शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

'त्यांनी' पैसे खाऊन 'आदर्श' पतसंस्थेचा घोटाळा होऊ दिला; ठेवीदारांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:43 IST

सहा तासांच्या थाळीनाद आंदोलनाने उपनिबंधक कार्यालयासह पोलिस आयुक्तालय दणाणले

छत्रपती संभाजीनगर : सहकार खात्याच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा होऊ दिला. गेल्या आठ वर्षांमध्ये कलम ८९ नुसार तीन वर्षांनी चौकशी का झाली नाही, पतसंस्थेच्या विनापरवाना २८ शाखा कशा सुरू होत्या, असे प्रश्न विचारत शेकडो ठेवीदारांनी सोमवारी थाळीनाद आंदोलन केले. खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली उपनिबंधक कार्यालयासमोर अडीच तास आंदोलन झाल्यानंतर पोलिस आयुक्तालयावर देखील मोर्चा वळवून तेथे पोलिस अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

जुलै महिन्यात पतसंस्थेच्या २०२ कोटींचा घोटाळा उघडकीस आला. शेकडो ठेवीदारांच्या ठेवी पतसंस्थेत अडकल्या. परंतु काही मुख्य आराेपी अद्यापही पसार असून तीन लेखापरीक्षकांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. परंतु उपनिबंधक विभागाचे अधिकारी या घोटाळ्यातून नामानिराळे राहिले. याविरोधात सोमवारी आंदोलन छेडण्यात आले. सकाळी अकरा वाजेपासून पुष्पनगरीच्या कार्यालयासमोर हातात ताट आणि चमचा घेऊन ठेवीदारांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. क्रांती चौक, वेदांतनगर पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकाचे कर्मचारी तैनात होते. संतप्त ठेवीदारांकडून कार्यालयाच्या दिशेने प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. यावेळी उपनिबंधक विभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यालयातच होते. दुपारी बारा वाजता खा. इम्तियाज मोर्चात सहभागी झाले. तीन वाजता त्यांनी पायी पोलिस आयुक्तालयाकडे मोर्चा वळवला. तेथे सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत पारदर्शक कारवाईचे आश्वासन दिले.

अधाने, सुनील सापडत कसे नाहीत?अट्टल गुन्हेगारांना पकडणाऱ्या पोलिसांना अद्यापही घोटाळ्यातील मुख्य आरोपी देवीदास अधाने, सुनील मानकापे सापडले नसल्याने ठेवीदारांनी संताप व्यक्त केला. आता एसआयटीवर विश्वास उरला नाही. पोलिस महासंचालकांनी दुसऱ्या शाखेकडून तपास करावा, अशी मागणी खा. इम्तियाज यांनी केली. येत्या १६ सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान पोलिसांना चकवा देऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कसा घेराव घालतो ते पाहाच, असा इशाराही त्यांनी दिला.

आंदोलनात मुख्य आरोप-जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी अद्याप आरोपी का नाही?-अंबादास मानकापेने १४२ कोटींचे कर्ज उचलले तेव्हा विभाग काय करत होता?-जिल्ह्याभरात पतसंस्थेच्या २८ शाखा विनापरवाना कशा सुरू हाेत्या?-गुन्ह्यातले फिर्यादी असलेल्या अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल उशिरा का सादर केला?-३१ मार्च, २०१९ रोजी एकाच दिवसात चौकशी पूर्ण होऊन त्याच दिवशी ७६ कोटींचे कर्ज कसे उचलले गेले?

राज्यात पतसंस्थेच्या अवस्था-खा. जलील यांनी सहकार खात्यावर गंभीर आरोप केले. सहकार खाते भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचे सांगत राज्यातील त्यांची अवस्था सांगितली.-राज्यात १३ हजार ४१२ नागरी सहकारी पतसंस्था आहेत.-७५ हजार ५२८ पगारदार पतसंस्था स्थापन आहेत.- १ कोटी सभासद.-यात ११० लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.-शेंद्र्याच्या एकाच १ हेक्टर ४० आर जमिनीवर ८ लोकांनी ४५ कोटींचे कर्ज उचलले. ही बाब कोणाच्या निदर्शनास आली कशी नाही?

टॅग्स :fraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी