शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
5
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
6
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
7
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
8
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
9
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
10
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
11
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
12
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
13
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
14
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
15
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
16
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
17
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
20
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना

By admin | Updated: July 19, 2014 00:39 IST

सेलू: निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच फ टका बसलेला आहे़ अतिवृष्टी, महापूर तर रबी हंगामात झालेल्या गारपिटीनंतर वरूणराजाने घेतलेली विश्रांती शेतकऱ्यांना काळजीत टाकणारी आहे.

सेलू: निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच फ टका बसलेला आहे़ अतिवृष्टी, महापूर तर रबी हंगामात झालेल्या गारपिटीनंतर वरूणराजाने घेतलेली विश्रांती शेतकऱ्यांना काळजीत टाकणारी आहे. त्यातच मे महिन्यात पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी लावलेल्या कापसांच्या झाडांवर लाल्या आल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत़
गुगळीधामणगाव परिसरात एका नामांकित सिड्स कंपनीचे बियाणे लावल्या नंतर कापसाची झाडे सुकू लागली व लाल पडू लागल्यामुळे शेतकऱ्यांना ती झाडे उपटून टाकण्या शिवाय पर्याय राहिला नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरूवारी कृषी कार्यालय गाठले़ त्यानंतर शुक्रवारी तालुका कृषी अधिकारी राम रोडगे, पर्यवेक्षक दत्तराव बोराडे यांनी गुगळी धामणगाव परिसरातील कल्याण डख, भगवान डख, गणेश लोमटे, नारायण काळे, सुशील कुलकर्णी यांच्या शेतावर जावून झाडांची पाहणी केली आहे़ परंतु, मोठया प्रमाणावर झालेले नुकसान कसे भरून येणार हाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे़ गुगळीधामणगाव परिसरात मोठया प्रमाणावर ठिबक सिंचनाद्वारे मे महिन्यात कापसाची लागवड करण्यात आली़
कापसाची झाडे जोमात आली परंतु, अचानक कापसाची झाडे लाल पडून त्याची वाढ खुंटली व ती झाडे जागेवरच सुकू लागली आहेत. परिणामी शेतकऱ्यांसमोर मोठा पेचप्रसंग उदभवला आहे़
मे महिन्यात लागवड केलेल्या कापसावर महागडी रासायनिक खते व फ वारणी शेतकऱ्यांनी केली़ दोन वेळा निंदणी करून रात्रंदिवस झाडांची जोपासना केली़ परंतु, अचानकच ही झाडे लाल पडल्यामुळे शेतकरी चक्रावून गेले़ त्यामुळे बियाणे बोगस असल्याचे शेतकरी सांगत आहेत़ जवळपास एका कापसाच्या बॅग मागे या शेतकऱ्यांना दहा हजार रूपयाचा खर्च आला आहे़ लाल झालेल्या झाडांना शेतकऱ्यांनी उपटून टाकले. परंतु, आता नवीन पेरणी करून हाती काय लागणार हा ही प्रश्न आहे़ त्यामुळे संबंधितांवर विरूध्द कार्यवाही करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़ (प्रतिनिधी)
कृषी विभागाने केली पाहणी
गुगळीधामणगाव परिसरात एका कंपनीच्या कापसाची झाडे लाल पडली व वाढ खुंटल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे गुरूवारी या परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाकडे धाव घेतली़ शुक्रवारी तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांनी शेतावर जावून परिस्थितीची पाहणी केली़ शेतकऱ्यांनी बियाणे बोगस असल्याची तोंडी तक्रार कृषी विभागाकडे केली आहे़ याबाबतचा सर्व अहवाल जिल्हा तक्रार समितीकडे कृषी विभाग पाठवणार आहे़ त्यानंतरच बियाणे बोगस आहे की वातावरणाचा परिणाम हे स्पष्ट होणार आहे़ परंतु, मोठया प्रमाणावर झालेली नुकसान भरून कशी येणार हा ही प्रश्न आहे़