शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

'त्यांनी' पैसे खाऊन 'आदर्श' पतसंस्थेचा घोटाळा होऊ दिला; ठेवीदारांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:43 IST

सहा तासांच्या थाळीनाद आंदोलनाने उपनिबंधक कार्यालयासह पोलिस आयुक्तालय दणाणले

छत्रपती संभाजीनगर : सहकार खात्याच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा होऊ दिला. गेल्या आठ वर्षांमध्ये कलम ८९ नुसार तीन वर्षांनी चौकशी का झाली नाही, पतसंस्थेच्या विनापरवाना २८ शाखा कशा सुरू होत्या, असे प्रश्न विचारत शेकडो ठेवीदारांनी सोमवारी थाळीनाद आंदोलन केले. खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली उपनिबंधक कार्यालयासमोर अडीच तास आंदोलन झाल्यानंतर पोलिस आयुक्तालयावर देखील मोर्चा वळवून तेथे पोलिस अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

जुलै महिन्यात पतसंस्थेच्या २०२ कोटींचा घोटाळा उघडकीस आला. शेकडो ठेवीदारांच्या ठेवी पतसंस्थेत अडकल्या. परंतु काही मुख्य आराेपी अद्यापही पसार असून तीन लेखापरीक्षकांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. परंतु उपनिबंधक विभागाचे अधिकारी या घोटाळ्यातून नामानिराळे राहिले. याविरोधात सोमवारी आंदोलन छेडण्यात आले. सकाळी अकरा वाजेपासून पुष्पनगरीच्या कार्यालयासमोर हातात ताट आणि चमचा घेऊन ठेवीदारांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. क्रांती चौक, वेदांतनगर पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकाचे कर्मचारी तैनात होते. संतप्त ठेवीदारांकडून कार्यालयाच्या दिशेने प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. यावेळी उपनिबंधक विभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यालयातच होते. दुपारी बारा वाजता खा. इम्तियाज मोर्चात सहभागी झाले. तीन वाजता त्यांनी पायी पोलिस आयुक्तालयाकडे मोर्चा वळवला. तेथे सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत पारदर्शक कारवाईचे आश्वासन दिले.

अधाने, सुनील सापडत कसे नाहीत?अट्टल गुन्हेगारांना पकडणाऱ्या पोलिसांना अद्यापही घोटाळ्यातील मुख्य आरोपी देवीदास अधाने, सुनील मानकापे सापडले नसल्याने ठेवीदारांनी संताप व्यक्त केला. आता एसआयटीवर विश्वास उरला नाही. पोलिस महासंचालकांनी दुसऱ्या शाखेकडून तपास करावा, अशी मागणी खा. इम्तियाज यांनी केली. येत्या १६ सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान पोलिसांना चकवा देऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कसा घेराव घालतो ते पाहाच, असा इशाराही त्यांनी दिला.

आंदोलनात मुख्य आरोप-जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी अद्याप आरोपी का नाही?-अंबादास मानकापेने १४२ कोटींचे कर्ज उचलले तेव्हा विभाग काय करत होता?-जिल्ह्याभरात पतसंस्थेच्या २८ शाखा विनापरवाना कशा सुरू हाेत्या?-गुन्ह्यातले फिर्यादी असलेल्या अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल उशिरा का सादर केला?-३१ मार्च, २०१९ रोजी एकाच दिवसात चौकशी पूर्ण होऊन त्याच दिवशी ७६ कोटींचे कर्ज कसे उचलले गेले?

राज्यात पतसंस्थेच्या अवस्था-खा. जलील यांनी सहकार खात्यावर गंभीर आरोप केले. सहकार खाते भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचे सांगत राज्यातील त्यांची अवस्था सांगितली.-राज्यात १३ हजार ४१२ नागरी सहकारी पतसंस्था आहेत.-७५ हजार ५२८ पगारदार पतसंस्था स्थापन आहेत.- १ कोटी सभासद.-यात ११० लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.-शेंद्र्याच्या एकाच १ हेक्टर ४० आर जमिनीवर ८ लोकांनी ४५ कोटींचे कर्ज उचलले. ही बाब कोणाच्या निदर्शनास आली कशी नाही?

टॅग्स :fraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी