शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

हाती अजून काहीच पडेना; ऑनलाईनच्या अटीमुळे ३० टक्के शेतकरी मदतीपासून राहिले वंचित!

By विकास राऊत | Updated: April 13, 2023 18:11 IST

८ महिन्यांत तीनवेळा शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज

छत्रपती संभाजीनगर : ऑगस्ट २०२२ ते ११ एप्रिल २०२३ या ८ महिन्यांच्या काळात शेतकऱ्यांना अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी तीनवेळा मदतीची घोषणा व तरतूद शासनाने केली. मात्र ऑनलाईनच्या कचाट्यात ही मदत अडकली असून, पुढे अफाट आणि मागे सपाट असा काही प्रकार सध्या सुरू असल्याचे दिसते आहे. मदतीच्या घोषणांचा बहर एकीकडे येत आहे, तर दुसरीकडे ऑनलाइन मदत वाटप करण्याच्या निर्णयामुळे सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांपर्यंत अद्याप अतिवृष्टीची मदतही पोहोचलेली नाही.

सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे १७०० कोटी आणि मार्च-एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाची ८४ कोटींची मदत शेतकऱ्यांना केव्हा मिळणार? असा प्रश्न आहे. अजूनही अवकाळी पावसाचे संकट सुरूच असून, नुकसानीचे आकडे वाढत आहेत.

पहिली घोषणा आणि वाटप असेमराठवाड्यात २०२२ मधील खरीप हंगामाला अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा फटका बसला. ४८ लाख हेक्टरपैकी ३२ लाख २३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.जून ते ऑक्टोबर २०२२ मध्ये नुकसानीचे पंचनामे करून ४ हजार ४८० कोटी रुपयांची नुकसान भरपाई शासनाकडे मागितली. त्यापैकी शासनाने अतिवृष्टीचे १००८ कोटी ३० लाख ८१ हजार, सततच्या पावसाचे ५९७ कोटी ५४ लाख आणि शंखी गोगलगाईंचे ९८ कोटी ५ लाख ८० हजार असे एकूण १ हजार ७०४ कोटी ३५ लाख ६१ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली.

दुसऱ्यांदा ऑनलाईनची आडकाठी आणलीसप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मधील अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे २ हजार ७७६ कोटी ५१ हजार ४५ हजार रुपयांपैकी अतिवृष्टीचे १२१४ कोटी रुपये शासनाने १७ नोव्हेंबर २०२२ रोजी मंजूर केले. ही मदत तातडीने मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटले, मात्र शासनाने मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन वर्ग करण्याचा निर्णय घेतला.

ऑनलाईनच्या कचाट्यात अशी अडकली मदतजानेवारी २०२३ मध्ये माहिती संकलित केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे वाटले; मात्र ६ फेब्रुवारी रोजी शासनाने नव्याने पत्र पाठवून मदत वर्ग करण्याची सुधारित ऑनलाईन प्रक्रिया नमूद केली. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ च्या प्रोत्साहन लाभ योजनेच्या धर्तीवर ऑनलाईन प्रणाली महा-आयटी कंपनीमार्फत राबविण्याचा निर्णय झाला. तहसीलदार ते निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा तहसीलदारांच्या लॉगीनमध्ये यादी डाऊनलोड करण्याच्या प्रक्रियेत मदत वाटप रखडली.

मार्च-एप्रिलमधील नुकसानीचे ऑनलाईन वाटप...छत्रपती संभाजीनगर २२ कोटी १७ लाख, जालन्यात ३ कोटी ६७ लाख, परभणीत ४ कोटी ३७ लाख, हिंगोलीत ६ कोटी ४ लाख, नांदेडमध्ये ३० कोटी ५२ लाख, बीडमध्ये ५ कोटी ९९ लाख, लातूर जिल्ह्यात १० कोटी ५६ लाख, तर धाराशिवमध्ये १ कोटी ३९ लाख असे ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईला शासनाला मंजुरी दिली, त्यालाही ऑनलाईनचे निकष आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद