एक जलवाहिनी टाकण्याचा निर्णय मार्च २०२२ मध्ये घेण्यात आला. वर्ष उलटत आले तरी या कामाचा अद्याप श्रीगणेशाच झाला नाही. आता काम सुरू करायचे म्हटले तर जलवाहिनी टाकण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याची बाब समोर आली. यंदाही औरंगाबादकरांना पाणीटंचाईचा मुकाबला करावाच लागणार आहे.

शहराची तहान भागविण्यासाठी १९७५ मध्ये पहिल्यांदा जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली. नंतर १९९२ मध्ये १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली. या दोन्ही जलवाहिन्यांद्वारे १२० एमएलडी पाणी दररोज शहरात येते. शहराची तहान भागविण्यासाठी किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. कायमस्वरूपी शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या योजनेअंतर्गंत तब्बल २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे कामही सुरू आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी एक ते दीड वर्ष लागणार आहे. तेव्हापर्यंत शहराची तहान भागविण्यासाठी आणखी एक ९०० मिमी व्यासाची योजना टाकण्याची संकल्पना काही अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून आली. शासनानेही १९३ कोटींच्या या योजनेला मान्यता दिली. अमृत-२ मध्ये या योजनेला मंजुरी घेतली. मंजुरीच्या अधीन राहून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चार टप्प्यांत निविदा प्रक्रिया राबविली. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक संपताच कामाला सुरुवात होणार आहे.

आता जागेचा शोध सुरू७०० मिमी व्यासाच्या बाजूलाच १४०० मिमीची जलवाहिनी आहे. आणखी थोड्या बाजूला २५०० मिमीची सर्वांत मोठी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. आता ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी कुठे टाकावी, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी तर जागाच शिल्लक नाही. जिथे जागा उपलब्ध आहे, तेथे तारेवरची कसरत करीत जलवाहिनी टाकावी लागेल. जुन्या दोन्ही जलवाहिन्या तीन ठिकाणी ‘क्राॅस’ झालेल्या असल्यामुळे ९०० मिमीची जलवाहिनी टाकताना जमिनीची अडचण निर्माण होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी