शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हाती अजून काहीच पडेना; ऑनलाईनच्या अटीमुळे ३० टक्के शेतकरी मदतीपासून राहिले वंचित!

By विकास राऊत | Updated: April 13, 2023 18:11 IST

८ महिन्यांत तीनवेळा शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज

छत्रपती संभाजीनगर : ऑगस्ट २०२२ ते ११ एप्रिल २०२३ या ८ महिन्यांच्या काळात शेतकऱ्यांना अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी तीनवेळा मदतीची घोषणा व तरतूद शासनाने केली. मात्र ऑनलाईनच्या कचाट्यात ही मदत अडकली असून, पुढे अफाट आणि मागे सपाट असा काही प्रकार सध्या सुरू असल्याचे दिसते आहे. मदतीच्या घोषणांचा बहर एकीकडे येत आहे, तर दुसरीकडे ऑनलाइन मदत वाटप करण्याच्या निर्णयामुळे सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांपर्यंत अद्याप अतिवृष्टीची मदतही पोहोचलेली नाही.

सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे १७०० कोटी आणि मार्च-एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाची ८४ कोटींची मदत शेतकऱ्यांना केव्हा मिळणार? असा प्रश्न आहे. अजूनही अवकाळी पावसाचे संकट सुरूच असून, नुकसानीचे आकडे वाढत आहेत.

पहिली घोषणा आणि वाटप असेमराठवाड्यात २०२२ मधील खरीप हंगामाला अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा फटका बसला. ४८ लाख हेक्टरपैकी ३२ लाख २३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.जून ते ऑक्टोबर २०२२ मध्ये नुकसानीचे पंचनामे करून ४ हजार ४८० कोटी रुपयांची नुकसान भरपाई शासनाकडे मागितली. त्यापैकी शासनाने अतिवृष्टीचे १००८ कोटी ३० लाख ८१ हजार, सततच्या पावसाचे ५९७ कोटी ५४ लाख आणि शंखी गोगलगाईंचे ९८ कोटी ५ लाख ८० हजार असे एकूण १ हजार ७०४ कोटी ३५ लाख ६१ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली.

दुसऱ्यांदा ऑनलाईनची आडकाठी आणलीसप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मधील अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे २ हजार ७७६ कोटी ५१ हजार ४५ हजार रुपयांपैकी अतिवृष्टीचे १२१४ कोटी रुपये शासनाने १७ नोव्हेंबर २०२२ रोजी मंजूर केले. ही मदत तातडीने मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटले, मात्र शासनाने मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन वर्ग करण्याचा निर्णय घेतला.

ऑनलाईनच्या कचाट्यात अशी अडकली मदतजानेवारी २०२३ मध्ये माहिती संकलित केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे वाटले; मात्र ६ फेब्रुवारी रोजी शासनाने नव्याने पत्र पाठवून मदत वर्ग करण्याची सुधारित ऑनलाईन प्रक्रिया नमूद केली. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ च्या प्रोत्साहन लाभ योजनेच्या धर्तीवर ऑनलाईन प्रणाली महा-आयटी कंपनीमार्फत राबविण्याचा निर्णय झाला. तहसीलदार ते निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा तहसीलदारांच्या लॉगीनमध्ये यादी डाऊनलोड करण्याच्या प्रक्रियेत मदत वाटप रखडली.

मार्च-एप्रिलमधील नुकसानीचे ऑनलाईन वाटप...छत्रपती संभाजीनगर २२ कोटी १७ लाख, जालन्यात ३ कोटी ६७ लाख, परभणीत ४ कोटी ३७ लाख, हिंगोलीत ६ कोटी ४ लाख, नांदेडमध्ये ३० कोटी ५२ लाख, बीडमध्ये ५ कोटी ९९ लाख, लातूर जिल्ह्यात १० कोटी ५६ लाख, तर धाराशिवमध्ये १ कोटी ३९ लाख असे ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईला शासनाला मंजुरी दिली, त्यालाही ऑनलाईनचे निकष आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद